शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

सिन्नर तालुक्यात थंडीमुळे जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: January 23, 2016 22:50 IST

नायगाव खोरे : रब्बीची पिके तरारल्याने शेतकऱ्यांत समाधान

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडीमुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मात्र, रब्बी हंगामातील पिके गारव्याने तरारली असल्याने शेतकरी-वर्गात समाधान व्यक्त होत आहे.आठवडाभरापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊन कडाक्याच्या थंडीचे आगमन झाले आहे. दिवसभरही जाणवणाऱ्या जोरदार थंडीमुळे दैनंदिन कामकाजाचे नियोजन कोलमडून पडत असल्याचे चित्र आहे. दिवसभरातील गारव्यासह सायंकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत हुडहुडी भरवणारी थंडी दररोज पडत असल्यामुळे नित्याच्या दिनक्रमासह व्यवहारिक कामेही उशिराने सुरू होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वच कामांचे वेळापत्रक विस्कटले आहे. थंडीपासून बचाव करणारे सर्व साधने या थंडीच्या कडाक्यात कुचकामी ठरत असल्याचे बोलले जात आहे. सकाळी दहा - अकरा वाजेपर्यंत सर्वत्र शेकोट्या पेटलेल्या दिसत असून, जनजीवनावर थंडीचा परिणाम दिसून येत आहे.माणसांपेक्षा जनावरे व पक्ष्यांवर थंडीचा परिणाम जास्त दिसून येत आहे. पाळीव जनावरांच्या तुलनेत मोकाट जनावरे व कुत्र्यांना त्याचा अधिक फटका बसत आहे. सकाळच्या वेळेत शाळेत जाणारे विद्यार्थी व चाकरमान्यांना वेळेचे बंधन पाळताना चांगलीच धावपळ करावी लागत आहे. गेल्या काही दिवसांतल्या ढगाळ वातावरणामुळे खराब झालेली रब्बीतील पिके थंडीमुळे चांगलीच तरारली आहेत. दररोज वाढणाऱ्या थंडीमुळे पिकांवरील विविध कीटक, मावा, तुडतुड्यांचा प्रभाव कमी पडत असल्याने शेतमालात सुधारणा होतांना दिसून येत आहे. रब्बीच्या उत्पादनावर चांगला परिणाम दिसणार असल्याचे बोलले जात आहे. शेतमालाबरोबरच आरोग्यासाठीही हितावह असणाऱ्या थंडीचे प्रमाण वाढत राहिल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. (वार्ताहर)