शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

जिल्ह्यात गत वर्षाच्या तुलनेत चौपट पाऊस

By admin | Updated: July 1, 2017 23:43 IST

वार्षिक २४ टक्के : जुलैच्या पहिल्याच दिवशी आगमन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावलेल्या मान्सूनपूर्व पावसाने नंतरच्या काळात मृग व आर्द्रा नक्षत्रात आपला मुक्काम कायम ठेवल्यामुळे जून महिन्याच्या सरासरीपेक्षा १२० टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच जून महिन्यात कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या २४ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून, जुलैच्या पहिल्या दिवशीही जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात ९४८ मिलिमीटर म्हणजेच जूनच्या सरासरीच्या फक्त ६३ टक्के पाऊस पडला होता. यंदाच्या पावसाशी त्याची तुलना केल्यास चारपट पाऊस जिल्ह्णात नोंदविला गेला आहे. त्यातही नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, पेठ, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, येवला या तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. जून महिन्यातील पावसाची एकूण टक्केवारी पाहता ती जिल्ह्णाच्या वार्षिक पावसाच्या २४ टक्के इतकी असून, गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच इतका पाऊस झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या चोवीस तासांत म्हणजेच शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्णात २१४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत पहिल्याच दिवशी १४ टक्के पाऊस पडला आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच नाशिक शहर, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, सिन्नर या तालुक्यांमध्ये पावसाने जोर धरला. नाशिक शहरात शनिवारी सकाळी आठ ते दहा या दोन तासांच्या काळात पावसाने झोडपून काढले. सकाळची वेळ असल्याने नोकरदारांची तसेच कामगार वर्गाची धावपळ उडाली. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रकारही घडले. दिवसभरात १४६ मिलिमीटरची नोंद शुक्रवारी अपवाद वगळता आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्णात सर्वदूर हजेरी लावली. त्यात नाशिक- ३०, इगतपुरी- २०, त्र्यंबकेश्वर- ६२, दिंडोरी- ५, पेठ- १७, निफाड- ३, देवळा- २, मालेगाव- १, सुरगाणा- ५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गंगापूर धरणक्षेत्रात ११३ मिलिमीटर पाऊसशुक्रवारी सकाळी आठ ते दहा या दोन तासांच्या कालावधीत गंगापूर धरणक्षेत्रात ११३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, त्र्यंबकेश्वर व आंबोली भागात ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने त्याचा फायदा गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात झाला आहे. गंगापूर धरणात सध्या २६ टक्के पाणी साठा असून, शुक्रवारच्या पावसामुळे सुमारे ३५० दशलक्ष घनफूट वाढ झाल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. इगतपुरी भागात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरणातही एका दिवसात ४५० दशलक्ष घनफूट पाणी साठले आहे.