शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

इगतपुरीत पीकविम्याची रक्कम न मिळाल्यामुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासनाच्या वतीने कृषी अधिकारी, तसेच तलाठी यांनी पंचनामेही केले असून, संबंधित विमा कंपनीने अद्यापपर्यंत विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे. आत्तापर्यंत कृषी विभागाला तालुक्यातील ११ हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ७ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाल्याचे इगतपुरी तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांनी सांगितले.

इगतपुरी तालुक्यात मागील वर्षी झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी विमा मिळण्यासाठी अर्ज दाखल केले होते, परंतु विमा कंपनीने विमा देण्यास टाळाटाळ करत फक्त ७ हजारांचं शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ दिला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार काशीनाथ मेंगाळ विमा कंपनीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. पीकविमा मिळण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत तहसील कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग, तसेच साकूर फाटा, इगतपुरी आदी ठिकाणी आंदोलने केली असून, संबंधित विमा कंपनीने याकडे साफ दुर्लक्ष करीत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करत आडमुठेपणाचे धोरण अवलंबत आहे.

मागील वर्षी शासनाच्या वतीने कृषी अधिकारी, कृषी सहायक, तलाठी, यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत पंचनामे देखील केले होते, परंतु संबंधित विमा कंपनीने याकडे डोळेझाक करीत शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापपर्यंत विमा रक्कम जमा न केल्यामुळे तालुक्यात संताप व्यक्त होत असून, शेतकरी आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. सदर कंपनीने उर्वरित शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ का दिला नाही, अशी विचारणा करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी उशिराने अर्ज दाखल केल्यामुळे सदर नुकसान झालेले पीक ग्राह्य धरता येणार नसल्यामुळे विमा रक्कम मिळणार नाही, असे विमा कंपनीने सांगितले असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार हेमंत गोडसे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक घेत, विमा कंपनीला खडे बोल सुनावत तातडीने विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, असे आदेश दिले होते.

कोट...

मागील वर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले असून, कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत पंचनामेही केले होते. तालुक्यातील ११ हजार शेतकऱ्यांचे पीकविमा अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ७ हजार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला आहे. उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज उशिराने दाखल झाल्यामुळे, सदर पिकांना ग्राह्य धरता येणार नसल्याने विमा कंपनीने सदर रक्कम जमा करण्यास नकार दिला आहे.

- शीतलकुमार तंवर, कृषी अधिकारी, इगतपुरी.

छायाचित्र- २७ नांदूरवैद्य २ व ३

इगतपुरी तालुक्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भातपिकांचे झालेले नुकसान.

270821\27nsk_36_27082021_13.jpg~270821\27nsk_37_27082021_13.jpg

 इगतपुरी तालुक्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांचे झालेले नुकसान.~पिकांचे नुकसान