शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

गोदावरी-कुंभमेळ्याविषयी भय्यू महाराजांना होती आस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:10 IST

आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने नाशिकमधील त्यांचा अनुयायांना धक्का बसला. नाशिकमध्ये भय्यूजी गुरुजी यांचा जाहीर प्रवचन किंवा अध्यात्मावर आधारित कार्यक्रम झाला नसला तरी त्यांचा नाशिकशी नेहमीच ऋणानुबंध राहिला आहे. गोदावरी स्वच्छता, कुंभमेळा, पौराणिक नाशिक अशा विविध विषयांवर गुरुजी नेहमी संवाद साधत असत.

नाशिक : आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने नाशिकमधील त्यांचा अनुयायांना धक्का बसला. नाशिकमध्ये भय्यूजी गुरुजी यांचा जाहीर प्रवचन किंवा अध्यात्मावर आधारित कार्यक्रम झाला नसला तरी त्यांचा नाशिकशी नेहमीच ऋणानुबंध राहिला आहे. गोदावरी स्वच्छता, कुंभमेळा, पौराणिक नाशिक अशा विविध विषयांवर गुरुजी नेहमी संवाद साधत असत. अध्यात्माचा प्रचार-प्रसार करणारे भय्यूजी महाराज यांनी आत्महत्त्या केल्याचे कळाल्यानंतर त्यांना मानणाऱ्या वर्गाला मानसिक धक्का बसला. भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक तणावाचे कारण पुढे येत असले तरी ते ताणतणावावर सहज मात करू शकत होते आणि त्यांच्याजवळ अध्यात्माची मोठी ताकद होती; मात्र गुरुजींनी असे पाऊल कसे उचलले हे समजण्यापलीकडे असल्याचे त्यांचे नाशिकमधील निकटवर्तीयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सुनील बागुल यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितले, गुरुजी मला भेटल्यावर प्रथम गळाभेट घेत असे. त्यांच्या निधनाच्या वृत्तावर विश्वास बसणे अवघड झाले असून, हे फार मोठे व्यक्तिमत्त्व देशाने गमावले आहे. त्यांच्या निधनाने अध्यात्म क्षेत्रासह देशाचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये आल्यावर ते भेट घेत मार्गदर्शन करीत असत. गरजवंताला मदत पोहोचवणे हे ते अध्यात्म मानत आणि हीच शिकवण त्यांनी दिल्याचे बागूल म्हणाले. दि. २३ मे रोजी अखेरची भेट महाराजांसोबत झाल्याचे नगरसेवक शिवाजी सहाणे यांनी सांगितले. पुण्यावरून ते कन्येला भेटून सिन्नरला आले होते. सुनील बागुल, करण गायकर यांच्यासोबत मी भेट घेतली होती. तेथील एका हॉटेलमध्ये तब्बल तीन तास आमच्यासोबत गुरुजींनी चर्चा केली होती.  गोदावरी संवर्धनाचे अभियान त्यांनी हाती घेतले होते. इतरांचे दु:ख जाणून घेणारा हा मोठ्या मनाचा माणूस इतका व्यथित होणे हे एक कोडे असल्याच्या भावना सहाणे यांनी व्यक्त केल्या. अण्णासाहेब जावळे-पाटील यांच्या निधनानंतर तरुणाईचा मुख्य मार्गदर्र्शक व आधारवड महाराज होते, असे छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर यांनी सांगितले.

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराज