शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

धरणांच्या तालुक्याला पिण्याच्या पाण्याची वानवा

By admin | Updated: April 24, 2017 01:10 IST

इगतपुरी तालुक्यातील ठाणे,पालघर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या गावांना पाणीटंचाईच्या झळा बसणे ही दरवर्षाची नित्याची बाब ठरली आहे

 सुनील शिंदे घोटीनिम्म्या महाराष्ट्रासह मुंबई महानगरची तहान भागविणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील ठाणे,पालघर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या गावांना पाणीटंचाईच्या झळा बसणे ही दरवर्षाची नित्याची बाब ठरली आहे. शासनाची नियोजनशून्यता, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष व ग्रामसेवक आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मनमानीपणा यामुळे या टंचाईग्रस्त गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागत नाही ही शोकांतिका आहे.अनेक धरणे आणि पर्जन्याचा तालुका अशी इगतपुरी तालुक्याची ओळख आहे. मार्च महिन्यातच राज्याच्या राजधानीला पाणी पुरवणाऱ्या या तालुक्याला पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे. अनेक वर्षांपासून तालुक्यातील अनेक गावांतील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागण्याची स्थिती बदललेली नाही. असे असताना नेहमीच पाणीटंचाईने ग्रासलेल्या गावांच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची भूमिका उदासीन आहे. पाणीप्रश्नावर निवडणुका लढवून त्यानंतर गंभीरपणे या प्रश्नाकडे कोणी पाहत नसल्याने दरवर्षी ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे यंदाही तालुक्याची ओळख तृषार्त तालुका अशीच राहण्याची दाट शक्यता आहे. पाणीटंचाईचा निकष ठरवताना असलेली नियमावली अनेक वाड्या पाड्यांना जाचक ठरत आहे.इगतपुरी तालुक्यातील दारणा नदीलगत आण िलहान, मोठ्या धरणालगत असणार्या अनेक गावांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची स्थिती आहे. महिलांना पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत गावापासून दूरवर अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागते.गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही तालुक्याला संभाव्य स्थितीत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. मार्च मिहन्यातच इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांत वाड्यापाड्यांत कृत्रिम पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. पूर्व भागातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने येथील महिला वर्गासह शाळकरी विद्यार्थ्यांनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.इगतपुरी तालुक्यात अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवण्याची क्षमता असूनही हा पाण्याचा तालुका आज तहानलेला आहे. गेल्या महिन्याभरापासून अनेक गावांत पाणीटंचाईच्या तीव्र झळा लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर विविध गावांतील अनेक योजना आज कुचकामी ठरल्याने पाणीटंचाईचे गांभीर्य वाढले आहे.तालुक्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नी उदासीनता दाखवली तर मुख्यालयी न राहणाऱ्या ग्रामसेवक आणि तलाठ्यांना पाणीटंचाईची जाणीव होणार तरी कशी, असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.पावसाचे माहेरघर व पावसाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्याला पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे. हा तालुका डोंगराळ व खडकाळ भागाचा असल्याने ग्रामीण भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. बहुतांश पाण्याचे स्रोत आटल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. टाकेद, खेड परिसरातील अनेक गांवानी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. वैतरणा परिसरातही अनेक गावांत आज कृत्रिम पाणीटंचाई जाणवत आहे.