शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

पोलीस बंदोबस्तात खत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 00:18 IST

सायखेडा : खते उपलब्ध झाल्याचे समजताच शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली, त्यानंतर शेतकऱ्यांची गर्दी वाढल्याने अखेर पोलिसांना पाचारण करीत त्यांच्या उपस्थितीत खतांचे वाटप सायखेडा येथे करण्यात आले.

ठळक मुद्देसायखेडा येथे खतांच्या तुटवड्यामुळे शेतकरी हैराण

सायखेडा : खते उपलब्ध झाल्याचे समजताच शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली, त्यानंतर शेतकऱ्यांची गर्दी वाढल्याने अखेर पोलिसांना पाचारण करीत त्यांच्या उपस्थितीत खतांचे वाटप सायखेडा येथे करण्यात आले.अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना पिकांसाठी लागणारी रासायनिक खते मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पीक जोमाने वाढत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त असताना सायखेडा येथील मनीषा एजन्सीमध्ये डीएपी आणि १०:२६:२६ हे खत उपलब्ध झाले असून खत आल्याची बातमी गोदाकाठ भागात वाऱ्यासारखी पसरली अनेक महिन्यांनी खत आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, पिकांना जीवदान मिळेल, अशी अपेक्षा ठेवून शेतकरी खत खरेदी करण्यासाठी दुकानात गेले. मात्र अनेक दिवसांपासून खते नसल्याने शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. शेतकऱ्यांची गर्दी वाढत चालली, खतांच्या गोण्या कमी पडतील, असा अंदाज झाल्यावर शेतकरी एकमेकांना ढकलत होते. दुकानदाराने तत्काळ सायखेडा पोलिसांना कळवले. अखेर साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. बी. काद्री यांनी दुकान परिसरात बंदोबस्त लावून शेतकऱ्यांना प्रत्येकी एका गोणीचे वाटप करण्यात आले.मागील काही महिन्यांपासून शेती पिकांसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचा मोठा तुटवडा आला आहे. दुकानदारांकडे खते येत नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना कशाची मात्रा द्यावी, असा प्रश्न भेडसावत आहे.सध्या कांदा आणि द्राक्ष, गहू, भाजीपाला या रब्बी हंगामातील पिकांची लागवड झाली असल्यामुळे या पिकांच्या जोमदार वाढीसाठी खते आवश्यक आहेत. केवळ सेंद्रिय खते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मात्र जमिनीला रासायनिक खतांची सवय झाली आहे आणि पिकाची तत्काळ जोमदार वाढ होण्यासाठी रासायनिक खतांची गरज आहे. पण ते वेळेत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.शासन रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करत आहे. वारंवार खतांच्या सबसिडी कमी करणे, खतांवरील कर वाढवणे, भाडेवाढ करणे, असे प्रकार होत असल्याने खत मिळत नाही, असा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे, शासन शेतकऱ्यांना खते पुरवू शकत नाही, तेव्हा बाजारभाव दुप्पट कसे करणार, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिस