शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

जिल्हा प्रशासन म्हणते केवळ १८ टन तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:17 AM

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. मात्र, मागणीइतका पुरवठा होत ...

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. मात्र, मागणीइतका पुरवठा होत नसल्याने आम्ही जिल्ह्यातील ऑक्सिजनचा अतिरेकी वापर, गळती रोखण्याच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या मागणीच्या तुलनेत केवळ १८ मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नाशिक जिल्ह्यामधून गत आठवड्यात १३८ मेट्रिक टनची मागणी होती. ही मागणी कमी करून आपण १२१ मेट्रिक टनवर आणली आहे. त्यानंतर दवाखान्यातील गळती, अतिवापर टाळून ती आपण १०३ मेट्रिक टनवर आणली होती. मात्र, प्रत्यक्षात आपल्याला पुरवठा हा ८५ मेट्रिक टन इतकाच होत आहे. त्यामुळे १८ टनचा तुटवडा जाणवत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. बुधवारी काही हॉस्पिटलच्या बाबतीत तुटवडा निर्माण झाला असून, सध्याची अडचण दूर करण्याची ऑक्सिजन वितरकांना सूचना केली असून, दुपारपर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले. ऑक्सिजनटंचाईवर सगळ्यांनी मिळून मात करायला हवी. ऑक्सिजचा वापर फक्त फार्मास्युटिकल कंपन्यांनी करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

इन्फो

जिल्ह्यात ७ हजार रुग्ण ऑक्सिजनवर

जिल्ह्यात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे ७ हजार इतकी आहे. आठवडाभरात थोड्या कमी- अधिक प्रमाणात असलेले हे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. प्राप्त माहितीनुसार अनेक रुग्णालयांत १३० लिटर प्रतिमिनिट, असा वापर रुग्णालयांत होत आहे. त्यामुळे या रुग्णालयांनी ऑक्सिजनचा कमी प्रमाणात वापर करावा. गळती दुरुस्ती करून ऑक्सिजनचा अपव्यय रोखावा, असे आवाहन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.