शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कांदा रोपे देता का कोणी कांदा रोपे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 01:18 IST

कांदाची रोपे देता का कोणी कांदा रोपे, असे म्हणत गावोगाव भटकंती करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. सतत पडणाºया पावसामुळे शेतकºयांनी लावलेली रोपे खराब झाली आहेत.

ठळक मुद्देग्रामीण भागात शेतकऱ्यांची भटकंती

एरंडगाव : कांदाची रोपे देता का कोणी कांदा रोपे, असे म्हणत गावोगाव भटकंती करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. सतत पडणाºया पावसामुळे शेतकºयांनी लावलेली रोपे खराब झाली आहेत. पायलीभर (सात किलो) टाकलेल्या कांदा बियाणात गुंठाभर रानाचीदेखील लागवड होत नाही. शेतकºयांनी घरी पिकवलेले कांदा बियाणे पहिल्या फेरीतच संपले आहे. आता शेतकरी बाजारातून कांदा बियाणे खरेदी करीत आहे.या बियाणाचे भावही शिगेला पोहोचले आहेत. एक किलो बियाणाचा दर तीन हजारांच्या आसपास आहे. एवढे महागाचे बियाणे घेऊनही निसर्ग साथ देत नाही.टाकलेले बियाणे कसेबसे येते आणि काही दिवसातच खराब होते. किमती औषधांची फवारणी करूनही रोपाची पोत सुधारत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.उन्हाळ कांद्याचे बाजारभाव समाधानकारक असल्यामुळे कांदा लागवडीसाठी शेतकरी आतूर झाले आहे. रोप नसल्यामुळे रोपाच्या शोधासाठी भटकंती सुरू आहे.घट होण्याची शक्यतामागेल त्या भावात शेतकरी रोप खरेदी करण्यास इच्छुक असूनही रोप मिळत नाही. कांदा हे परिसरातील हुकमी पीक आहे. परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाल, रांगडा व उन्हाळ कांद्याची लागवड केली जाते. दरवर्षीच्या तुलनेत यंदा कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारात भाव आहे तर कांदे नाही म्हणजे नाक आहे तर नथ नाही आणि नथ आहे तर नाक नाही, अशा अवस्थेने शेतकºयांचा मोठा कोंडमारा झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीonionकांदा