शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

वटार येथे डोगरऱ्यादेव उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 16:14 IST

वटार : आदिवासी बांधवाचे हे व्रत अत्यंत कड़क असते. या उत्सवात आदिवासि कुटुंबातील एक व्यक्ति पंधारा दिवस सहभागी होतो. हा उत्सव मार्गशीष महिन्यात येतो. या महिन्यात कड़क हिवाळा असतो. हां उत्सव आदिवासी वस्तीच्या मघ्येभागी उघड्यावर असतो.या जागेवर बाबू किवा काठा उभे करून कूपन केले जाते.

ठळक मुद्देआदिवाशी बांधवासह ग्रामस्थामध्ये उत्साह

वटार : आदिवासी बांधवाचे हे व्रत अत्यंत कड़क असते. या उत्सवात आदिवासि कुटुंबातील एक व्यक्ति पंधारा दिवस सहभागी होतो. हा उत्सव मार्गशीष महिन्यात येतो. या महिन्यात कड़क हिवाळा असतो. हां उत्सव आदिवासी वस्तीच्या मघ्येभागी उघड्यावर असतो.या जागेवर बाबू किवा काठा उभे करून कूपन केले जाते.

यात एक प्रवेश द्वार असते.याला आदिवाशी बांधव खळी असे मानतात.या खळीच्या मघ्येभागी मांडवटाकला जातो.या मांडवाच्या मघ्येभागी देवदाडा उभा करून त्यास झेंडूच्या फुलाच्या माळा बांधल्या जाता. रात्री या ठिकाणी रात्रभर जागरण करून आदि लयबद्ध चालिवर नाचतात.या उत्सवात रात्रि देवदेवताचे कथन केले जाते.त्यासाठी थाळी लावण्यात येत.

 थाळी म्हणजे कासाच्या मोठ्या ताटात डांबर लावून मघ्येभागी कुरसानीच्या झाडाची काठी लावली जाते.या काड़ीवर जोरात हात वरून खाली ओडल्यावर लयबद्ध असा आवाज येतो.याला ग्रामीण भागात थाळकर मनतांत.हां देवदेवताच्या कथा या थाळीच्या लयबद्ध आवाजात सांगतो त्यास साथ दोन माणसे देतात. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या लोकांना सांगतातया उत्सावा सहभागी झालेल्या व्यक्ति भाया म्हणून संबोधले जाते. या उत्सवातील लोकांना पहाटे लवकर उठून थंड पाण्याने अंघोळ कारावी लागते.हे दिवसभर परिसरातील गावागावात जाऊंन घरासमोर डोगऱ्यादेवाच्या नावाचा गोल फेरा धरून नाचतात म्हणून शेतकरी यांना शिधा म्हणून धान्य देतात.दिवसभर उपवास असल्याने काही शेतकरी यांना गुळ-शेनदाणे देतात.दिवसभर फिरून झाल्यावर रात्री पुन्हा आपल्या खळीवर येतात.हा उत्सव पंधरा दिवसाच्या असतो. या देवाचे व्रत करणाऱ्या सर्व भाविकाना रात्री मक्याची कोंडी,बिगर तेलाची भाजी,ज्वारी किवा नागलीची भाकर देतात. असा हां पंधरा दिवस उत्सव चालतो.या उत्सवाची सांगता मार्गशीष माहिन्याच्या पोर्णिमाला होतो.या पोर्णिमेच्या आगल्या दिवशी रात्री डोगरातिल देवतेच्या ठिकाणी गड घेण्यासाठी जातात.या ठिकाणी रात्री कोंबड़ा सोडला जातो.ज्या ठिकाणी गड असतो.तेथील गुहला रात्री बांबूच्या काठ्या लावल्या जातात.या पोर्णिमेच्या दिवशी तेथील गुहा उघडली जाते.तेव्हा या डोगऱ्यादेव उत्सवातील पाच भाया आत मघ्ये जाऊन तेथील देवताचे पूजन करून गडामघुन पाण्याचा हंडा भरून आनतात.

 जर व्रताचा नियम चूकला तर या मघ्ये गेलेल्या पाच भाया गडा दरवाजा बंद होऊन मघ्ये अटकल्या जातात.तेव्हा पुन्हा तिसऱ्या वर्षी हां उत्सव केल्यावर त्या वेळेस परत जीवंत निघतात अशी या व्रताची आख्यायिका आहेया नंतर प्रसादा कार्यक्रम ठेवला जातो. तेव्हा गावतील सर्व लोकांना या प्रसादासाठी आमंत्रित केलं जाते. हा कार्यक्रम मोठा खर्चिक असून कार्य करणाऱ्यास एक ते दिड लाखापर्यत खर्च येतो.कोट:-आमचे हां डोगऱ्यादेव उत्सव आमच्या वडिलोपार्जित आहे. या व्रताच्या कालावधी घरात प्रवेश करीत नाही.शिव ओलांडत नाही.पंधरा दिवस कड़क उपवास करावा लागतो.भूतलावरील वनस्पती,वन्यजीव ,यांचे संरक्षण संवर्धन व्हावे.मानवजातीचे कल्याण व्हावे.या गावातील,वस्तीतिल सर्व लोकांचे आरोग्य सुखसंपदा भरभराटीव्हावे सर्व लोक सुखसमृदिने नंदावे म्हणून हे व्रत दर तीन वर्षांनी केले जाते- तात्याभाऊ सोनवणे. वटार येथील डोगऱ्यादेव उत्सवात सहभागी झालेले आदिवाशी बांधव. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासSocialसामाजिक