शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 17:55 IST

मागणीत झालेली घट तसेच परराज्यातील कांदा दाखल झाल्याने दहा दिवसापासून बाजारभावाचा आलेख दिवसेंदिवस घसरु लागल्याने बागलाण तालुक्यातील बळीराजा चिंतातूर झाला आहे. दोन पैसे जास्त मिळण्याच्या उद्देशाने चार महिन्यापासून चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला यामुळे ग्रहण लागले असून ‘चाळीतल्या पाहून कांद्याला, चिंता दाटे काळजाला व शेतकरी रडे नशिबाला’ असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे

बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील बळीराजाचे कांदा हे व्यापारी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाच्या उत्पादनावर व भावावर येथील शेतक-यांच्या प्रपंचाचे आर्थिक गणित अवलंबून असते. तीन वर्षाचा लेखाजोखा पाहता कांद्याला समाधानकारक भाव मिळालेला नसून भाव वाढू लागताच त्यावर टाच आणून बाजार स्थिर करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप शेतक-यांना मारक ठरू लागला आहे. सलग तीन वर्षापासून समाधानकारक भाव मिळालेला नसल्याने यावर्षी बसणारा फटका दुरगामी परिणामकारक ठरण्याची धास्ती आहे. कांद्याला दोन पैसे जास्त मिळविण्यासाठी व टप्याटप्याने कांदा बाजारात आणण्यासाठी बळीराजाने मे अखेर कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. हा साठविलेला कांदा आता खराब होऊ लागला आहे. कमी पर्जन्यमानामुळे खरीपाच्या कांदा उत्पादनात घट, भाव वाढण्याची शक्यता तर कधी चिनचा कांदा दाखल असे संदेश सध्या समाज माध्यमांमधून फिरत असल्याने बळीराजाच्या मनात भीतीचे काहूर दाटले आहे. चांगला बाजार भाव मिळण्याच्या अपेक्षेने दोन महीने चाळीत साठविलेल्या कांद्याला दराच्या घसरत्या आलेखाचा फटका बसल्याने सध्याचा बाजारभाव पाहता उत्पादन खर्चही हाती पडणार नाही अशी स्थिती आहे. भारताच्या बाजारपेठेवर चीनच्या कांद्याने कब्जा केल्याने निर्यातीला ब्रेक लागला असून त्यामुळेच स्थानिक कांद्याचे दर घसरल्याचे व्यापा-यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा