शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पोलीस बंदोबस्तात खत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 00:18 IST

सायखेडा : खते उपलब्ध झाल्याचे समजताच शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली, त्यानंतर शेतकऱ्यांची गर्दी वाढल्याने अखेर पोलिसांना पाचारण करीत त्यांच्या उपस्थितीत खतांचे वाटप सायखेडा येथे करण्यात आले.

ठळक मुद्देसायखेडा येथे खतांच्या तुटवड्यामुळे शेतकरी हैराण

सायखेडा : खते उपलब्ध झाल्याचे समजताच शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली, त्यानंतर शेतकऱ्यांची गर्दी वाढल्याने अखेर पोलिसांना पाचारण करीत त्यांच्या उपस्थितीत खतांचे वाटप सायखेडा येथे करण्यात आले.अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना पिकांसाठी लागणारी रासायनिक खते मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पीक जोमाने वाढत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त असताना सायखेडा येथील मनीषा एजन्सीमध्ये डीएपी आणि १०:२६:२६ हे खत उपलब्ध झाले असून खत आल्याची बातमी गोदाकाठ भागात वाऱ्यासारखी पसरली अनेक महिन्यांनी खत आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, पिकांना जीवदान मिळेल, अशी अपेक्षा ठेवून शेतकरी खत खरेदी करण्यासाठी दुकानात गेले. मात्र अनेक दिवसांपासून खते नसल्याने शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. शेतकऱ्यांची गर्दी वाढत चालली, खतांच्या गोण्या कमी पडतील, असा अंदाज झाल्यावर शेतकरी एकमेकांना ढकलत होते. दुकानदाराने तत्काळ सायखेडा पोलिसांना कळवले. अखेर साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. बी. काद्री यांनी दुकान परिसरात बंदोबस्त लावून शेतकऱ्यांना प्रत्येकी एका गोणीचे वाटप करण्यात आले.मागील काही महिन्यांपासून शेती पिकांसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचा मोठा तुटवडा आला आहे. दुकानदारांकडे खते येत नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना कशाची मात्रा द्यावी, असा प्रश्न भेडसावत आहे.सध्या कांदा आणि द्राक्ष, गहू, भाजीपाला या रब्बी हंगामातील पिकांची लागवड झाली असल्यामुळे या पिकांच्या जोमदार वाढीसाठी खते आवश्यक आहेत. केवळ सेंद्रिय खते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मात्र जमिनीला रासायनिक खतांची सवय झाली आहे आणि पिकाची तत्काळ जोमदार वाढ होण्यासाठी रासायनिक खतांची गरज आहे. पण ते वेळेत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.शासन रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करत आहे. वारंवार खतांच्या सबसिडी कमी करणे, खतांवरील कर वाढवणे, भाडेवाढ करणे, असे प्रकार होत असल्याने खत मिळत नाही, असा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे, शासन शेतकऱ्यांना खते पुरवू शकत नाही, तेव्हा बाजारभाव दुप्पट कसे करणार, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिस