शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

जिल्हा पुरवठा विभागाची सातशे क्विंटल तूरडाळीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 18:51 IST

नाशिक शहरातील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर प्रतिकिलो शंभरी पार गेले असून, जिल्ह्यातून तूरडाळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून सर्वसामान्यांना स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी नोंदविली आहे.

ठळक मुद्दे शहरातील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर शंभरी पार जिल्ह्यातून तूरडाळीची मागणी वाढली

नाशिक : शहरातील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर प्रतिकिलो शंभरी पार गेले असून, जिल्ह्यातून तूरडाळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून सर्वसामान्यांना स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी नोंदविली आहे. सध्या मागणीनुसार व उपलब्धतेनुसार रेशन दुकानात तूरडाळ स्वस्त दरात मिळत असली तरी ती गुणवत्तेबाबतच्या तक्रारींमुळे तूरडाळीसह कडधान्याचा सुमारे १८० क्विंटल साठा पडून आहे. कडधान्याचे भाव गगनाला भिडले असून, किराणा दुकानात उडीदडाळ ११० ते १२० व मूगडाळ शंभर ते ११० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. मागील एक आठवड्यात डाळींच्या किमतीत प्रतिकिलो दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने कडधान्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला असून, स्थानिक बाजारपेठांमध्ये डाळींचे भाव कडाडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा विभागाने सर्वाधिक मागणी असलेल्या पाच तालुक्यांच्या मागणीच्या आधारे ७२० क्विंटल डाळीची मागणी शासनाकडे केली आहे. मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्ये घेतली जातात. तसेच राजस्थान व मध्य प्रदेशमधूनही डाळींचा पुरवठा होतो. परंतु, यावर्षी परतीच्या पावसाने राज्यात खरिपाचे मोठे नुकसान केले असून, याच कांदा, कापूस, सोयाबीनसह तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अपेक्षेप्रमाणे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नवीन डाळींचे उत्पादन बाजारपेठेत येऊ शकले नाही. त्यामुळे बाजारपेठेत डाळींचे भाव वाढण्याची शक्यता असून, सामान्य घटकालाही मागणीनुसार डाळींचा पुरवठा होण्यासाठी तालुकास्तरावरून प्राप्त मागणीनुसार जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे डाळींची मागणी नोंदवली आहे. डाळी शंभरीपार नाशिकच्या बाजारात तूर, मूग, हरबरा, उडीद, मूग आदी डाळींच्या किमतीने शंभरी गाठली असून, डाळींच्या किमती कमी न झाल्यास सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातील बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच स्वस्त धान्य दुकानातून सर्वसामान्यांना तूरडाळ मिळावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी नोंदवली आहे. मागणी आणि पुरवठ्यासोबत उपलब्धतेचा विचार करून जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नियमित प्रक्रियेतून ही मागणी केली असून, लवकरच ही डाळ उपलब्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :foodअन्नNashikनाशिकMarathwadaमराठवाडाMadhya Pradeshमध्य प्रदेश