शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

‘राह पर दौडना हैं, मंजिल का सोचा नही’: ठाणे मॅरेथॉन विजेती आरती पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:17 IST

नाशिक-  मॅरेथॉन स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी एक मैलाचा दगड रोवला आहे. देशांर्गत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या नावाची पताका निर्विवाद झळकत राहिली आहे. तशी ती ठाणे मॅरेथॉनमध्येही फडकली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी नेहमीच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कविता राऊत हिने सुरू केलेला हा सिलसिला आजही सुरू आहे. ठाण्याच्या ट्रॅकवर कविताप्रमाणेच मोनिका, संजीवनी ,पूनम यांनी वर्चस्वाची परंपरा कायम राखली. या साखळीत आता आणखी आरती पाटीलचे नाव प्राधान्याने समोर आले आहे.

ठळक मुद्देनाशिकच्या अ‍ॅथलेटीकसाठी एक विजय गरजेचा होताथांबायचे नाही, खुप मिळवायचे आहे

नाशिकमॅरेथॉन स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी एक मैलाचा दगड रोवला आहे. देशांर्गत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या नावाची पताका निर्विवाद झळकत राहिली आहे. तशी ती ठाणे मॅरेथॉनमध्येही फडकली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी नेहमीच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कविता राऊत हिने सुरू केलेला हा सिलसिला आजही सुरू आहे. ठाण्याच्या ट्रॅकवर कविताप्रमाणेच मोनिका, संजीवनी ,पूनम यांनी वर्चस्वाची परंपरा कायम राखली. या साखळीत आता आणखी आरती पाटीलचे नाव प्राधान्याने समोर आले आहे. नुकतीच ठााणे मॅरॅथॉन स्पर्धा जिंकणा-या आरती पाटील हिच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : ठाणे मॅरेथॉन तुझ्यासाठी नवीन नाही, यापूर्वीदेखील ही स्पर्धा जिंकलेली आहे. हा विजय तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे.पाटील : ठाणे मॅरेथॉन यापूर्वी मी २०१७ मध्ये जिंंकलेली आहे. त्यानंतरही अनेक मॅरेथॉनमध्ये नाशिकचे नाव उंचावता आले आहे. यश, अपयश हा खेळाचा एक भाग आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत एका मोठ्या विजयाची गरज होती. नाशिकसाठी आणि अन्य धावपटूंनादेखील बुस्ट मिळण्यासाठी हे गरजेचे होते. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या अ‍ॅथलेटिक्ससाठी मोठ्या विजयाची गरज होती. या विजयामुळे माझ्यासह सर्वांना ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे सर्वांसाठीच या विजयाचे जास्त कौतुक आहे.

प्रश्न : तुझ्या खेळातील सातत्य आणि कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे. तुझ्या कामगिरीकडे तू कसे बघते.पाटील : इयत्ता पाचवीपासून मी खेळायला सुरुवात केलेली आहे. आज दहा वर्षे पूर्ण झाली असून, मागे वळून पाहिले तर खूप मोठा पल्ला अजूनही गाठायचा असल्यामुळे मला अजून थांबायचे नाही. खूप काही करायचे आहे, मिळवायचे आहे. कविता, मोनिका, संजीवनी यांचा आदर्श आणि मार्गदर्शन असल्यामुळे तर आणखीनच उत्साह संचारतो. तरीही खूप मोठा असा विचार केलेला नाही. सध्या एव्हढेच समजते की ‘राह पर दौडना हैं, मंजिल का सोचा नही’, त्यामुळे लागलीच फार मोठे स्वप्न सांगता येणार नाही. परंतु आलेल्या प्रत्येक स्पर्धेचा सराव मात्र कसून करते.

प्रश्न : सराव आणि शिक्षण याचा ताळमेळ तू कसा साधते? दिनचर्या कशी आहे?पाटील : सरावात सातत्य ठेवावेच लागते, प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांचे गुरूतुल्य मार्गदर्शन असल्यामुळे सरावाचे योग्य सूत्र साधत नियमित रोज सकाळी दोन तास सराव, त्यानंतर डायट, दुपारी कॉलेज, त्यानंतर दुपारी पूर्णपणे आराम आणि सायंकाळी पुन्हा दोन तास सराव. सरावानंतर अभ्यास असा रोजचा दिनक्रम आहे.मुलाखत : संदीप भालेराव 

टॅग्स :NashikनाशिकthaneठाणेMarathonमॅरेथॉन