शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रचलित सामाजिक, राजकीय व्यवस्था अस्वस्थ करणारी : डॉ. भालचंद्र मुणगेकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 01:50 IST

केंद्र शासनाने मागील काही वर्षांत घेतलेले सामाजिक आणि आर्थिक निर्णय या देशाला अधोगतीकडे घेऊन जाणारे असून, असे बेजबाबदार निर्णय आजपर्यंत जगातील एकाही सरकारने घेतले नाहीत. यामुळे प्रचलित सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्था अस्वस्थ करणारी आहे. यामुळे संपूर्ण लोकशाही व्यवस्थाच खिळखिळी झाली असून, २०२४ मध्ये हे सरकार पुन्हा सत्तेत आले तर संपूर्ण लोकशाहीच उद्ध्वस्त होईल, असा जाहीर इशारा प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिला.

ठळक मुद्दे१५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचा समारोप

नाशिक : केंद्र शासनाने मागील काही वर्षांत घेतलेले सामाजिक आणि आर्थिक निर्णय या देशाला अधोगतीकडे घेऊन जाणारे असून, असे बेजबाबदार निर्णय आजपर्यंत जगातील एकाही सरकारने घेतले नाहीत. यामुळे प्रचलित सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्था अस्वस्थ करणारी आहे. यामुळे संपूर्ण लोकशाही व्यवस्थाच खिळखिळी झाली असून, २०२४ मध्ये हे सरकार पुन्हा सत्तेत आले तर संपूर्ण लोकशाहीच उद्ध्वस्त होईल, असा जाहीर इशारा प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बाल विकास मंदिराच्या प्रांगणात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संविधान सन्मानार्थ १५व्या विद्रोही साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी (दि.५) झाला. याप्रसंगी डॉ. भालचंद्र मुणगेकर बोलत होते. व्यासपीठावर मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, मुख्य संयोजक कॉ. राजू देसले, संयोजन समितीच्या राज्य अध्यक्ष प्रा. प्रतिमा पवार, विश्वस्त किशोर ढमाले, गणेश उन्हवणे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले, धारावीतील पहिल्या साहित्य संमेलनापासून मी विद्रोही साहित्य चळवळीशी संबंधित आहे. सध्या देशात असलेली प्रचलित सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था अस्वस्थ करणारी आहे. याविरुद्ध बोलले नाही तर अनेक प्रश्न निर्माण होतील. असे सांगतानाच त्यांनी कोरोनानंतर २२ देशांतील २२ कोटी नागरिकांचा रोजगार गेला आणि २३ कोटी नागरिक दारिद्र्यरेषेच्या खाली गेले असल्याची वस्तुस्थितीही मांडली. आपल्या भाषणात मुणगेकर यांनी गोहत्या, विद्रोही साहित्य त्यापुढील आव्हाने अशा विविध मुद्द्यांचा उहापोह केला. मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी आपल्या भाषणात विद्रोही साहित्य संमेलन सामाजिक चळवळीला गती देणारे असल्यचे मत व्यक्त करून मविप्र समाज संस्थेच्या संचालकांनी त्या काळात प्रथम विद्रोह केला आणि बहुजनांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. त्याचबरोबर इगतपुरीच्या भात सत्याग्रहाचे नेतृत्व केल्याचे सांगून संस्थेचा इतिहास मांडला. या संमेलनात एकूण १३ ठराव करण्यात आले. प्रा. प्रतिमा परदेशी यांनी ठरावांचे वाचन केले, आभार कॉ. राजू देसले यांनी मानले.

चौकट-

तीन ठिकाणचे निमंत्रण

१६ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी जालना, अहमदनगर आणि जळगाव या तीन ठिकाणांहून निमंत्रण आले असल्याची माहिती यावेळी मुख्य विश्वस्त किशोर ढमाले यांनी यावेळी दिली. संमेलन कुठे घ्यायचे याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

चौकट-

सावरकरांच्या नावावर निवडणुका

अ.भा. मराठी साहित्य संमेलन नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, त्यांचे मराठीत योगदान आहेच. असे असताना त्यांच्या नावाला विरोध आणि सावरकरांच्या नावाचा आग्रह का, असा प्रश्न डॉ. मुणगेकर यांनी उपस्थित केला. आता राम मंदिराचा प्रश्न मिटला आहे, इतरही कोणते मुद्दे नसल्याने महाराष्ट्रात यापुढील अगदी पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्याही निवडणुका सावरकरांच्या नावावरच होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :NashikनाशिकBhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकरcultureसांस्कृतिक