शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

जनावरांना दुष्काळाची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 5:27 PM

खमताणे : बागलाण तालुक्यात खमताणे, मुंजवाड, तिळवण, कंधाणे नवेगाव परिसरात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. या भागातील तब्बल दोन हजार जनावरे चारा-पाण्याअभावी भुकेचे बळी ठरण्याच्या मार्गावर आहेत, तर काही जनावरे दगावली आहेत. त्यामुळे या मुक्या जनावरांसाठी त्वरित चारा छावण्या आणि पाण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देबागलाण : चारा-पाण्याअभावी उपासमार ; दुध व्यवसाय धोक्यात

खमताणे : बागलाण तालुक्यात खमताणे, मुंजवाड, तिळवण, कंधाणे नवेगाव परिसरात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. या भागातील तब्बल दोन हजार जनावरे चारा-पाण्याअभावी भुकेचे बळी ठरण्याच्या मार्गावर आहेत, तर काही जनावरे दगावली आहेत. त्यामुळे या मुक्या जनावरांसाठी त्वरित चारा छावण्या आणि पाण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.गायी, म्हशीना चारण्यासाठी मुबलक रान राहिले नाही. पावसाचे प्रमाण कमी होत चालल्याने चाराटंचाई जाणवु लागली आहे. जनावरांच्या किमतीही वाढल्या. घराघरांत फीज आल्याने बाजारात दुधाच्या पिशव्या मिळु लागल्याने दुध व्यवसायाकडे शेतकऱ्यांने पाठ फिरवल्यामुळे दुधटंचाई जाणवु लागली आहेत.मार्च महिन्यातच उन्हाच्या तीव्रतेने ४० अंशाचा पारा गाठल्याने या भागातील पाण्याचे स्रोत आटुन तीव्र पाणीटंचाईसह जनावरांच्या वैरणाचा प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. बागलाण तालुक्यात येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती पशुपालन आहे. बहूंताश कुटुंब हे रोजंदारी शेतमजुरीसाठी बाहेरगावी जात असल्याने दिवसा संपूर्ण गावे निर्मनुष्य होते. पावसाळी शेत पिकावर अवलंबून असलेले येथील जनतेकडे मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षापासून या भागातील पर्जन्यमान घटल्याने या वर्षी या गावांमधील जनता भीषण दुष्काळाचा सामना करीत आहे. अनेकांचे महागडे पशुधन चारा पाण्याअभावी मरणयातना सहन करित आहे. दररोज सकाळी खपाटीला आलेले पोट घेऊन ही जनावरे चारा पाण्याच्या शोधात भटकंती करण्यासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत जर या जनावरांना चारा उपलब्ध झाला नाही तर पशुधन संकटात सापडून मोठे नुकसान होऊ शकते.सध्या दुष्काळाने गंभीर रूप धारण केले असून, जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने या भागात चारा छावणी सुरू कराव्यात.- नितीन ईगंले,पशुपालक शेतकरी, खमताणे.