शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

अन्नदात्याला दया नको, न्याय द्या : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 1:11 AM

स्वत:ची मेहनत करून कष्ट करून बाजारभाव मिळत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना केली पाहिजे ती केली गेली नाही, त्यामुळे शेतकºयांचे प्रश्न वाढत गेले. शेतकºयांचे अर्थकारण बिघडले आहे. जोपर्यंत अर्थकारण सुधारत नाही तोपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सुटणार नाही.

दिंडोरी : स्वत:ची मेहनत करून कष्ट करून बाजारभाव मिळत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना केली पाहिजे ती केली गेली नाही, त्यामुळे शेतकºयांचे प्रश्न वाढत गेले. शेतकºयांचे अर्थकारण बिघडले आहे. जोपर्यंत अर्थकारण सुधारत नाही तोपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सुटणार नाही. ते सोडविले गेले पाहिजे. अन्नदात्याला दया नको, न्याय द्या असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.  तालुक्यातील मोहाडी येथे ६२ व्या श्री गोपाळकृष्ण व्याख्यानमालेचे उद्घाटन खासदार राजू शेट्टी, सह्याद्री अ‍ॅग्रो फार्मचे व्यवस्थापक विलास शिंदे, कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी, स्वाभिमानी पक्षाचे प्रवक्ते संदीप जगताप, गोपाळ कृष्ण ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम जाधव, हंसराज वडघुले, नाना बच्छाव आदींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शेट्टी बोलत होते.  शेट्टी पुढे म्हणाले, शहरे वाढत गेली, बाहेरून येणारे लोंढे वाढत गेले. त्यावेळी सर्वांनी त्यांची बाजू लावून धरली; मात्र त्याचवेळी स्थानिक लोकांना कोणीही मदत केली नाही. शेतीचे शोषण फार पूर्वीपासूनच सुरू आहे. शेतक-यांना लुटण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आणि शेतकरी देशोधडीला लागला. त्यामुळे शेतकºयांना कुणाच्या तरी दयेवर जगावे लागत आहे.सरकारने शेतकºयांना सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. जगातल्या शेतकºयांनी मान खाली घालावी, अशी प्रगती देशातील शेतकºयांनी केली आहे. यावेळी प्रवीण जाधव, रमेश नाठे, दत्ता कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलास देशमुख यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन धनंजय वानले यांनी केले.साधू-संतांना शेतकºयांच्या वेदना कळल्या; मात्र इतरांना कळल्या नाहीत. शेतकºयांकडून शेतमाल खरेदी करताना घासाघीस करतात. मात्र इतर वस्तू खरेदी करण्यासाठी मागेल तेवढी किंमत मोजता. सर्वच सरकारांनी शेतकºयांची जबाबदारी स्वीकारली; मात्र धोरणाकडे दुर्लक्ष केले. आयात-निर्यात धोरण निश्चित केले पाहिजे.- राजू शेट्टी, खासदार

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी