शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

आगीत डाळिंबबाग खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:46 IST

तालुक्यातील चौगाव येथे शेतातून गेलेल्या विद्युतवाहिन्यांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने सोमवारी (दि. २६) सायंकाळी आग लागून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंबबाग भस्मसात झाली. यात आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सटाणा : तालुक्यातील चौगाव येथे शेतातून गेलेल्या विद्युतवाहिन्यांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने सोमवारी (दि. २६) सायंकाळी आग लागून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंबबाग भस्मसात झाली. यात आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  मंगळवारी महसूल विभागाने पंचनामा केला. डाळिंबबागेतील सर्व १२०० झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेवाळे कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते झाले आहे. शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे. यावेळी शेतात काम करत असलेले भास्कर शेवाळे यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, यात त्यांचा हात व पायाला गंभीर जखमा झाल्या. त्यांनी आरडाओरडा करून परिसरातील इतर शेतकºयांना बोलविण्याचा आटापिटा केला; मात्र सोसाट्याचा वारा व आगीच्या रौद्ररूपामुळे तीन एकर क्षेत्रावरील संपूर्ण बाग भस्मसात झाली. या आगीत शेवाळे यांच्या १२०० डाळिंबाच्या झाडांसह ठिंबक सिंचन, जलवाहिनी, पाणी शुद्धीकरण यंत्र, फवारणी यंत्र, विहिरीवरील विद्युतपेटी, वायर आदी सर्व साहित्य जळून खाक झाले.  दरम्यान, तलाठी वाय. जी. पठाण, कृषी सहायक एस. के. पाटील, ग्रामसेवक आर. एच. शेख यांनी भेट देऊन पंचनामा केला. महसूल, वीज महावितरण व कृषी विभागाने या बाबीची दखल घ्यावी आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नंदकिशोर शेवाळे, दादाजी शेवाळे, दीपक शेवाळे, भाऊसाहेब शेवाळे, बबन गांगुर्डे, दगा गांगुर्डे, रोशन शेवाळे, सुनील जगताप आदींनी केली आहे.होत्याचे नव्हते झाले...!चौगाव परिसरात लताबाई शेवाळे व त्यांचे दीर भास्कर शेवाळे यांनी भीमदरा शिवारातील बंद्या डोंगरालगत खडकाळ जमिनीचे दीड वर्षापूर्वी सपाटीकरण करून डाळिंबबाग फुलवली होती. बहार धरण्याची वेळ आली असताना कष्टांना फळ मिळेल या अपेक्षेत शेवाळे कुटुंबीय होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिनींमध्ये अचानक घर्षण झाल्याने डाळिंबबागेवर ठिणग्या पडल्या. त्यामुळे संपूर्ण बागेने क्षणात पेट घेतला. १२०० डाळिंबाच्या झाडांसह ठिंबक सिंचन, जलवाहिनी, पाणी शुद्धीकरण यंत्र (फिल्टर मशीन), फवारणी यंत्र, विहिरीवरील विद्युतपेटी, वायर आदी साहित्य जळून खाक झाले. होत्याचे नव्हते झाल्याने शेवाळे कुटूंबियांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.वर्षभरापूर्वी पती वसंत शेवाळे यांचे निधन झाल्यानंतर सोने गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेतले होते. आपल्या दीड एकरावर डाळिंबबाग घ्यावी, कुटुंबाचे भविष्य घडवावे आणि कर्ज फेडायचे अशी इच्छा होती; मात्र आगीने होत्याचे नव्हते झाल्याने आता कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मदत करावी अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही.  - लताबाई वसंत शेवाळे

टॅग्स :FarmerशेतकरीFairजत्रा