शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भिलवाडा मॉडेल पे चर्चा... ‘हॉटस्पॉट’ ठरलेला भिलवाडा आज कोरोनामुक्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 07:38 IST

भिलवाडा मॉडेलची देशभर चर्चा : आठवडाभरात ३३ लाख लोकांची तपासणी

नाशिक : ‘इटलीला तर कोरोनाने खाल्ले, आता तुमचा नंबर आहे. भिलवाडा शहर जगातले दुसरे इटली असेल..’, एका परदेशी पत्रकाराने भिलवाडामध्ये सुरू असलेले कोरोनाचे थैमान पाहिल्यानंतर त्यासंदर्भातली ‘कटू भविष्यवाणी’ वर्तवताना या आशयाचे वृत्त तर माध्यमांमध्ये प्रसिद्ध केलेच, पण तत्पूर्वी या समस्येशी झुंजत असणाऱ्या राजस्थानच्या प्रशासनाला फोन करून त्यांच्यातही भयकंप उडवून दिला. कोरोनाचे संकट गहिरे होतेच, पण त्यामुळे हतबल न होता, राजस्थान प्रशासनाने आव्हान म्हणून त्याकडे पाहिले आणि अतिशय कठोर अंमलबजावणी करताना आपल्या जिल्ह्याला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढले.

संपूर्ण भारतात कुठेही कोरोनाची फारशी लक्षणे दिसत नसताना भिलवाड्यात कोरोनाचे २७ रुग्ण एकापाठोपाठ एक सापडले होते, तिथे आज एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही! प्रशासनाने युद्धपातळीवर काम केले. एकेक घर पिंजून काढताना केवळ आठवडाभरातच जिल्ह्यातील तब्बल ३३ लाख लोकांची पाहणी, तपासणी केली. यात काही जणांची दोन-तीनदाही तपासणी झाली. संपूर्ण भारत लॉकडाऊनच्या आठवडाभरआधीच भिलवाडा जिल्ह्याच्या सर्व सीमा सील झाल्या होत्या.प्रशासनाच्या या कठोर, हिंमतवान प्रयत्नांनाच ‘भिलवाडा मॉडेल’ म्हणून आज गौरवले जातेय. दिल्ली, उत्तर प्रदेशने हे मॉडेल राबवायलाही सुरुवात केली आहे. लवकरच देशभरात त्याची अंमलबजावणी सुरू होईल.या मॉडेलच्या अंमलबजावणीचे दोन दोन प्रमुख शिलेदार होते राजस्थानच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव रोहितकुमार सिंग आणि भिलवाड्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट.रोहितकुमार सिंग सांगतात, अतिशय कठोर आणि अत्यंत झटपट, आक्रमक कार्यवाही हे या मॉडेलचे यश आहे. लोकांशी वागताना आम्ही अतिशय ‘कठोर’ तरीही तितकेचसंवेदनशीलही होतो. आणखी एक आव्हानहोते, ते म्हणजे घरोघर जाणाºया टीमचे मनोबल, हिंमत कायम राखण्याचे. त्यावरही आम्ही भर दिला. सुरुवातीला दोघे दगावले, पण आज जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. सगळे रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, पणतरीही इथल्या कोरोना सैनिकांचे काम मात्र थांबलेले नाही.(सविस्तर माहिती : ‘मंथन’- आतील पानात)आम्ही लोकांची कोणतीच अडचण होऊ दिली नाही, पण कोणालाच कोणतीच सूटही दिली नाही. राजकारण्यांपासून ते पत्रकार आणि समाजसेवकांनाही आम्ही मोकळीक दिली नाही. अनेक अडचणी आल्या, पण त्यातून शिकायलाही मिळाले.- राजेंद्र भट्ट,जिल्हाधिकारी भिलवाडा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकDeathमृत्यू