शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 17:26 IST

वाडीवºहे : सर्वाधिक पाऊस होत असलेल्या इगतपुरी तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरण्याची चिन्हे असून डिसेंबर महिन्याच्या मध्यावरच तालुक्यातील धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदापाऊसही कमी पडल्याने धरणांमध्ये सुध्दा अतिशय कमी जलसाठा शिल्लक असल्याने यावर्षी लवकरच पाणी टंचाई जाणवेल अशी चिन्हे दिसू लागली आहे.

ठळक मुद्दे तालुक्याबरोबरच मराठवाडा नगर मुंबईकरांना देखील तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लगणार

वाडीवºहे : सर्वाधिक पाऊस होत असलेल्या इगतपुरी तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरण्याची चिन्हे असून डिसेंबर महिन्याच्या मध्यावरच तालुक्यातील धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदापाऊसही कमी पडल्याने धरणांमध्ये सुध्दा अतिशय कमी जलसाठा शिल्लक असल्याने यावर्षी लवकरच पाणी टंचाई जाणवेल अशी चिन्हे दिसू लागली आहे.इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर म्हणून ओळखला जातो, जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमान या तालुक्यात नोंदविले जाते. या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा स्त्रोत अडवून या तालुक्यात सात मोठी धरणे बांधली आहेत, ज्याद्वारे मुंबई, मराठवाडा, नगर,अशा अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवठा केला जातो.मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याने शासनाने अगोदरच या तालुक्यास दुष्काळ ग्रस्त तालुका यादीत समाविष्ट केले आहे. त्यात धरणे क्षमतेपेक्षा कमी भरल्याने आणि पाटबंधारे विभागाने भरमसाठ पाणी जायकवाडी आणि वैजापूर एक्सप्रेस कालव्यासाठी सोडल्याने डिसेंबर महिन्याच्या मध्यावरच धरणांमध्ये खडखडाट झाला आहे. त्यामुळे तालुक्याबरोबरच मराठवाडा नगर मुंबईकरांना देखील तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लगणार आहे.तालुक्यात मुकणे, दारणा, वाकी खापरी, भाम, भावली, कडवा, वैतरणा अशी सात मोठी धरणे आहेत. वैतरणा धरणाचे पाणी मुंबईसाठी व जलविद्युत प्रकल्पसाठी वापरले जाते तर इतर धरणांचे पाणी मराठवाडा व इतर ठिकाणी जाते. तर छोट्या लघुबंधारे, पाझर तलाव यांचे पाणी परिसरातील गावासाठी वापरले जाते. अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना, जलसिंचन योजना या धरणांवर अवलंबून आहेत.पाऊस कमी झाल्याने जामिनीतील पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर घटली असून अनेक विहिरिंनी तळ गाठले आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. दुष्काळामुळे शेतकाºयांनी रब्बी हंगामाकडे पाठ फिरविली आहे. आणि खरीपाबरोबरच रब्बी हंगाम ही धोक्यात आला आहे. पिकांना भाव नाही, कर्ज उपलब्ध होत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.त्यात जलसाठे आटू लागल्याने जनावरांच्या पाण्याचा आणि चाºयाचा प्रश्नही गंभीर बनणार आहे. त्यामुळे शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी दुष्काळ निवारणासाठी आतापासुन नियोजन करणे गरजेचे आहे. आढावा बैठक घेवून यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. पाण्याची आवर्तने देतांना काटेकोर नियोजन महत्वाचे असल्याचे शेतकरी बोलत आहेत.मुकणे व दारणा धरणातून गेल्या महीन्याभर पाणी सुरु होते. मात्र यावर कुणीही आवाज उठवला नाही. प्रसिद्धि माध्यमातून यावर आवाज उठवल्यानंतर पाणी बंद करण्यात आले होते. ही आवर्तने दिल्याने मुकणे व दारणा ही धरणे लवकरच तळ गाठतील असे चित्र आहे. यावर अवलबुन असलेले शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.-------------------------------------------------------------धरण              १६ डिसेंबर २०१७ चा साठा      १६ डिसेंबर २०१८ चा साठा                                                                        दारणा                  ९२.९६ %                               २९.३३ %मुकणे                 ८२.२९ %                                ४१.४७ %कडवा                  ८३.३५ %                               ५०.७३ %भावली                ९८.०७ %                                ३५.१० %वाकी खापरी        ७५.६३ %                               ५८.२४ %-------------------------------------------------------------