शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

जिल्हा प्रशासनाने दडपशाही थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 1:34 AM

जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना जिल्हाधिकाºयांनी अडचणीत आणून कांद्याचा हमीभाव कमी करण्यासाठी व्यापाºयांना तंबी दिल्याचा आरोप जनता दरबारात शेतकºयाने केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवत दडपशाही थांबविण्याची मागणी केली.

नाशिक : जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना जिल्हाधिकाºयांनी अडचणीत आणून कांद्याचा हमीभाव कमी करण्यासाठी व्यापाºयांना तंबी दिल्याचा आरोप जनता दरबारात शेतकºयाने केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवत दडपशाही थांबविण्याची मागणी केली.  राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी (दि.३०) जनता दरबार घेण्यात आला. यावेळी एका शेतकºयाने कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना धारेवर धरले. व्यापाºयांना जिल्हाधिकाºयांनी दालनात बोलावून बैठक घेत कांद्याचे दर शेतकºयांना वाढवून द्यावयाचे नाही, अशी तंबी दिल्याचा आरोप यावेळी त्या शेतकºयाने केला. जिल्हधिकाºयांनी दडपशाही थांबवावी आणि जिल्ह्णातील कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान, राधाकृष्णन् यांनी शेतकºयाचा आरोप बिनबुडाचा असून, जिल्हा प्रशासनाने व्यापाºयांच्या बैठकीत केवळ शेतकरी हित लक्षात घेत व्यापाºयांनी कांद्याची साठेबाजी न करता दिवाळीचा कालावधी लक्षात घेऊन योग्य हमीभावाने कांदा खरेदी करून जिल्ह्णाबाहेर काढावा, अशा सूचना करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले. दिवाळीमध्ये कुठल्याही कारणास्तव कांदा बाजार व्यापाºयांनी बंद ठेवू नये, असाही आदेश यावेळी बैठकीत व्यापाºयांना देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकºयांकडून कांद्याचा माल अगोदर खरेदी करून त्याची साठेबाजी करत नंतर दरवाढ करून नये, असे प्रशासनाच्या वतीने बजावण्यात आले होते. त्यामुळे केवळ गैरसमजापोटी दडपशाहीचा आरोप करणे चुकीच असल्याचे त्यांनी यावेळी बाजू मांडताना पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. ...तर परवाने रद्द करूच्दिवाळीच्या हंगामात कांद्याची साठेबाजी करत जिल्हाबाहेर कांदा न पाठविणाºया व नंतर दरवाढ करणाºया व्यापाºयांचे जिल्हास्तरावरील परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हधिकाºयांनी जनता दरबारामध्ये दिली. एकूणच जिल्हा प्रशासनाने शेतकºयांच्या हित लक्षात घेऊन योग्य त्या सूचना देत कार्यवाही केल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. जिल्हा प्रशासनाचे व्यापाºयांच्या बाजूने कोणतेही धोरण नव्हते.धनश्री अहेरांचे पालकमंत्र्यांना साकडेमहाराष्टÑ राज्य महावितरण कंपनीने कृषिपंपांचा खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य धनश्री अहेर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. जिल्ह्णामध्ये महावितरण कंपनीने वीज देयक न भरल्यामुळे अनेक शेतकºयांच्या कृषिपंपांचा विद्युत पुरवठा कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देताच खंडित केला आहे. त्यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतकºयांच्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.