शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

दारणा जलाशयातून दोन हजार क्युसेकचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 01:44 IST

इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने दारणा आणि भावली धरणांतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे या दोन्ही प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक : इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने दारणा आणि भावली धरणांतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे या दोन्ही प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, रविवारी भावली परिसरात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी आलेल्या पोलिसांनी मज्जाव करीत त्यांना परत पाठविले. तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जलप्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. दारणा धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत धरणातून ६७० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. रविवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणाची पातळी वाढत असल्याने दुपारी १२ वाजेनंतर १२९१ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सायंकाळी पुन्हा धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली. त्यामुळे सायंकाळी ६ वाजेनंतर १९८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पावसाचा जोर कायम असल्याने रात्रीतून आणखी पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

--इन्फो--

इगतपुरी तालुक्यातील भावली धरण देखील ओव्हरफ्लो झाल्याने येथूनही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सकाळी सहा वाजेपासून ७३ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामध्ये सातत्याने वाढ करावी लागत असून रात्रीतून आणखी वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसDamधरण