शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 17:55 IST

मागणीत झालेली घट तसेच परराज्यातील कांदा दाखल झाल्याने दहा दिवसापासून बाजारभावाचा आलेख दिवसेंदिवस घसरु लागल्याने बागलाण तालुक्यातील बळीराजा चिंतातूर झाला आहे. दोन पैसे जास्त मिळण्याच्या उद्देशाने चार महिन्यापासून चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला यामुळे ग्रहण लागले असून ‘चाळीतल्या पाहून कांद्याला, चिंता दाटे काळजाला व शेतकरी रडे नशिबाला’ असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे

बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील बळीराजाचे कांदा हे व्यापारी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाच्या उत्पादनावर व भावावर येथील शेतक-यांच्या प्रपंचाचे आर्थिक गणित अवलंबून असते. तीन वर्षाचा लेखाजोखा पाहता कांद्याला समाधानकारक भाव मिळालेला नसून भाव वाढू लागताच त्यावर टाच आणून बाजार स्थिर करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप शेतक-यांना मारक ठरू लागला आहे. सलग तीन वर्षापासून समाधानकारक भाव मिळालेला नसल्याने यावर्षी बसणारा फटका दुरगामी परिणामकारक ठरण्याची धास्ती आहे. कांद्याला दोन पैसे जास्त मिळविण्यासाठी व टप्याटप्याने कांदा बाजारात आणण्यासाठी बळीराजाने मे अखेर कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. हा साठविलेला कांदा आता खराब होऊ लागला आहे. कमी पर्जन्यमानामुळे खरीपाच्या कांदा उत्पादनात घट, भाव वाढण्याची शक्यता तर कधी चिनचा कांदा दाखल असे संदेश सध्या समाज माध्यमांमधून फिरत असल्याने बळीराजाच्या मनात भीतीचे काहूर दाटले आहे. चांगला बाजार भाव मिळण्याच्या अपेक्षेने दोन महीने चाळीत साठविलेल्या कांद्याला दराच्या घसरत्या आलेखाचा फटका बसल्याने सध्याचा बाजारभाव पाहता उत्पादन खर्चही हाती पडणार नाही अशी स्थिती आहे. भारताच्या बाजारपेठेवर चीनच्या कांद्याने कब्जा केल्याने निर्यातीला ब्रेक लागला असून त्यामुळेच स्थानिक कांद्याचे दर घसरल्याचे व्यापा-यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा