जिल्ह्यात अन्यत्र जाणाऱ्या चाकरमान्यांंची कोंडी

By Admin | Updated: August 25, 2015 23:37 IST2015-08-25T23:37:07+5:302015-08-25T23:37:38+5:30

कुंभमेळा : रस्ते बंद असल्याने नोकरीच्या ठिकाणी कसे जाणार?

Due to the movements of the rounds going to other places in the district | जिल्ह्यात अन्यत्र जाणाऱ्या चाकरमान्यांंची कोंडी

जिल्ह्यात अन्यत्र जाणाऱ्या चाकरमान्यांंची कोंडी

नाशिक : सिंंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणी एकच दिवस असताना पोलीस यंत्रणेने मात्र तीन दिवस रस्ते करकचून बंद करण्याच्या पोलीस यंत्रणेचा फटका नाशिक आणि चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. नाशिक शहरात सार्वजनिक सुटी सक्तीने दिली जात असली तरी ग्रामीण भागातील शासकीय आणि खासगी आस्थापना सुरूच राहणार आहे. त्यामुळे अशावेळी नोकरीच्या ठिकाणी कसे जायचे असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे. पोलिसांच्या अतिदक्षता नियोजनामुळे कर्मचाऱ्यांना दांडी मारावी लागेल किंवा अनेकांना तर एक दिवसाच्या पगारावर पाणी सोडावे लागणार आहे.
येत्या २९ तारखेला पहिली पर्वणी असून, दुसरी पर्वणी १३ तारखेला आहे. या दोन्ही पर्वण्या एकाच दिवशी असून, अन्य दोन पर्वण्या मात्र स्वतंत्र आहे. तीन दिवसांच्या पर्वण्यांसाठी पोलिसांनी नाशिक शहरात कुंभमेळ्या व्यतिरिक्त काहीच घडणार नाही अशी तजबीज करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे पर्वणीच्या आदल्या दिवसांपासूनच रस्ते बंद राहणार असून, पर्वणीच्या दुसऱ्या दिवशी ते खुले केले जाणार आहे. त्यामुळे नाशिक शहरातील विशेषत: मध्यवर्ती भागातील व्यवहार बंदच राहण्याची शक्यता आहे. तथापि, अनेक चाकरमाने मुंबईला रेल्वेने अप-डाउन करतात. तसेच दिंडोरी, ओझर, मालेगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, सिन्नर अशा अनेक भागांत घर आंगण असे अंतर असल्याने तेथे देखील रोज कामासाठी गेल्यानंतर कर्मचारी पुन्हा नाशिकला येतात. इतकेच नव्हे या भागातील अनेक सरकारी, बिनसरकारी कर्मचारी हे रोजच नाशिकमध्ये येतात आणि परत जातात. आता पर्वणीमुळे या कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळू शकेल; परंतु नाशिक शहराबाहेर त्र्यंबकेश्वर वगळता अन्यत्र कोठेही सुट्टी नाही. परिणामी इगतपुरीला कारखान्यात काम करणारे असो, ओझर, निफाडमधील शैक्षणिक संस्था अथवा मालेगाव, मनमाडमधील शासकीय कार्यालये कर्मचाऱ्यांना सुट्टीच नाही, तर ते कामावर कसे येणार? असा प्रश्न निर्र्माण झाला आहे. बरेच अनेक खासगी आणि शासकीय आस्थापनांनी नाशिकमधून दोन चार कर्मचारी येऊ शकत नाही म्हणून सुट्टी दिलेली नाही, तर कामकाजच चालूच राहणार असल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. मंत्रालयात जाणाऱ्या चाकरमान्यांची अशीच अडचण झाली आहे. नाशिकच्या कानाकोपऱ्यातून रेल्वेस्थानक गाठणे शक्य नसल्याने कामावर कसे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांना एकतर दांडी मारून एक दिवसाच्या वेतनावर पाणी सोडावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Due to the movements of the rounds going to other places in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.