शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

नाशिकमध्ये तलावात विसर्जनाला विल्होळीकरांचा नकार

By श्याम बागुल | Updated: September 13, 2018 15:28 IST

गावाच्या तलावातील पाण्याची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट इतकी आहे, त्यामुळे तलावातील गणपती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकते, तसेच तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज

ठळक मुद्देप्रदुषण टळेल : अनुचित घटनांना आळा बसेल विल्होळी तलावात विसर्जन बंदी कायम ठेवण्यावर ग्रामस्थांचे एकमत

नाशिक : गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाझर तलावातील पाणी दुषीत होण्याबरोबरच गत काही अनुचित घटनांचा विचार करता यंदाही विल्होळीच्या तलावात गणेश विसर्जन न करण्याचा व करू देण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.येथील हनुमान मंदिर येथे विल्होळी ग्रामपंचायत, ग्रामस्थ व तालुका पोलिस स्टेशनच्या वतीने ग्रामसभा घेण्यात आली. गावाच्या तलावातील पाण्याची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट इतकी आहे, त्यामुळे तलावातील गणपती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकते, तसेच तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे मागे काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी दोन ते तीन भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सदर तलावातील गाळ, मुरूम काढण्यात आलेल्या असून तलावामध्ये ओबडधोबड स्वरूपाचे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे तलावातील पाण्यामुळे या खड्ड्यांचा व खोलीचा अंदाज येत नाही. तसेच विसर्जन काळात मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याने विल्होळी तलावात विसर्जन बंदी कायम ठेवण्यावर ग्रामस्थांचे एकमत झाले. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंत मोहिते यांनी गावक-यांना मार्गदर्शान केले. महामार्गावर असलेले विल्होळी गाव संवेदनशील असल्याचे समजले होते. परंतु गावातील एकोपा पाहिल्यावर कायदा व सुव्यवस्था राखणारे गाव असल्याचे जाणवले. गावात एकोपा नांदूण गुन्हे कमी कसे होतील यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. तालुका पोलीस ठाण्यापासून विल्होळी गाव दूर असले तरी, ग्रामस्थांनी अडचणीच्या काळात भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा त्यांना प्रतिसाद दिला जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी विल्होळी सरपंच बाजीराव गायकवाड ,उपसरपंच श्री कृष्ण मते, सदस्य सोमनाथ भावनाथ, माजी पंचायत समिती उपसभापती सुजाता रुपवते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष देवरे, पोलीस पाटील संजय चव्हाण, मनोहर भावनाथ, मोतीराम भावनाथ उपस्थित होते.(फोटो आहे आरवर १३ विल्होळी नावाने)

 

टॅग्स :DamधरणNashikनाशिक