शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मक्याच्या पोंग्याला बाटलीतून औषध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 16:44 IST

लष्करी अळीचा प्रादुर्भाव : पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

ठळक मुद्देमक्याला दोनदा औषधांची फवारणी करून देखील लष्करी अळीवर नियंत्रण मिळविता आलेले नाही

मानोरी : येवला तालुक्यात पाऊस मध्यम स्वरूपाचा पडत असला तरी यंदा मका पीक जगविण्यासाठी धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. तीस दिवसांच्या मकाला प्रति एकर पंधरा हजार रु पयांपेक्षा अधिक खर्च येत असून मक्याला दोनदा औषधांची फवारणी करून देखील लष्करी अळीवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी वर्गाने एक लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या भरून शेतातील प्रत्येक मक्याच्या झाडाच्या पोंग्यात औषध सोडण्याचा प्रयोग सुरू केला आहे.मकाच्या पोंग्यात थेट औषध टाकल्याने लष्करी अळीवर काही प्रमाणात नियंत्रण येत असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगितले जात आहे. याआधी दोनदा औषध फवारणी करून झालेला खर्च पाण्यात गेला असून पाण्याच्या बाटलीचा औषध टाकण्यासाठीचा प्रयोग लाभदायक ठरतांना दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच येवला तालुक्यात राज्याचे प्रधान कृषी सचिव एकनाथ डवले यांनी लष्करी अळी ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतक-यांनी त्यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तीस दिवसांच्या मक्याला लष्करीअळीने घेरले असून या लष्करी अळीचा नायनाट करण्यासाठी तीन वेळेला औषध फवारणी करूनही औषधे अधिक प्रमाणात कडवट असल्याचे बोलले जात आहे. त्याचा परिणाम जनावरांच्या चा-यावर होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाड्यावस्त्यावर अद्यापही काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. मध्यम ते तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने शेतातील विहिरींना अद्याप त्याचा फायदा झालेला नाही.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी