शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वटार येथे डोगरऱ्यादेव उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 16:14 IST

वटार : आदिवासी बांधवाचे हे व्रत अत्यंत कड़क असते. या उत्सवात आदिवासि कुटुंबातील एक व्यक्ति पंधारा दिवस सहभागी होतो. हा उत्सव मार्गशीष महिन्यात येतो. या महिन्यात कड़क हिवाळा असतो. हां उत्सव आदिवासी वस्तीच्या मघ्येभागी उघड्यावर असतो.या जागेवर बाबू किवा काठा उभे करून कूपन केले जाते.

ठळक मुद्देआदिवाशी बांधवासह ग्रामस्थामध्ये उत्साह

वटार : आदिवासी बांधवाचे हे व्रत अत्यंत कड़क असते. या उत्सवात आदिवासि कुटुंबातील एक व्यक्ति पंधारा दिवस सहभागी होतो. हा उत्सव मार्गशीष महिन्यात येतो. या महिन्यात कड़क हिवाळा असतो. हां उत्सव आदिवासी वस्तीच्या मघ्येभागी उघड्यावर असतो.या जागेवर बाबू किवा काठा उभे करून कूपन केले जाते.

यात एक प्रवेश द्वार असते.याला आदिवाशी बांधव खळी असे मानतात.या खळीच्या मघ्येभागी मांडवटाकला जातो.या मांडवाच्या मघ्येभागी देवदाडा उभा करून त्यास झेंडूच्या फुलाच्या माळा बांधल्या जाता. रात्री या ठिकाणी रात्रभर जागरण करून आदि लयबद्ध चालिवर नाचतात.या उत्सवात रात्रि देवदेवताचे कथन केले जाते.त्यासाठी थाळी लावण्यात येत.

 थाळी म्हणजे कासाच्या मोठ्या ताटात डांबर लावून मघ्येभागी कुरसानीच्या झाडाची काठी लावली जाते.या काड़ीवर जोरात हात वरून खाली ओडल्यावर लयबद्ध असा आवाज येतो.याला ग्रामीण भागात थाळकर मनतांत.हां देवदेवताच्या कथा या थाळीच्या लयबद्ध आवाजात सांगतो त्यास साथ दोन माणसे देतात. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या लोकांना सांगतातया उत्सावा सहभागी झालेल्या व्यक्ति भाया म्हणून संबोधले जाते. या उत्सवातील लोकांना पहाटे लवकर उठून थंड पाण्याने अंघोळ कारावी लागते.हे दिवसभर परिसरातील गावागावात जाऊंन घरासमोर डोगऱ्यादेवाच्या नावाचा गोल फेरा धरून नाचतात म्हणून शेतकरी यांना शिधा म्हणून धान्य देतात.दिवसभर उपवास असल्याने काही शेतकरी यांना गुळ-शेनदाणे देतात.दिवसभर फिरून झाल्यावर रात्री पुन्हा आपल्या खळीवर येतात.हा उत्सव पंधरा दिवसाच्या असतो. या देवाचे व्रत करणाऱ्या सर्व भाविकाना रात्री मक्याची कोंडी,बिगर तेलाची भाजी,ज्वारी किवा नागलीची भाकर देतात. असा हां पंधरा दिवस उत्सव चालतो.या उत्सवाची सांगता मार्गशीष माहिन्याच्या पोर्णिमाला होतो.या पोर्णिमेच्या आगल्या दिवशी रात्री डोगरातिल देवतेच्या ठिकाणी गड घेण्यासाठी जातात.या ठिकाणी रात्री कोंबड़ा सोडला जातो.ज्या ठिकाणी गड असतो.तेथील गुहला रात्री बांबूच्या काठ्या लावल्या जातात.या पोर्णिमेच्या दिवशी तेथील गुहा उघडली जाते.तेव्हा या डोगऱ्यादेव उत्सवातील पाच भाया आत मघ्ये जाऊन तेथील देवताचे पूजन करून गडामघुन पाण्याचा हंडा भरून आनतात.

 जर व्रताचा नियम चूकला तर या मघ्ये गेलेल्या पाच भाया गडा दरवाजा बंद होऊन मघ्ये अटकल्या जातात.तेव्हा पुन्हा तिसऱ्या वर्षी हां उत्सव केल्यावर त्या वेळेस परत जीवंत निघतात अशी या व्रताची आख्यायिका आहेया नंतर प्रसादा कार्यक्रम ठेवला जातो. तेव्हा गावतील सर्व लोकांना या प्रसादासाठी आमंत्रित केलं जाते. हा कार्यक्रम मोठा खर्चिक असून कार्य करणाऱ्यास एक ते दिड लाखापर्यत खर्च येतो.कोट:-आमचे हां डोगऱ्यादेव उत्सव आमच्या वडिलोपार्जित आहे. या व्रताच्या कालावधी घरात प्रवेश करीत नाही.शिव ओलांडत नाही.पंधरा दिवस कड़क उपवास करावा लागतो.भूतलावरील वनस्पती,वन्यजीव ,यांचे संरक्षण संवर्धन व्हावे.मानवजातीचे कल्याण व्हावे.या गावातील,वस्तीतिल सर्व लोकांचे आरोग्य सुखसंपदा भरभराटीव्हावे सर्व लोक सुखसमृदिने नंदावे म्हणून हे व्रत दर तीन वर्षांनी केले जाते- तात्याभाऊ सोनवणे. वटार येथील डोगऱ्यादेव उत्सवात सहभागी झालेले आदिवाशी बांधव. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासSocialसामाजिक