शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोरोनामुळे लगीनसराई लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 10:37 PM

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात दि. १५, १६, २६ व २७ या चार लग्न तिथी असूनही कोरोनामुळे लग्न सोहळे मात्र रद्द झाले आहेत. राजापूर व परिसरातील मंडळींनी लग्न सोहळे पुढे ढकलले आहेत.

ठळक मुद्देयेवला परिसर : वधू-वर पक्षाने सोहळे केले स्थगित

राजापूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात दि. १५, १६, २६ व २७ या चार लग्न तिथी असूनही कोरोनामुळे लग्न सोहळे मात्र रद्द झाले आहेत. राजापूर व परिसरातील मंडळींनी लग्न सोहळे पुढे ढकलले आहेत.जमलेले लग्न व जमणार असलेल्या लग्नाच्या निमित्ताने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या नवरदेव-नवरींचा मात्र कोरोनामुळे लग्न लांबल्याने हिरमोड झाला आहे. वधू-वर पक्षाकडून लग्न कसे करणार यावर फोनवरून सध्या चर्चा होताना दिसत आहे. संचारबंदीने नवरीच्या गावाला जाता येईना अन् नवरदेवाच्या गावाला जाता येईना अशी स्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाउन, संचारबंदी १४ एप्रिलपर्यंत जाहीर झालेली असली तरी ती पुन्हा वाढण्याचीच चिन्हे असल्याने कोरोनाच्या भीतीपोटी कुणीही एप्रिल महिन्यातील लग्नतारखा धरण्यासाठी तयार नाही. कोरोनाने लग्नसराई लांबणीवर पडली असून याचा परिणाम लॉन्सचालक, मंडपवाले, वाजंत्रीवाले, आचारी, किराणा व्यापारी, फोटोग्राफर, गोंधळी आदी सर्वच घटकांवर जाणवू लागला आहे. कोरोनाने अनेकांचे रोजगारच ठप्प झाले आहे. तर हातावर पोट असणाऱ्या कारागिरांचे मात्र मोठे हाल होत आहेत.लग्न म्हणजे एक मोठा सोहळा असतो. दोन्हीकडच्या कुटुंबांमध्ये या निमित्ताने आनंदाला उधाण असते तर सामाजिक प्रतिष्ठेसाठी मोठा खर्चही केला जातो. एप्रिल बरोबरच येत्या मे महिन्यात लग्न तिथी असूनही वधू व वर पक्षाकडून दिवाळीनंतरच लग्नसोहळ्याचा विचार करू असे आश्वासन दिले जात असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.साखरपुडा झालेल्या नवदांपत्याला आता फोनवर बोलून दिवस मोजावे लागत आहेत तर नवीन लग्न जुळवाजुळवीही थांबली आहे. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात कुलदैवतांचा जागर करण्याची प्रथा आहे. जागरण गोंधळ घालण्याचा सध्या सीझन असताना कोरोनाने मात्र जागरण गोंधळ घालणाºया कलाकारांवर उपासमारीची वेळ आणली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न