शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

मनसेच्या नगरसेवकांमध्येच आता असंतोष धुमसू लागला

By admin | Updated: February 2, 2015 00:44 IST

मनसेच्या नगरसेवकांमध्येच आता असंतोष धुमसू लागला

नाशिक : ‘माझ्या हाती सत्ता द्या, मी शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवतो’, असे आवाहन करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक महापालिकेत सत्तेची फळे तीन वर्षे चाखली; परंतु ज्यांच्या हाती नवनिर्माणाची सूत्रे सोपविली त्या महापौर आणि पदाधिकाऱ्यांच्या कचखाऊ भूमिकेमुळे सत्ताधारी मनसेच्या नगरसेवकांमध्येच आता असंतोष धुमसू लागला असून, ठाकरी धाक गायब झाल्याची भावना बोलून दाखविली जात आहे. त्यातच महापालिका मुख्यालयात महापौर हजेरी लावत नसल्याने पालिकेत गाऱ्हाणे घेऊन येणाऱ्या नागरिकांचा ओघ उपमहापौर आणि आयुक्तांकडे वाढू लागला आहे. नाशिककरांनी ४० नगरसेवक निवडून देत राज ठाकरे यांच्या हाती महापालिका सुपूर्द केली, परंतु पहिल्या अडीच वर्षांत महापौरांसह पदाधिकाऱ्यांना अपेक्षित असा प्रभाव न टाकता आल्याने मनसेवर चोहोबाजूने टीका झाली. लोकसभा-विधानसभा निवडणुकीतही विरोधकांनी राज्यभर प्रचारसभांमधून नाशिक महापालिकेतील मनसेच्या अपयशाचे पाढे वाचले. परिणामी, मनसेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, सप्टेंबर २०१४ मध्ये पुन्हा एकदा झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा टेकू घेऊन राज ठाकरे यांनी पालिकेत मनसेचाच महापौर विराजमान केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी दोन-तीन वेळा नाशिक दौरे करत कामांना चालना देण्याचाही प्रयत्न केला. परंतु महापालिकेत सत्ताधारी पक्ष असलेल्या मनसेमध्येच आता विसंवादाचे सूर उमटू लागले असून, प्रभागांमध्ये कामे होत नसल्याची ओरड करण्यात सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक आघाडीवर आहेत. महासभांमध्येही सत्ताधाऱ्यांतूनच महापौरांना आव्हान देण्याचे प्रयत्न होत आहेत. मनसेतील अंतर्गत कारभाराला आणि राजकारणाला कंटाळूनच इंदिरानगर भागातील नगरसेवक सतीश सोनवणे यांनी भाजपाची वाट धरली, तर माजी आमदार वसंत गिते यांच्या भाजपातील प्रवेशानंतर आणखी काही नगरसेवक पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मनसेने पहिल्या अडीच वर्षांत मौनी महापौर बसविल्यानंतर आताही विद्यमान महापौरांबद्दल तेच विशेषण लावले जाऊ लागले असून, महापौर मुख्यालयात भेटत नसल्याची तक्रार नगरसेवकांबरोबर नागरिकांकडूनही होत आहे. महापौरांच्या कक्षात अंधार दाटला असतानाच लगतच्या उपमहापौरांच्या कक्षात मात्र नागरिक व लोकप्रतिनिधींचा राबता सुरू असतो. आयुक्तही व्यस्त कार्यक्रमांतून वेळ काढत अभ्यागतांसाठी वेळ देत असल्याने तिथेही गर्दीचा माहोल असतो. राज ठाकरे यांनी नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्याशी संवाद साधा आणि संपर्क वाढवा, असा कानमंत्र देऊनही विद्यमान महापौरांसह पदाधिकारी मात्र ढिम्म असून, त्याचा फायदा विरोधक उचलत आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांवर असलेला ठाकरी धाकच गायब झाल्याची भावना खुद्द मनसेतील काही सदस्यच बोलून दाखवत आहेत. (प्रतिनिधी)