शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

जिल्हा पुरवठा विभागाची सातशे क्विंटल तूरडाळीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 18:51 IST

नाशिक शहरातील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर प्रतिकिलो शंभरी पार गेले असून, जिल्ह्यातून तूरडाळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून सर्वसामान्यांना स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी नोंदविली आहे.

ठळक मुद्दे शहरातील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर शंभरी पार जिल्ह्यातून तूरडाळीची मागणी वाढली

नाशिक : शहरातील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर प्रतिकिलो शंभरी पार गेले असून, जिल्ह्यातून तूरडाळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून सर्वसामान्यांना स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी नोंदविली आहे. सध्या मागणीनुसार व उपलब्धतेनुसार रेशन दुकानात तूरडाळ स्वस्त दरात मिळत असली तरी ती गुणवत्तेबाबतच्या तक्रारींमुळे तूरडाळीसह कडधान्याचा सुमारे १८० क्विंटल साठा पडून आहे. कडधान्याचे भाव गगनाला भिडले असून, किराणा दुकानात उडीदडाळ ११० ते १२० व मूगडाळ शंभर ते ११० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. मागील एक आठवड्यात डाळींच्या किमतीत प्रतिकिलो दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने कडधान्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला असून, स्थानिक बाजारपेठांमध्ये डाळींचे भाव कडाडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा विभागाने सर्वाधिक मागणी असलेल्या पाच तालुक्यांच्या मागणीच्या आधारे ७२० क्विंटल डाळीची मागणी शासनाकडे केली आहे. मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्ये घेतली जातात. तसेच राजस्थान व मध्य प्रदेशमधूनही डाळींचा पुरवठा होतो. परंतु, यावर्षी परतीच्या पावसाने राज्यात खरिपाचे मोठे नुकसान केले असून, याच कांदा, कापूस, सोयाबीनसह तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अपेक्षेप्रमाणे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नवीन डाळींचे उत्पादन बाजारपेठेत येऊ शकले नाही. त्यामुळे बाजारपेठेत डाळींचे भाव वाढण्याची शक्यता असून, सामान्य घटकालाही मागणीनुसार डाळींचा पुरवठा होण्यासाठी तालुकास्तरावरून प्राप्त मागणीनुसार जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे डाळींची मागणी नोंदवली आहे. डाळी शंभरीपार नाशिकच्या बाजारात तूर, मूग, हरबरा, उडीद, मूग आदी डाळींच्या किमतीने शंभरी गाठली असून, डाळींच्या किमती कमी न झाल्यास सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातील बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच स्वस्त धान्य दुकानातून सर्वसामान्यांना तूरडाळ मिळावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी नोंदवली आहे. मागणी आणि पुरवठ्यासोबत उपलब्धतेचा विचार करून जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नियमित प्रक्रियेतून ही मागणी केली असून, लवकरच ही डाळ उपलब्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :foodअन्नNashikनाशिकMarathwadaमराठवाडाMadhya Pradeshमध्य प्रदेश