शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 18:23 IST

विंचूर : नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या विंचूर गावात रस्ते, स्वच्छता यासह मुलभुत समस्या ब-यापैकी मार्गी लागलेल्या असल्या तरी सरस्वतीच्या मंदिरात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांचा जीव मात्र पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात आला आहे. शाळा प्रांगणाच्या मधून गेलेला पाटबंधारे विभागाचा कालवा धोकादायक ठरु पाहत असून त्यावर स्लॅब नसल्याने तसेच संरक्षक भिंत पडल्याने विद्यार्थ्यांंसह पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. शालेय प्रशासनाने संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा करु नही दखल घेतली जात नसल्याने समस्यांचा फेरा कायम आहे.

येथील कर्मवीर विद्यालयाच्या प्रांगणामधून पाटबंधारे विभागाचा कालवा गेलेला आहे. शाळेत सुमारे तीन हजारांच्या आसपास पटसंख्या असल्याने दोन्ही प्रांगणात विद्यार्थ्यांंचा वावर असतो. कालव्याला पाणी आल्यास शाळेसह पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. सकाळी शाळा भरण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यानंतर अनेक मुले पाटालगत असलेल्या भिंतीवर बसलेली असतात. कालव्याला पाणी असल्यास सदर चित्र धोकेदायक असल्याने शाळा प्रशासन तसेच गावक-यांनी चिंता व्यक्त करीत भिंतीचे काम करणे तसेच शाळेच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या कालव्यावर स्लॅब टाकण्याची वारंवार विनंती करु णारे निवेदन देऊनही पाटबंधारे विभागाने त्याला केराची टोपली दाखवली आहे. परिणामी शाळा प्रशासन व गावक-यांनी पाटबंधारे विभागापुढे हात टेकले आहेत. शाळा प्रशासनाला विद्यार्थी सुरक्षिततेसाठी डोळ्यात तेल घालून लक्ष घालावे लागत असून, एखादी अनुचित घटना घडण्याची वाट संबंधित विभाग बघत आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थात विचारला जात आहे.शाळेची भव्यदिव्य इमारत असून नुतन इमारतीचे काम पुर्णत्वास आले आहे. भव्य असे प्रांगण असताना मधोमध असणारा कालवा धोकादायक ठरु पाहत आहे. पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. मात्र धोकादायक कालव्याच्या समस्यांचा निपटारा अद्याप झालेला नाही. येथील विद्यालयात परिसरातील डोंगरगाव, धारणगाव, देवगाव, भरवस, गोंदेगाव यासह पंचक्र ोशीतील वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. अनेकदा प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूने कालव्याच्या भिंतीवर शाळा सुटल्यानंतर शाळाबाह्य मुले बसलेली असतात. सदर चित्र धोकेदायक आहे. शाळेच्या जागेच्या मध्यातूनच कालवा गेल्याने विद्यार्थी संख्येचा विचार करता उपलब्ध मैदान अपुरे पडत आहे. विद्यालयाची नवीन इमारत बांधकामाच्या समोर लागून कालवा असल्याने विद्यार्थी त्यात पडून दुर्घटना घडू शकते. प्राथमिक विद्यालयाच्या मागील संरक्षक भिंतदेखील पडली आहे. सदर बाब ग्रामस्थांनी विद्यालयाच्या लक्षात आणून दिली असून विद्यार्थी हिताच्या दृष्टीने स्लॅब टाकण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पStudentविद्यार्थी