शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

इगतपुरी तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 17:26 IST

वाडीवºहे : सर्वाधिक पाऊस होत असलेल्या इगतपुरी तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरण्याची चिन्हे असून डिसेंबर महिन्याच्या मध्यावरच तालुक्यातील धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदापाऊसही कमी पडल्याने धरणांमध्ये सुध्दा अतिशय कमी जलसाठा शिल्लक असल्याने यावर्षी लवकरच पाणी टंचाई जाणवेल अशी चिन्हे दिसू लागली आहे.

ठळक मुद्दे तालुक्याबरोबरच मराठवाडा नगर मुंबईकरांना देखील तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लगणार

वाडीवºहे : सर्वाधिक पाऊस होत असलेल्या इगतपुरी तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरण्याची चिन्हे असून डिसेंबर महिन्याच्या मध्यावरच तालुक्यातील धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदापाऊसही कमी पडल्याने धरणांमध्ये सुध्दा अतिशय कमी जलसाठा शिल्लक असल्याने यावर्षी लवकरच पाणी टंचाई जाणवेल अशी चिन्हे दिसू लागली आहे.इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर म्हणून ओळखला जातो, जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमान या तालुक्यात नोंदविले जाते. या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा स्त्रोत अडवून या तालुक्यात सात मोठी धरणे बांधली आहेत, ज्याद्वारे मुंबई, मराठवाडा, नगर,अशा अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवठा केला जातो.मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याने शासनाने अगोदरच या तालुक्यास दुष्काळ ग्रस्त तालुका यादीत समाविष्ट केले आहे. त्यात धरणे क्षमतेपेक्षा कमी भरल्याने आणि पाटबंधारे विभागाने भरमसाठ पाणी जायकवाडी आणि वैजापूर एक्सप्रेस कालव्यासाठी सोडल्याने डिसेंबर महिन्याच्या मध्यावरच धरणांमध्ये खडखडाट झाला आहे. त्यामुळे तालुक्याबरोबरच मराठवाडा नगर मुंबईकरांना देखील तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लगणार आहे.तालुक्यात मुकणे, दारणा, वाकी खापरी, भाम, भावली, कडवा, वैतरणा अशी सात मोठी धरणे आहेत. वैतरणा धरणाचे पाणी मुंबईसाठी व जलविद्युत प्रकल्पसाठी वापरले जाते तर इतर धरणांचे पाणी मराठवाडा व इतर ठिकाणी जाते. तर छोट्या लघुबंधारे, पाझर तलाव यांचे पाणी परिसरातील गावासाठी वापरले जाते. अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना, जलसिंचन योजना या धरणांवर अवलंबून आहेत.पाऊस कमी झाल्याने जामिनीतील पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर घटली असून अनेक विहिरिंनी तळ गाठले आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. दुष्काळामुळे शेतकाºयांनी रब्बी हंगामाकडे पाठ फिरविली आहे. आणि खरीपाबरोबरच रब्बी हंगाम ही धोक्यात आला आहे. पिकांना भाव नाही, कर्ज उपलब्ध होत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.त्यात जलसाठे आटू लागल्याने जनावरांच्या पाण्याचा आणि चाºयाचा प्रश्नही गंभीर बनणार आहे. त्यामुळे शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी दुष्काळ निवारणासाठी आतापासुन नियोजन करणे गरजेचे आहे. आढावा बैठक घेवून यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. पाण्याची आवर्तने देतांना काटेकोर नियोजन महत्वाचे असल्याचे शेतकरी बोलत आहेत.मुकणे व दारणा धरणातून गेल्या महीन्याभर पाणी सुरु होते. मात्र यावर कुणीही आवाज उठवला नाही. प्रसिद्धि माध्यमातून यावर आवाज उठवल्यानंतर पाणी बंद करण्यात आले होते. ही आवर्तने दिल्याने मुकणे व दारणा ही धरणे लवकरच तळ गाठतील असे चित्र आहे. यावर अवलबुन असलेले शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.-------------------------------------------------------------धरण              १६ डिसेंबर २०१७ चा साठा      १६ डिसेंबर २०१८ चा साठा                                                                        दारणा                  ९२.९६ %                               २९.३३ %मुकणे                 ८२.२९ %                                ४१.४७ %कडवा                  ८३.३५ %                               ५०.७३ %भावली                ९८.०७ %                                ३५.१० %वाकी खापरी        ७५.६३ %                               ५८.२४ %-------------------------------------------------------------