आपत्ती कधीही येऊ शकते व्यवस्थापन कार्यशाळा : मेजर जनरल दत्ता यांचे मार्गदर्शन
By Admin | Updated: May 30, 2014 01:03 IST2014-05-30T00:57:12+5:302014-05-30T01:03:51+5:30
नाशिक : आपत्तीपासून कोणताही देश चुकलेला नाही. ती केव्हाही व कधीही येऊ शकते. त्यामुळे आज तयारी केली आणि दुसर्या दिवशी बेसावध राहिलो तर उपयोग नाही, असे सांगत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ मेजर जनरल दत्ता यांनी संभाव्य आपत्ती व त्यापासून होणार्या हानीपासून वाचण्याबाबत बारीकसारीक गोष्टींची माहिती जिल्ातील शासकीय अधिकार्यांना दिली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणार्या कोट्यवधी भाविकांच्या गर्दीचे नियोजन करणे सहज शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपत्ती कधीही येऊ शकते व्यवस्थापन कार्यशाळा : मेजर जनरल दत्ता यांचे मार्गदर्शन
नाशिक : आपत्तीपासून कोणताही देश चुकलेला नाही. ती केव्हाही व कधीही येऊ शकते. त्यामुळे आज तयारी केली आणि दुसर्या दिवशी बेसावध राहिलो तर उपयोग नाही, असे सांगत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ मेजर जनरल दत्ता यांनी संभाव्य आपत्ती व त्यापासून होणार्या हानीपासून वाचण्याबाबत बारीकसारीक गोष्टींची माहिती जिल्ातील शासकीय अधिकार्यांना दिली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणार्या कोट्यवधी भाविकांच्या गर्दीचे नियोजन करणे सहज शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळ्याशी निगडित असलेल्या सर्व शासकीय खात्याच्या प्रमुखांसाठी गुरुवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रत्येक कार्यालयाने आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीबाबत सादरीकरण केल्यानंतर त्यातील प्रत्येक मुद्द्याचा आधार घेऊन दत्ता यांनी मार्गदर्शन केले. अनादी काळापासूनच जगात आपत्ती येत आहेत. त्यामुळे हा विषय आत्ताच सुरू झाला असे नाही, तर यापूर्वी आपत्ती कशी हाताळावी याविषयी साधनसामग्री व समन्वय नसल्याने जीवित व मनुष्यहानी सोसावी लागली. आता मात्र जागतिक पातळीवरच हा विषय गांभीर्याने घेण्यात आल्याने आपत्तीत मृतांना बाहेर काढण्याऐवजी जीवितहानी कशी होणार नाही किंवा कमी होईल याला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र रस्ते, स्नानासाठी विशिष्ट वेळ व जत्थ्याला प्राधान्य, जितकी जागा तितक्याच भाविकांची व्यवस्था या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे दत्ता यांनी सांगितले. आपत्ती कोठेही घडू शकते हे लक्षात घेऊन सिंहस्थ कुंभमेळ्यातील महत्त्वाच्या ठिकाणी रुग्णवाहिका, शववाहिका, पोलीस, अग्निशामक दल, मदतकार्य पोहोचविणारी वाहने सहजपणे ये-जा करू शकतील यासाठी त्यांना स्वतंत्र मार्ग खुला करण्याची सूचनाही त्यांनी केली. कोणत्या प्रकारची आपत्ती येऊ शकते याचा अभ्यास करून त्या-त्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी स्वतंत्र पथक सर्व साधनसामग्रीसह सज्ज ठेवल्यास परिस्थिती हाताळणे कठीण नसल्याचेही दत्ता यांनी सांगितले. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेस जिल्हाधिकारी विलास पाटील, महापालिका आयुक्त संजीवकुमार, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, अपर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह सर्व शासकीय खात्यांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.