शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

बालमृत्यू कमी करण्यासाठी अतिसार नियंत्रण पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:12 IST

राष्टय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असलेल्या बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी येत्या दि.२८ पासून जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांनी दिली.

नाशिक : राष्टय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असलेल्या बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी येत्या दि.२८ पासून जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांनी दिली.बालमृत्यूला अतिसार हे एक प्रमुख कारण मानले जाते. सरासरी १० टक्के बालके ही अतिसारामुळे दगावतात. हे बालमृत्यू प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. सन २०१५-१६ मध्ये घेण्यात आलेल्या अतिसार नियंत्रण पंधरवड्याच्या आयोजनानंतर आता नाशिक जिल्ह्णात २८ मे ते ९ जून या कालावधीत पंधरवडा साजरा केला जाणार आहे. अतिसराचे प्रमाण शून्य टक्क्यावर आणणे हा प्रमुख उद्देश असल्याचेदेखील वाघचौरे यांनी सांगितले. या मोहिमेत अतिसार आजाराची माहिती, त्याची कारणे, लक्षणे, उपचार, जबाबदारी, घ्यावयाची काळजी, ओआरएस आणि झिंक गोळीचे महत्त्व, वापर याची माहिती सर्वसामान्यांना देण्यात येणार आहे.  सदर उपक्रम हा आरोग्य उपकेंद्रे, अंगणवाडी, प्रशाळा, ग्रामपंचायत या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत आयोजित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, नगरपालिका, महानगरपालिका, आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी या ठिकाणी ओआरएम आणि झिंक कॉर्नर स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे तातडीचे उपचार करणे सोपे होरार आहे. याबरोबरच आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दुर्गम व अतिसंवेदनशील भागात घरोघरी जाऊन ओआरएम आणि झिंक गोळ्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे. यावेळी अतिसार झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचारदेखील केले जाणार आहे. सदर उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन मुख्य कार्येकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी केले आहे.  हा कार्यक्रम यशस्वी आणि प्रभावी करण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली असून, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. तालुकास्तरावर वैद्यकीय अधीक्षक अध्यक्ष आहेत. अति संवेदनशील व दुर्गम आदिवासी पाडे, मच्छीमारवस्ती, पूरग्रस्त वस्ती, भटक्या जमाती, विटभट्टी, बांधकाम, अनाथ आश्रम या ठिकाणी या तीन महिन्यांत रिक्त असलेल्या गावांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद