शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 6:22 PM

विंचूर : नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या विंचूर गावात रस्ते, स्वच्छता यासह मुलभुत समस्या ब-यापैकी मार्गी लागलेल्या असल्या तरी सरस्वतीच्या मंदिरात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांचा जीव मात्र पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात आला आहे. शाळा प्रांगणाच्या मधून गेलेला पाटबंधारे विभागाचा कालवा धोकादायक ठरु पाहत असून त्यावर स्लॅब नसल्याने तसेच संरक्षक भिंत पडल्याने विद्यार्थ्यांंसह पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. शालेय प्रशासनाने संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा करु नही दखल घेतली जात नसल्याने समस्यांचा फेरा कायम आहे.

येथील कर्मवीर विद्यालयाच्या प्रांगणामधून पाटबंधारे विभागाचा कालवा गेलेला आहे. शाळेत सुमारे तीन हजारांच्या आसपास पटसंख्या असल्याने दोन्ही प्रांगणात विद्यार्थ्यांंचा वावर असतो. कालव्याला पाणी आल्यास शाळेसह पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. सकाळी शाळा भरण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यानंतर अनेक मुले पाटालगत असलेल्या भिंतीवर बसलेली असतात. कालव्याला पाणी असल्यास सदर चित्र धोकेदायक असल्याने शाळा प्रशासन तसेच गावक-यांनी चिंता व्यक्त करीत भिंतीचे काम करणे तसेच शाळेच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या कालव्यावर स्लॅब टाकण्याची वारंवार विनंती करु णारे निवेदन देऊनही पाटबंधारे विभागाने त्याला केराची टोपली दाखवली आहे. परिणामी शाळा प्रशासन व गावक-यांनी पाटबंधारे विभागापुढे हात टेकले आहेत. शाळा प्रशासनाला विद्यार्थी सुरक्षिततेसाठी डोळ्यात तेल घालून लक्ष घालावे लागत असून, एखादी अनुचित घटना घडण्याची वाट संबंधित विभाग बघत आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थात विचारला जात आहे.शाळेची भव्यदिव्य इमारत असून नुतन इमारतीचे काम पुर्णत्वास आले आहे. भव्य असे प्रांगण असताना मधोमध असणारा कालवा धोकादायक ठरु पाहत आहे. पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. मात्र धोकादायक कालव्याच्या समस्यांचा निपटारा अद्याप झालेला नाही. येथील विद्यालयात परिसरातील डोंगरगाव, धारणगाव, देवगाव, भरवस, गोंदेगाव यासह पंचक्र ोशीतील वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. अनेकदा प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूने कालव्याच्या भिंतीवर शाळा सुटल्यानंतर शाळाबाह्य मुले बसलेली असतात. सदर चित्र धोकेदायक आहे. शाळेच्या जागेच्या मध्यातूनच कालवा गेल्याने विद्यार्थी संख्येचा विचार करता उपलब्ध मैदान अपुरे पडत आहे. विद्यालयाची नवीन इमारत बांधकामाच्या समोर लागून कालवा असल्याने विद्यार्थी त्यात पडून दुर्घटना घडू शकते. प्राथमिक विद्यालयाच्या मागील संरक्षक भिंतदेखील पडली आहे. सदर बाब ग्रामस्थांनी विद्यालयाच्या लक्षात आणून दिली असून विद्यार्थी हिताच्या दृष्टीने स्लॅब टाकण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पStudentविद्यार्थी