शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पोलीस बंदोबस्तात खत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 00:18 IST

सायखेडा : खते उपलब्ध झाल्याचे समजताच शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली, त्यानंतर शेतकऱ्यांची गर्दी वाढल्याने अखेर पोलिसांना पाचारण करीत त्यांच्या उपस्थितीत खतांचे वाटप सायखेडा येथे करण्यात आले.

ठळक मुद्देसायखेडा येथे खतांच्या तुटवड्यामुळे शेतकरी हैराण

सायखेडा : खते उपलब्ध झाल्याचे समजताच शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली, त्यानंतर शेतकऱ्यांची गर्दी वाढल्याने अखेर पोलिसांना पाचारण करीत त्यांच्या उपस्थितीत खतांचे वाटप सायखेडा येथे करण्यात आले.अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना पिकांसाठी लागणारी रासायनिक खते मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पीक जोमाने वाढत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त असताना सायखेडा येथील मनीषा एजन्सीमध्ये डीएपी आणि १०:२६:२६ हे खत उपलब्ध झाले असून खत आल्याची बातमी गोदाकाठ भागात वाऱ्यासारखी पसरली अनेक महिन्यांनी खत आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, पिकांना जीवदान मिळेल, अशी अपेक्षा ठेवून शेतकरी खत खरेदी करण्यासाठी दुकानात गेले. मात्र अनेक दिवसांपासून खते नसल्याने शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. शेतकऱ्यांची गर्दी वाढत चालली, खतांच्या गोण्या कमी पडतील, असा अंदाज झाल्यावर शेतकरी एकमेकांना ढकलत होते. दुकानदाराने तत्काळ सायखेडा पोलिसांना कळवले. अखेर साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. बी. काद्री यांनी दुकान परिसरात बंदोबस्त लावून शेतकऱ्यांना प्रत्येकी एका गोणीचे वाटप करण्यात आले.मागील काही महिन्यांपासून शेती पिकांसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचा मोठा तुटवडा आला आहे. दुकानदारांकडे खते येत नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना कशाची मात्रा द्यावी, असा प्रश्न भेडसावत आहे.सध्या कांदा आणि द्राक्ष, गहू, भाजीपाला या रब्बी हंगामातील पिकांची लागवड झाली असल्यामुळे या पिकांच्या जोमदार वाढीसाठी खते आवश्यक आहेत. केवळ सेंद्रिय खते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मात्र जमिनीला रासायनिक खतांची सवय झाली आहे आणि पिकाची तत्काळ जोमदार वाढ होण्यासाठी रासायनिक खतांची गरज आहे. पण ते वेळेत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.शासन रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करत आहे. वारंवार खतांच्या सबसिडी कमी करणे, खतांवरील कर वाढवणे, भाडेवाढ करणे, असे प्रकार होत असल्याने खत मिळत नाही, असा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे, शासन शेतकऱ्यांना खते पुरवू शकत नाही, तेव्हा बाजारभाव दुप्पट कसे करणार, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिस