शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जमिनीत ४ इंच ओल होऊ द्या...मगच करा पेरणी

By दिनेश पाठक | Updated: June 10, 2024 19:29 IST

कृषी विभागाचे आवाहन; अद्यापही जमीन तहानलेलीच

नाशिक : यावर्षी मान्सून चांगला बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला होता. त्या प्रमाणे यंदाच्या पावसाळ्याचा ट्रेलर देखील नाशिक जिल्ह्यात चांगला पहावयास मिळाला. मात्र जमिनीत अजून तितका ओलावा झालेला नाही. जमिनीत ४ इंच ओल होऊ द्या. मगच पेरणी करा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांनी केले आहे. यावर्षीचा पारा कधी नव्हे इतका ४० अंशावर गेल्याने जमिनीची तहान अजून भागलेली नाही. 

अजून दोन दमदार पाऊस झाल्याशिवाय जमीन ४ इंच ओल हाेणार नाही. नाशिक जिल्ह्यात ७ जूनला मान्सुनचे वेळेवर आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दोन दिवस जिल्ह्यात सरी चांगल्या बरसल्या. त्यामुळे काही ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत तर ७० टक्के शेतकरी अजूनही पेरण्या सुरू कराव्यात की नाही? या संभ्रमात आहे. कारण पेरण्या केल्यावर पाऊस पुन्हा हुलकावनी देऊ शकतो. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. त्यामुळे ‘लाेकमत’ ने या संदर्भात कृषी अधिक्षक सोनवणे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, अजूनही पेरणीयोग्य पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. शेतकऱ्यांनी घाई करू नये. यंदाच्या उन्हाळ्याने शेतजमीन खूप कोरडी झाली आहे. त्यामुळे जमिनीची तहान वाढली आहे. किमान चार ते पाच इंच इतका ओल जमिनीस आल्यावरच पेरणी करणे योग्य राहणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. नोंद घेण्याइतका पाऊस अद्याप झालेला नाही, परंतु पावसाची वेळेत सुरूवात झाली आहे.

६ लाख हेक्टरवर होणार पेरणी

यंदा नाशिक जिल्ह्यात खरिपासाठी ६ लाख २८ हजार ७०० हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात खतांची व बियाण्यांचा काळाबाजार होवू नये, यासाठी कृषी तसेच युरिया साडेआठ हजार टन बफर स्टॉक करून ठेवल्यामुळे खतांची टंचाई जाणवणार नसल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. खरीप हंगामासाठी २ लाख २० हजार टन खतांचे आवंटन मंजूर झाले असून, ७१ हजार २४३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी