शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

‘झेडपी’तही शिस्तपर्व...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:26 IST

संघनायक कडव्या शिस्तीचा असला की संघाला आपसूकच शिस्त लागते, नाही काही तर किमान शैथिल्य तरी झटकले जाते. नाशिक महापालिकेत तेच अनुभवास येत आहे व जिल्हा परिषदेतही त्याची सुरुवात झाली आहे, ही या स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित सर्वच संबंधितांसाठी समाधानाचीच बाब म्हणता यावी.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा कारभार म्हणजे बारभार्इंचा कारभार यंत्रणेचे शैथिल्य कामकाजावर परिणाम करते मुख्य प्रवेशद्वाराजवळील आवारात नेहमी वाहनांची गर्दी

साराश/ किरण अग्रवालसंघनायक कडव्या शिस्तीचा असला की संघाला आपसूकच शिस्त लागते, नाही काही तर किमान शैथिल्य तरी झटकले जाते. नाशिक महापालिकेत तेच अनुभवास येत आहे व जिल्हा परिषदेतही त्याची सुरुवात झाली आहे, ही या स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित सर्वच संबंधितांसाठी समाधानाचीच बाब म्हणता यावी. जिल्हा परिषदेचा कारभार म्हणजे बारभार्इंचा कारभारच राहत आल्याचे नेहमी म्हटले जात असते. त्यातही कुण्या एका पक्षाची निर्विवाद सत्ता असली तर त्या सत्ताधाºयांच्या धाकाने नोकरशाही काहीशी सरळ मार्गाने चालते; पण ‘जोडतोड’ची सत्ता असते तेव्हा ती सत्ताधाºयांतीलच बेबनावाची संधी घेत सुस्तावते असाच आजवरचा अनुभव आहे. अर्थात, अशा यंत्रणेचे कान पिळून त्यांना कामाला लावणारेही काही मुख्य कार्यकारी अधिकारी येऊन गेले आहेत, नाही असे नाही; परंतु मध्यंतरीच्या दीपककुमार मीणा यांच्या काळात ती सुस्तावल्याचेच दिसून येत होते. यंत्रणेचे हे असे शैथिल्य कामकाजावर परिणाम करते व विकासाची गती मंदावण्यात त्याचे पर्यावसान होत असते. मीणा यांच्या जागी बदलून आलेल्या डॉ. नरेश गिते यांनीही आल्या आल्या ही सुस्तताच दूर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. जागेवर न आढळणाºया कर्मचाºयांना नोटिसा बजावून ‘जागेवर’ आणतानाच मध्यंतरीच्या काळात तीन-तीन महिने टेबलांवर प्रलंबित पडून राहणाºया फायलींचा निपटारा त्यांनी आठवडाभरात केल्याचे पहावयास मिळाले. चालढकल हा प्रकार संपुष्टात आणायचे त्यांनी ठरविले आहे. त्यासाठी जो कणखरपणा असावा लागतो तो गिते यांच्याकडे असल्याचेही कार्यालय आवारातील वाहनबंदीच्या प्रकरणातून दिसून आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील आवारात नेहमी वाहनांची गर्दी होऊन गोंधळ उडत असतो. या कार्यालयात येणारा प्रत्येकच जण मग तो या संस्थेचा अधिकृत प्रतिनिधी असो अगर ग्रामपंचायत स्तरावरून येणारा सरपंच अथवा साधा सदस्य, हे सर्वच जण स्वत:ला नेतेच समजत असल्याने त्यांना त्यांचे वाहन थेट मुख्य इमारतीपर्यंत नेता येऊन ऐटीत उतरण्याची इच्छा असते. याला छेद देत फक्त विद्यमान पदाधिकारी व सदस्यवगळता अन्य सर्वांसाठीच या आवारात वाहनबंदी करण्यात आली आहे. त्यातून प्रतिदिनी खटके उडत आहेत. पण गिते यांनी निर्धाराने त्याची अंमलबजावणी करण्याचे ठणकावले आहे. विशेष म्हणजे, सध्या बिहारमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती असली तरी, बिहारमधून दृकश्राव्य चर्चेच्या (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून त्यांनी येथल्या ‘झेडपी’तील खातेप्रमुखांशी संवाद साधून कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न केला. यातून शासनाला अपेक्षित असल्याप्रमाणे प्रशासन गतिमान होण्यास निश्चितच मदत होणार आहे. ग्रामपातळीपर्यंत विकास पोहोचवायचा तर त्यासाठी प्रशासनाची ही गतिमानताच कामी येणार आहे.