शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

दिलासा : कसमादे पट्ट्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; आवर्तनादरम्यान राहाणार भारनियमन चणकापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:11 AM

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी आज दिले.

ठळक मुद्दे५०० दशलक्ष घनफूट बिगर सिंचनासाठी आवर्तन देणे शक्य ठराव जोडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी आज दिले. आर्वतनाच्या माध्यमातून गिरणा नदीपात्रात १० दिवस १००० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येणार असल्याने कसमादे पट्ट्यातील गिरणा काठाला दिलासा मिळाला आहे. चणकापूर धरणातून कळवण नगरपंचायत, सटाणा नगर परिषद, देवळा ग्रामीण पाणीपुरवठा योजना, दाभाडी बारा गाव पाणीपुरवठा योजना, लखमापूर, ब्राह्मणगाव, लोहोणेर, ठेंगोडा आदी पाणीपुरवठा योजनांसाठी ५०० दशलक्ष घनफूट बिगर सिंचनासाठी आवर्तन देणे शक्य असल्याचा अहवाल मालेगाव पाटबंधारे विभागाने नाशिकचे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांना सादर केला होता. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी चणकापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश मालेगाव पाटबंधारे विभागाला दिल्याने कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. चणकापूर धरणातून पाणी सोडून कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत आमदार डॉ.राहुल अहेर, जिल्हा बँक अध्यक्ष केदा अहेर, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार यांनी राधाकृष्णन यांच्याकडे मागणी केली होती. संबंधित गावांचे पाणी मागणीचे ठराव जोडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. दि. १० ते १९ एप्रिलपर्यंत दहा दिवस पाण्याचे आवर्तन चालणार असून, या काळात अनधिकृत उपसा करणाºया विद्युत पंपांचा वीजपुरवठा खंडित करावा, आवर्तन कालावधीत पाणीपुरवठा योजना चालू ठेवून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्या आहेत. आवर्तन काळात इंधनावर चालणारे व वीजपंप जप्त करण्याची कारवाई पाटबंधारे विभागाने तातडीने करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. आवर्तनादरम्यान पाण्याचा सिंचनासाठी वापर होणार नाही याबाबत पाटबंधारे विभागाच्या समन्वयाने वीज वितरण कंपनीने भारनियमन करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे. आवर्तन काळात आदेशाचे पालन न करता मनमानी करणाºयांना प्रशासनाच्या वतीने चाप लावला जाणार असून, याबाबत वीज वितरण कंपनी, मालेगाव पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन यांना याबाबत सुचित करण्यात आले आहे.