शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मतभेद मिटले, आता मनभेदही नष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 02:31 IST

मूळ पक्षाचेच असलेले नेते काही कारणास्तव घरापासून दुरावले, पुन्हा स्वगृही परतले, त्यामुळे आगामी काळात सेनेला सुगीचे दिवस असून, मतभेद मिटले, आता मनभेदही नष्ट झाल्याची भावना शिवसेनेत नुकताच प्रवेश घेतलेल्या सुनील बागुल व वसंत गिते यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने उपस्थितांनी व्यक्त केली. 

ठळक मुद्देगिते, बागुल यांचा सत्कार : भाजपवर सेनेची आगपाखड

नाशिक : मूळ पक्षाचेच असलेले नेते काही कारणास्तव घरापासून दुरावले, पुन्हा स्वगृही परतले, त्यामुळे आगामी काळात सेनेला सुगीचे दिवस असून, मतभेद मिटले, आता मनभेदही नष्ट झाल्याची भावना शिवसेनेत नुकताच प्रवेश घेतलेल्या सुनील बागुल व वसंत गिते यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने उपस्थितांनी व्यक्त केली. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपला आगामी काळात धडा शिकविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी  बागुल यांनी,  मी पक्षापासून दूर गेलो, असे  वाटले नाही. मात्र, ज्या-ज्या पक्षात गेलो, तेथील कामाची सारी पद्धतच आपण अवगत केली असून, या पद्धतीचा उपयोग आता सेनेत काम करताना कामी येणार आहे, असे सांगितले.  वसंत गिते यांनी, आपण मूळ शिवसेनेचे आहोत, राज्यात शिवसेनेचे सरकार असल्यामुळे आपल्यावर मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले.यावेळी उपनेते बबन घोलप यांनी, पक्षात साऱ्यानाच पदे हवी असतात, परंतु सर्वांनाच ते देणे शक्य नसते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, असे सांगितले, तर जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी भाजपवर तोफ डागून पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपचा काटा काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आल्याचे सांगितले. यावेळी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, रंजना नेवाडकर, विनायक पांडे, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, विलास शिंदे, सत्यभामा गाडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.शुद्धीकरण... :  भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेल्या सुनील बागुल आणि वसंत गिते यांचा स्वागत सोहळा पार पडला.  यावेळी नव्या जीवनशैलीच्या नव्या प्रथेनुसार जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सुनील बागुल यांचे सॅनिटायझरने हात स्वच्छ केले. नव्या प्रकारचे हे राजकीय शुद्धीकरण असल्याची चर्चा रंगली होती. 

टॅग्स :NashikनाशिकShiv SenaशिवसेनाVasant Giteवसंत गीते