शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीत ४ इंच ओल होऊ द्या...मगच करा पेरणी

By दिनेश पाठक | Updated: June 10, 2024 19:29 IST

कृषी विभागाचे आवाहन; अद्यापही जमीन तहानलेलीच

नाशिक : यावर्षी मान्सून चांगला बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला होता. त्या प्रमाणे यंदाच्या पावसाळ्याचा ट्रेलर देखील नाशिक जिल्ह्यात चांगला पहावयास मिळाला. मात्र जमिनीत अजून तितका ओलावा झालेला नाही. जमिनीत ४ इंच ओल होऊ द्या. मगच पेरणी करा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांनी केले आहे. यावर्षीचा पारा कधी नव्हे इतका ४० अंशावर गेल्याने जमिनीची तहान अजून भागलेली नाही. 

अजून दोन दमदार पाऊस झाल्याशिवाय जमीन ४ इंच ओल हाेणार नाही. नाशिक जिल्ह्यात ७ जूनला मान्सुनचे वेळेवर आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दोन दिवस जिल्ह्यात सरी चांगल्या बरसल्या. त्यामुळे काही ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत तर ७० टक्के शेतकरी अजूनही पेरण्या सुरू कराव्यात की नाही? या संभ्रमात आहे. कारण पेरण्या केल्यावर पाऊस पुन्हा हुलकावनी देऊ शकतो. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. त्यामुळे ‘लाेकमत’ ने या संदर्भात कृषी अधिक्षक सोनवणे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, अजूनही पेरणीयोग्य पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. शेतकऱ्यांनी घाई करू नये. यंदाच्या उन्हाळ्याने शेतजमीन खूप कोरडी झाली आहे. त्यामुळे जमिनीची तहान वाढली आहे. किमान चार ते पाच इंच इतका ओल जमिनीस आल्यावरच पेरणी करणे योग्य राहणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. नोंद घेण्याइतका पाऊस अद्याप झालेला नाही, परंतु पावसाची वेळेत सुरूवात झाली आहे.

६ लाख हेक्टरवर होणार पेरणी

यंदा नाशिक जिल्ह्यात खरिपासाठी ६ लाख २८ हजार ७०० हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात खतांची व बियाण्यांचा काळाबाजार होवू नये, यासाठी कृषी तसेच युरिया साडेआठ हजार टन बफर स्टॉक करून ठेवल्यामुळे खतांची टंचाई जाणवणार नसल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. खरीप हंगामासाठी २ लाख २० हजार टन खतांचे आवंटन मंजूर झाले असून, ७१ हजार २४३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी