शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 17:55 IST

मागणीत झालेली घट तसेच परराज्यातील कांदा दाखल झाल्याने दहा दिवसापासून बाजारभावाचा आलेख दिवसेंदिवस घसरु लागल्याने बागलाण तालुक्यातील बळीराजा चिंतातूर झाला आहे. दोन पैसे जास्त मिळण्याच्या उद्देशाने चार महिन्यापासून चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला यामुळे ग्रहण लागले असून ‘चाळीतल्या पाहून कांद्याला, चिंता दाटे काळजाला व शेतकरी रडे नशिबाला’ असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे

बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील बळीराजाचे कांदा हे व्यापारी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाच्या उत्पादनावर व भावावर येथील शेतक-यांच्या प्रपंचाचे आर्थिक गणित अवलंबून असते. तीन वर्षाचा लेखाजोखा पाहता कांद्याला समाधानकारक भाव मिळालेला नसून भाव वाढू लागताच त्यावर टाच आणून बाजार स्थिर करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप शेतक-यांना मारक ठरू लागला आहे. सलग तीन वर्षापासून समाधानकारक भाव मिळालेला नसल्याने यावर्षी बसणारा फटका दुरगामी परिणामकारक ठरण्याची धास्ती आहे. कांद्याला दोन पैसे जास्त मिळविण्यासाठी व टप्याटप्याने कांदा बाजारात आणण्यासाठी बळीराजाने मे अखेर कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. हा साठविलेला कांदा आता खराब होऊ लागला आहे. कमी पर्जन्यमानामुळे खरीपाच्या कांदा उत्पादनात घट, भाव वाढण्याची शक्यता तर कधी चिनचा कांदा दाखल असे संदेश सध्या समाज माध्यमांमधून फिरत असल्याने बळीराजाच्या मनात भीतीचे काहूर दाटले आहे. चांगला बाजार भाव मिळण्याच्या अपेक्षेने दोन महीने चाळीत साठविलेल्या कांद्याला दराच्या घसरत्या आलेखाचा फटका बसल्याने सध्याचा बाजारभाव पाहता उत्पादन खर्चही हाती पडणार नाही अशी स्थिती आहे. भारताच्या बाजारपेठेवर चीनच्या कांद्याने कब्जा केल्याने निर्यातीला ब्रेक लागला असून त्यामुळेच स्थानिक कांद्याचे दर घसरल्याचे व्यापा-यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा