शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

कोरोनामुळे नाशिक शहरात अवघे १९ जणच गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 15:47 IST

नाशिक- शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या तीनशे पार केल्याने शहरात चिंतेचे वातावरण असले तरी प्रत्यक्षात मात्र, नऊ रूग्णांवरच खऱ्या अर्थाने गांभिर्याने उपचार सुरू आहेत. १६ रूग्णांना प्राणवायु पुरवला असून तीन रूग्णांवर जीव रक्षक प्रणालीव्दारे उपचार सुरू असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्रवारी (दि.५) दिली. महापालिकेने बाधीतांच्या संपर्कातील नागरीक शोधून त्यांचे नमुने घेण्यास प्रारंभ केल्याने उलट वेळेत रूग्ण आढळत असल्याने उपचार आणि निराकरण करणे देखील सोपे जात आहेत, त्यामुळे रूग्ण संख्येत वाढ झाल्याने काळजीचे कारण नाही असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देआयुक्त राधाकृष्ण गमे यांची माहिती अन्य रूग्णांंमध्ये प्राथमिक लक्षणे

नाशिक- शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या तीनशे पार केल्याने शहरात चिंतेचे वातावरण असले तरी प्रत्यक्षात मात्र, नऊ रूग्णांवरच खऱ्या अर्थाने गांभिर्याने उपचार सुरू आहेत. १६ रूग्णांना प्राणवायु पुरवला असून तीन रूग्णांवर जीव रक्षक प्रणालीव्दारे उपचार सुरू असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्रवारी (दि.५) दिली. महापालिकेने बाधीतांच्या संपर्कातील नागरीक शोधून त्यांचे नमुने घेण्यास प्रारंभ केल्याने उलट वेळेत रूग्ण आढळत असल्याने उपचार आणि निराकरण करणे देखील सोपे जात आहेत, त्यामुळे रूग्ण संख्येत वाढ झाल्याने काळजीचे कारण नाही असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

शहरात सुरवातीला कोरोनाबाधीतांची संख्या मर्यादीत होती. नंतर ती वाढली आहे. आता तर मृतांची संख्या १३ झाली असून बाधीतांची संख्या जवळपास सव्वा तीनशे इतकी झाली आहे. सध्या शहरात मालेगाव पेक्षा अधिक संख्येने बाधीत उपचार घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरात चिंता व्यक्त केली जात असली तरी आयुक्तांनी सांगितले की, एखाद्या भागात बाधीत आढळल्यानंतर त्या रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तातडीने नमुने घेतले जातात आणि प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यामुळे उलट महापालिका संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात धरून अगोदरच या व्यक्तींना कोरंटाईन करण्यात आले आहे.त्यामुळे ही जमेची बाब आहे. अर्थात सध्या जितके रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी दहा टक्के रूग्णांना देखील जीव रक्षक प्रणाली लावावी लागलेली नाही. प्राथमिक लक्षणे असतील तर संबंधीत संशयितांना घरीच ठेवा असे शासनाचे आदेश आहे. मात्र, त्यानंतर देखील महापालिका संबंधीतांन विलगीकरण कक्षात ठेवून उपचार करीत असल्याचे आयुक्तांनी सागिंतले.

सध्या महापालिकेने दाट वस्तीत कोरोना बाधीत आढळल्यानंतर त्याकडे विशे लक्ष पुरवण्याची भूमिका घेतली आहे. एकदा एखाद्या रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आणि नंतर चार दिवस काहीच त्रास झाला नाही तर संबंधीत रूग्णाला घरी पाठविण्याची देखील शासनाच्या नियमात तरतूद आहे. मात्र, तरीही दाट वस्तीतील रूग्णांना तत्काळ सोडले जात नाही. विशेषत: झोपडपट्टी भागात विलगीकरणाची सोय नसते. घरात वेगळे प्रसाधन गृह नसते अशा रूग्णांना लवकर डिस्चार्च दिला जात नसल्याचेही गमे म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका