शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

धरण उशाशी कोरड घशाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:16 PM

गंगापूर परिसर : गिरणारे जवळील इंदिरानगर गाळूंशी गावातील लोकांची पाण्यासाठी भटकंती

ठळक मुद्देगंगापूर परिसर : गिरणारे जवळील इंदिरानगर गाळूंशी गावातील लोकांची पाण्यासाठी भटकंती

नाशिक- तालुक्यातील इंदिरानगर गाळूंशीच्या ग्रामस्थांना कश्यपीसारख्या धरणाचा शेजार असूनही पाण्याविना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पाण्याबरोबरच इतरही मुलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रासले आहेत. ग्रामपंचायतीत म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याचा आरोप पंचायतीच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी केला आहे. आरोग्य, पाणी ,वीज ,अश्या अनेक समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.डोंगरावर वसलेल्या इंदिरानगर गाळूंशी गावाच्या पायथ्याशीच कश्यपी धरण असूनही गाव तहानलेले आहे.गिरणारे पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हे ग्रुप ग्रामपंचायतीचे गाव धोंडेगाव पासून सण २०१६ मध्ये विभक्त होऊन नवीन ग्रामपंचायतीची स्थापना झाली. गावात दोन हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात सात ग्रामपंचायत सदस्य असून देखील शासनाच्या वतीने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविता आल्या नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसते आहे. महिलांना रोज सकाळी पहाटे तीन वाजता उठून दिड किलोमीटर पायी जाऊन पाण्यासाठी वणवण करावी लागते. शासनाच्या वतीने या गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. त्यात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीतून पाणी विद्युत मोटारीच्या सहाय्याने टाकी पर्यंत पोहोचवले जाते. परंतु विहिरीतच पाणी शिल्लक नसल्याने पाणी टाकीत जाणार कसे असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे . वारंवार विद्युत मोटर नादुरु स्त होत असल्याने व ती दुरु स्त करण्यासाठी कित्येक दिवस वाट बघावी लागते. ग्रामसेवक बहुतकवेळा कार्यालयात अनुपस्थित असतो. त्यामुळे मोटार दुरुस्तीची तक्रार कोणाकडे करायची व त्याकडे कोण लक्ष देईल असा प्रश्न पडतो. याबाबत शासनाच्या वतीने एकदाच कायमस्वरूपी व्यवस्था करावी जेणेकरून ग्रामस्थांना वारंवार या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही अशी मागणी पुढे येत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हरी बेंडकोळी ,वामन बेंडकोळी, पांडू पारधी, काशिनाथ येराळे, आभळू बेंडकोळी, निवृत्ती बेंडकोली आदी ग्रामस्थांनी आपली समस्या मांडली.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी