शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

प्रभागसभेत प्रशासनाला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:25 IST

वालदेवी नदीत गटारी, नाले व भूमिगत गटारीचे मिळणारे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी, बंद पथदीप , मनपाच्या धूळखात पडून असलेल्या वास्तू आदी प्रश्नांवरून नाशिकरोड प्रभागच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले.

नाशिकरोड : वालदेवी नदीत गटारी, नाले व भूमिगत गटारीचे मिळणारे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी, बंद पथदीप , मनपाच्या धूळखात पडून असलेल्या वास्तू आदी प्रश्नांवरून नाशिकरोड प्रभागच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक शुक्रवारी सकाळी प्रभाग सभापती पंडित आवारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत नगरसेविका रंजना बोराडे यांनी मनपाची जुनी इमारत व वाचनालय धूळखात पडले असून, त्याच्यावर हजारो रुपये विनाकारण खर्च केला जात आहे. मनपाच्या अनेक इमारती, समाजमंदिर, व्यायामशाळा, वाचनालय, हॉल आदी धूळखात पडले असून, त्याच्यावर खर्च केलेले लाखो रुपये वाया जात आहे. मनपाने रहिवाशांच्या उपयोगासाठी बांधलेल्या इमारती, हॉल या सामाजिक संस्थेस चालविण्यात देण्यात याव्या, अशी मागणी बोराडे यांनी केली.वडनेरमार्गावरील अनधिकृत भंगरची दुकाने हटविण्यात यावी, बंद पथदीप सुरू करावे, खराब झालेल्या पथदीपाचे पोल बदलण्यात यावे, भुयारी गटारीचे सर्वेक्षण करावे. अनेक हॉटेल व्यावसायिक नाल्यांमध्ये घाण पाणी सोडतात त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका संगीता गायकवाड, अंबादास पगारे यांनी केली. नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी दुर्गा उद्यान येथील स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक धूळ खात पडले असून, अस्वच्छता पसरलेली आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते त्वरित बुजवावे, अशी मागणी केली.बैठकीला नगरसेवक केशव पोरजे, नगरसेवक मीराबाई हांडगे, सुनीता कोठुळे, मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर नगरसेवक व अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची पाहणी केली.वालदेवी नदीचे आरोग्य धोक्यातनगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी वालदेवी नदीमध्ये गटारी, नाले, भूमिगत गटारी यातील दुर्गंधीयुक्त दूषित पाणी मिसळले जात असल्याने वालदेवी नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे. नदीतील पाण्याला उग्र वास येत असून परिसरातील रहिवाशांना त्वचेचे आजार होत आहे. नदी पात्रात मिसळणारे दुर्गंधीयुक्त पाणी त्वरित बंद करावे अन्यथा नदी पात्रात बसून उपोषण करू, असा इशारा गाडेकर यांनी दिला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाriverनदी