शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
2
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
3
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
4
गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
5
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
6
मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
7
Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
8
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
9
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
10
ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU Machine नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या
11
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
12
Virat Kohli New Record : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत विराटच ‘धुरंधर’! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
13
वेदांताच्या शेअर्सचा विक्रमी उच्चांक: ४ दिवसांत १३% वाढ; 'नुवामा'कडून ८०६ रुपयांचं नवं टार्गेट
14
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
15
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
16
Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत; उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी
17
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
18
PADU Machine: "मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
19
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
20
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात थंडीमुळे जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: January 23, 2016 22:50 IST

नायगाव खोरे : रब्बीची पिके तरारल्याने शेतकऱ्यांत समाधान

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडीमुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मात्र, रब्बी हंगामातील पिके गारव्याने तरारली असल्याने शेतकरी-वर्गात समाधान व्यक्त होत आहे.आठवडाभरापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊन कडाक्याच्या थंडीचे आगमन झाले आहे. दिवसभरही जाणवणाऱ्या जोरदार थंडीमुळे दैनंदिन कामकाजाचे नियोजन कोलमडून पडत असल्याचे चित्र आहे. दिवसभरातील गारव्यासह सायंकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत हुडहुडी भरवणारी थंडी दररोज पडत असल्यामुळे नित्याच्या दिनक्रमासह व्यवहारिक कामेही उशिराने सुरू होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वच कामांचे वेळापत्रक विस्कटले आहे. थंडीपासून बचाव करणारे सर्व साधने या थंडीच्या कडाक्यात कुचकामी ठरत असल्याचे बोलले जात आहे. सकाळी दहा - अकरा वाजेपर्यंत सर्वत्र शेकोट्या पेटलेल्या दिसत असून, जनजीवनावर थंडीचा परिणाम दिसून येत आहे.माणसांपेक्षा जनावरे व पक्ष्यांवर थंडीचा परिणाम जास्त दिसून येत आहे. पाळीव जनावरांच्या तुलनेत मोकाट जनावरे व कुत्र्यांना त्याचा अधिक फटका बसत आहे. सकाळच्या वेळेत शाळेत जाणारे विद्यार्थी व चाकरमान्यांना वेळेचे बंधन पाळताना चांगलीच धावपळ करावी लागत आहे. गेल्या काही दिवसांतल्या ढगाळ वातावरणामुळे खराब झालेली रब्बीतील पिके थंडीमुळे चांगलीच तरारली आहेत. दररोज वाढणाऱ्या थंडीमुळे पिकांवरील विविध कीटक, मावा, तुडतुड्यांचा प्रभाव कमी पडत असल्याने शेतमालात सुधारणा होतांना दिसून येत आहे. रब्बीच्या उत्पादनावर चांगला परिणाम दिसणार असल्याचे बोलले जात आहे. शेतमालाबरोबरच आरोग्यासाठीही हितावह असणाऱ्या थंडीचे प्रमाण वाढत राहिल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. (वार्ताहर)