शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

आदिवासी बांधवांना २१ हजार हेक्टर जमिनीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:18 IST

नाशिक: ज्यांची उपजीविका वर्षानुवर्षे वनजमिनीवर आणि नैसर्गिक साधनसामग्रीवर अवलंबून आहे. तसेच जे आदिवासी बांधव वनजमिनीवर पारंपरिक पद्धतीने शेती ...

नाशिक: ज्यांची उपजीविका वर्षानुवर्षे वनजमिनीवर आणि नैसर्गिक साधनसामग्रीवर अवलंबून आहे. तसेच जे आदिवासी बांधव वनजमिनीवर पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहेत, अशा आदिवासी बांधवांना वनाचे अधिकार देण्याबाबत असलेल्या वनहक्क कायद्यांर्गत जिल्ह्यात सुमारे २१ हजार हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. वनहक्काच्या अधिकारासाठी जिल्हा समितीकडे ५२, २८३ इतके प्रकरणे प्राप्त झालेली होती, त्यापैकी ३१ हजार ८८० प्रकरणे मंजूर झालेले आहेत.

वनहक्क कायदा, २००६ नुसार वनांमध्ये अधिवास असणाऱ्या समुदायांना जमिनीचे अधिकार आणि वनांचे व्यवस्थापन आणि संवर्धन करण्याचा हक्क देण्यात आला आहे. पारंपरिक पद्धतीने वनजमिनीवर शेतीच्या माध्यमातून उपजीविका करणाऱ्यांना वनहक्काचा आधार मिळाला आहे. १३ डिसेंबर २००५ पूर्वी शेतजमीन कसणाऱ्यांना वनहक्क पट्टे वाटप करण्यात येते. त्यानुसार जिल्हा समितीकडे वैयक्तिक तसेच सामूहिक दावे दाखल केले जातात. त्यातून पात्र दावेदारांना वनजमिनीचे अधिकार बहाल केले जातात. जिल्ह्यात २००८ पासून सुमारे ५२ हजार २८३ इतकी प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यापैकी ३१ हजार ८८० प्रकरणे मंजूर केली आहेत. वर्षानुवर्षे जंगलात राहणाऱ्या आणि वनजमीन कसणाऱ्यांनी शेतीच्या माध्यमातून वनजमीन राखली आहे. पूर्वापार शेती करणाऱ्यांचे हक्क आबाधित राहावे तसेच इतरांकडून वनजमिनींचे अतिक्रमण होऊ नये, यासाठी जमीन कसणाऱ्या आदिवासी बांधवांना तसेच समुदायाला वनाचे हक्क देण्याचा कायदा असल्याने त्यामाध्यमातून त्यांना वनपट्टे अधिकृत करून दिले जातात.

नाशिक जिल्ह्यात सन २००८ पासून ५२ हजार २८३ इतकी प्रकरणे दाखल झाली होती. जिल्हा समितीकडे प्राप्त झालेल्या दाव्यांपैकी १९,८९८ दावे फेटाळून लावले आहेत. कागदपत्रे तसेच पुराव्यांचा अभाव असल्याने त्यांचे दावे अमान्य करण्यात आले आहेत तर ३१ हजार ८८० दावे मान्य केले आहेत. मान्य करण्यात आलेल्या ३१ हजार वैयक्तिक दाव्यांपैकी २१, ६१० हेक्टर वनक्षेत्र वाटप केलेले आहे. त्यामुळे आता त्यांना अधिकृत संबंधित वनजमिनीचे अधिकार मिळालेले आहेत. पात्र, दाव्यांपैकी २९,६८९ दावेदारांना वनहक्क लागू करण्यात आल्याबाबतचे प्रमाणपत्रदेखील अदा करण्यात आले असून येत्या मार्च अखेर उर्वरित २१९१ प्रकरणांचे वनहक्क प्रमाणपत्रे तयार करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.

--इन्फो--

सातबारा उताऱ्यावर नोंदी

वनहक्क दावे मंजूर झालेल्या ३१ हजार ८८० आदिवासी बांधवांची नावेदेखील सातबारा उताऱ्यावर नोंदविण्यात आलेली आहेत. जवळपास २५ हजाार १३० जणांच्या सातबारा नोंदी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत तर उर्वरित ४५५९ प्रकरणांमध्ये नावे उताऱ्याला लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या मार्चअखेर त्यांची देखील नावे सातबारा उताऱ्यावर घेतली जाणार आहेत.

===Photopath===

260221\26nsk_19_26022021_13.jpg

===Caption===

वनहक्क प्राप्त आदिवासी बांधव