शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शहरातील गुन्हेगारीत दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:34 IST

नाशिक : ( अझहर शेख )कोरोना आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल केले गेले आहे. सरकारकडून पुन्हा जनजीवन पूर्वपदावर आणले जात असताना शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत मे महिन्यात मात्र गुन्हेगारी ‘अनलॉक’ झाल्याचे दिसून येत आहे.

नाशिक : ( अझहर शेख )कोरोना आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल केले गेले आहे. सरकारकडून पुन्हा जनजीवन पूर्वपदावर आणले जात असताना शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत मे महिन्यात मात्र गुन्हेगारी ‘अनलॉक’ झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिलच्या तुलनेत गेल्या महिन्यात गुन्हेगारीचा आलेख उंचावला. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा राज्यापाठोपाठ केंद्र सरकारकडून केली गेली आणि नागरिक आपापल्या घरात बंदिस्त झाले. रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला, गजबजणाऱ्या बाजारपेठा ओस पडल्या सर्व व्यवहार ठप्प झाले आणि सर्वत्र ‘लॉकडाऊन’ दिसून आले. यामुळे हळूहळू मार्च व एप्रिलमध्ये घात, अपघातासोबत अन्यप्रकारची गुन्हेगारीसुद्धा ‘लॉक’ झाल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत होते. या लॉकडाऊनच्या काळात शहर गुन्हे शाखेने काही सराईत गुन्हेगारांच्या मुसक्यासुद्धा बांधल्या; मात्र जेव्हापासून अनलॉकची घोषणा झाली आणि राज्यात सर्वत्र लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून पुन्हा गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.एप्रिलमध्ये शहरात तीन प्राणघातक हल्ले झाले, तर मे महिन्यात या प्रकाराचे नऊ गुन्हे घडले. शहरात एप्रिलमध्ये दोनवेळा जबरी चोरीचा गुन्हा घडला, तर मे महिन्यात दहा जबरी चोरीचे गुन्हे घडले. घरफोड्यांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये आणि अनलॉकमध्ये सारखेच राहिल्याचे दिसते. तसेच अपहरणाचे प्रकार आणि रस्ते अपघाताच्या दुर्घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसते.चालू महिन्याच्या पंधरवड्यातसुद्धा हाणामारी, बलात्कार, विनयभंग, घरफोडी, वाहनचोरीसारख्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. तसेच वाहनांची जाळपोळ, तोडफोड, दंगलीसारखे गुन्हेसुद्धा घडले आहेत. जाखोरीमध्ये, तर पतीने पत्नीची कोयत्याने हत्त्या केल्याचे उघडकीस आले.-------------------------महिलासुरक्षेचाप्रश्न गंभीरलॉकडाऊन काळातमहिलांवरील हिंसाचाराबाबत जनजागृतीचा प्रयत्न केला गेला मात्र १९ विनयभंगाच्या, तर दहा बलात्काराच्या घटना आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्या. तसेच अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे दहा प्रकार समोर आले.-------------------रस्ते अपघातात१४ लोकांचा मृत्यूलॉकडाऊन काळात रस्ते अपघाताचे प्रमाण अगदी नगण्य झाले होते; कारण अत्यावश्यक सेवेतील वाहनांचा अपवाद वगळता रस्त्यांवरून सर्व प्रकारची वाहने गायब झाली होती; मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा अपघातांचे सत्र सुरू झाले. अपघातात १४ लोकांचे प्राण मे महिन्यात गेले. एप्रिलमध्ये अपघातात केवळ तीन लोकांचा मृत्यू झाला होता.---------------पोलीसगस्तीचा होता धाकनाशिक शहरात लॉकडाऊन काळात सातत्याने पोलिसांची गस्त सुरू होती. पोलीस वाहनांच्या उद््घोषणा सुरू होत्या. यामुळे पोलिसांचा धाक निर्माण झाला होता; मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पोलीसग्रस्तीचे प्रमाणही कमी झाले; यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येते. २४ तास शहरातील रस्त्यांवर पोलीस दिसत होते. ठिकठिकाणी नाकाबंदी आणि पोलीस नजरेस पडत असल्यामुळे गुन्हेगारांना जरब बसला होता.

 

टॅग्स :Nashikनाशिक