शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

आगीत डाळिंबबाग खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:46 IST

तालुक्यातील चौगाव येथे शेतातून गेलेल्या विद्युतवाहिन्यांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने सोमवारी (दि. २६) सायंकाळी आग लागून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंबबाग भस्मसात झाली. यात आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सटाणा : तालुक्यातील चौगाव येथे शेतातून गेलेल्या विद्युतवाहिन्यांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने सोमवारी (दि. २६) सायंकाळी आग लागून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंबबाग भस्मसात झाली. यात आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  मंगळवारी महसूल विभागाने पंचनामा केला. डाळिंबबागेतील सर्व १२०० झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेवाळे कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते झाले आहे. शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे. यावेळी शेतात काम करत असलेले भास्कर शेवाळे यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, यात त्यांचा हात व पायाला गंभीर जखमा झाल्या. त्यांनी आरडाओरडा करून परिसरातील इतर शेतकºयांना बोलविण्याचा आटापिटा केला; मात्र सोसाट्याचा वारा व आगीच्या रौद्ररूपामुळे तीन एकर क्षेत्रावरील संपूर्ण बाग भस्मसात झाली. या आगीत शेवाळे यांच्या १२०० डाळिंबाच्या झाडांसह ठिंबक सिंचन, जलवाहिनी, पाणी शुद्धीकरण यंत्र, फवारणी यंत्र, विहिरीवरील विद्युतपेटी, वायर आदी सर्व साहित्य जळून खाक झाले.  दरम्यान, तलाठी वाय. जी. पठाण, कृषी सहायक एस. के. पाटील, ग्रामसेवक आर. एच. शेख यांनी भेट देऊन पंचनामा केला. महसूल, वीज महावितरण व कृषी विभागाने या बाबीची दखल घ्यावी आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नंदकिशोर शेवाळे, दादाजी शेवाळे, दीपक शेवाळे, भाऊसाहेब शेवाळे, बबन गांगुर्डे, दगा गांगुर्डे, रोशन शेवाळे, सुनील जगताप आदींनी केली आहे.होत्याचे नव्हते झाले...!चौगाव परिसरात लताबाई शेवाळे व त्यांचे दीर भास्कर शेवाळे यांनी भीमदरा शिवारातील बंद्या डोंगरालगत खडकाळ जमिनीचे दीड वर्षापूर्वी सपाटीकरण करून डाळिंबबाग फुलवली होती. बहार धरण्याची वेळ आली असताना कष्टांना फळ मिळेल या अपेक्षेत शेवाळे कुटुंबीय होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिनींमध्ये अचानक घर्षण झाल्याने डाळिंबबागेवर ठिणग्या पडल्या. त्यामुळे संपूर्ण बागेने क्षणात पेट घेतला. १२०० डाळिंबाच्या झाडांसह ठिंबक सिंचन, जलवाहिनी, पाणी शुद्धीकरण यंत्र (फिल्टर मशीन), फवारणी यंत्र, विहिरीवरील विद्युतपेटी, वायर आदी साहित्य जळून खाक झाले. होत्याचे नव्हते झाल्याने शेवाळे कुटूंबियांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.वर्षभरापूर्वी पती वसंत शेवाळे यांचे निधन झाल्यानंतर सोने गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेतले होते. आपल्या दीड एकरावर डाळिंबबाग घ्यावी, कुटुंबाचे भविष्य घडवावे आणि कर्ज फेडायचे अशी इच्छा होती; मात्र आगीने होत्याचे नव्हते झाल्याने आता कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मदत करावी अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही.  - लताबाई वसंत शेवाळे

टॅग्स :FarmerशेतकरीFairजत्रा