शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

इगतपुरी तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 17:26 IST

वाडीवºहे : सर्वाधिक पाऊस होत असलेल्या इगतपुरी तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरण्याची चिन्हे असून डिसेंबर महिन्याच्या मध्यावरच तालुक्यातील धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदापाऊसही कमी पडल्याने धरणांमध्ये सुध्दा अतिशय कमी जलसाठा शिल्लक असल्याने यावर्षी लवकरच पाणी टंचाई जाणवेल अशी चिन्हे दिसू लागली आहे.

ठळक मुद्दे तालुक्याबरोबरच मराठवाडा नगर मुंबईकरांना देखील तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लगणार

वाडीवºहे : सर्वाधिक पाऊस होत असलेल्या इगतपुरी तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरण्याची चिन्हे असून डिसेंबर महिन्याच्या मध्यावरच तालुक्यातील धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदापाऊसही कमी पडल्याने धरणांमध्ये सुध्दा अतिशय कमी जलसाठा शिल्लक असल्याने यावर्षी लवकरच पाणी टंचाई जाणवेल अशी चिन्हे दिसू लागली आहे.इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर म्हणून ओळखला जातो, जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमान या तालुक्यात नोंदविले जाते. या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा स्त्रोत अडवून या तालुक्यात सात मोठी धरणे बांधली आहेत, ज्याद्वारे मुंबई, मराठवाडा, नगर,अशा अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवठा केला जातो.मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याने शासनाने अगोदरच या तालुक्यास दुष्काळ ग्रस्त तालुका यादीत समाविष्ट केले आहे. त्यात धरणे क्षमतेपेक्षा कमी भरल्याने आणि पाटबंधारे विभागाने भरमसाठ पाणी जायकवाडी आणि वैजापूर एक्सप्रेस कालव्यासाठी सोडल्याने डिसेंबर महिन्याच्या मध्यावरच धरणांमध्ये खडखडाट झाला आहे. त्यामुळे तालुक्याबरोबरच मराठवाडा नगर मुंबईकरांना देखील तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लगणार आहे.तालुक्यात मुकणे, दारणा, वाकी खापरी, भाम, भावली, कडवा, वैतरणा अशी सात मोठी धरणे आहेत. वैतरणा धरणाचे पाणी मुंबईसाठी व जलविद्युत प्रकल्पसाठी वापरले जाते तर इतर धरणांचे पाणी मराठवाडा व इतर ठिकाणी जाते. तर छोट्या लघुबंधारे, पाझर तलाव यांचे पाणी परिसरातील गावासाठी वापरले जाते. अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना, जलसिंचन योजना या धरणांवर अवलंबून आहेत.पाऊस कमी झाल्याने जामिनीतील पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर घटली असून अनेक विहिरिंनी तळ गाठले आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. दुष्काळामुळे शेतकाºयांनी रब्बी हंगामाकडे पाठ फिरविली आहे. आणि खरीपाबरोबरच रब्बी हंगाम ही धोक्यात आला आहे. पिकांना भाव नाही, कर्ज उपलब्ध होत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.त्यात जलसाठे आटू लागल्याने जनावरांच्या पाण्याचा आणि चाºयाचा प्रश्नही गंभीर बनणार आहे. त्यामुळे शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी दुष्काळ निवारणासाठी आतापासुन नियोजन करणे गरजेचे आहे. आढावा बैठक घेवून यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. पाण्याची आवर्तने देतांना काटेकोर नियोजन महत्वाचे असल्याचे शेतकरी बोलत आहेत.मुकणे व दारणा धरणातून गेल्या महीन्याभर पाणी सुरु होते. मात्र यावर कुणीही आवाज उठवला नाही. प्रसिद्धि माध्यमातून यावर आवाज उठवल्यानंतर पाणी बंद करण्यात आले होते. ही आवर्तने दिल्याने मुकणे व दारणा ही धरणे लवकरच तळ गाठतील असे चित्र आहे. यावर अवलबुन असलेले शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.-------------------------------------------------------------धरण              १६ डिसेंबर २०१७ चा साठा      १६ डिसेंबर २०१८ चा साठा                                                                        दारणा                  ९२.९६ %                               २९.३३ %मुकणे                 ८२.२९ %                                ४१.४७ %कडवा                  ८३.३५ %                               ५०.७३ %भावली                ९८.०७ %                                ३५.१० %वाकी खापरी        ७५.६३ %                               ५८.२४ %-------------------------------------------------------------