शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 18:23 IST

विंचूर : नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या विंचूर गावात रस्ते, स्वच्छता यासह मुलभुत समस्या ब-यापैकी मार्गी लागलेल्या असल्या तरी सरस्वतीच्या मंदिरात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांचा जीव मात्र पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात आला आहे. शाळा प्रांगणाच्या मधून गेलेला पाटबंधारे विभागाचा कालवा धोकादायक ठरु पाहत असून त्यावर स्लॅब नसल्याने तसेच संरक्षक भिंत पडल्याने विद्यार्थ्यांंसह पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. शालेय प्रशासनाने संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा करु नही दखल घेतली जात नसल्याने समस्यांचा फेरा कायम आहे.

येथील कर्मवीर विद्यालयाच्या प्रांगणामधून पाटबंधारे विभागाचा कालवा गेलेला आहे. शाळेत सुमारे तीन हजारांच्या आसपास पटसंख्या असल्याने दोन्ही प्रांगणात विद्यार्थ्यांंचा वावर असतो. कालव्याला पाणी आल्यास शाळेसह पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. सकाळी शाळा भरण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यानंतर अनेक मुले पाटालगत असलेल्या भिंतीवर बसलेली असतात. कालव्याला पाणी असल्यास सदर चित्र धोकेदायक असल्याने शाळा प्रशासन तसेच गावक-यांनी चिंता व्यक्त करीत भिंतीचे काम करणे तसेच शाळेच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या कालव्यावर स्लॅब टाकण्याची वारंवार विनंती करु णारे निवेदन देऊनही पाटबंधारे विभागाने त्याला केराची टोपली दाखवली आहे. परिणामी शाळा प्रशासन व गावक-यांनी पाटबंधारे विभागापुढे हात टेकले आहेत. शाळा प्रशासनाला विद्यार्थी सुरक्षिततेसाठी डोळ्यात तेल घालून लक्ष घालावे लागत असून, एखादी अनुचित घटना घडण्याची वाट संबंधित विभाग बघत आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थात विचारला जात आहे.शाळेची भव्यदिव्य इमारत असून नुतन इमारतीचे काम पुर्णत्वास आले आहे. भव्य असे प्रांगण असताना मधोमध असणारा कालवा धोकादायक ठरु पाहत आहे. पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. मात्र धोकादायक कालव्याच्या समस्यांचा निपटारा अद्याप झालेला नाही. येथील विद्यालयात परिसरातील डोंगरगाव, धारणगाव, देवगाव, भरवस, गोंदेगाव यासह पंचक्र ोशीतील वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. अनेकदा प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूने कालव्याच्या भिंतीवर शाळा सुटल्यानंतर शाळाबाह्य मुले बसलेली असतात. सदर चित्र धोकेदायक आहे. शाळेच्या जागेच्या मध्यातूनच कालवा गेल्याने विद्यार्थी संख्येचा विचार करता उपलब्ध मैदान अपुरे पडत आहे. विद्यालयाची नवीन इमारत बांधकामाच्या समोर लागून कालवा असल्याने विद्यार्थी त्यात पडून दुर्घटना घडू शकते. प्राथमिक विद्यालयाच्या मागील संरक्षक भिंतदेखील पडली आहे. सदर बाब ग्रामस्थांनी विद्यालयाच्या लक्षात आणून दिली असून विद्यार्थी हिताच्या दृष्टीने स्लॅब टाकण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पStudentविद्यार्थी