शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
3
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
4
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
5
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
7
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
8
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
10
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
11
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
12
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
13
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
14
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
15
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
16
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
17
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
18
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
19
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
20
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील

बालमृत्यू कमी करण्यासाठी अतिसार नियंत्रण पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:12 IST

राष्टय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असलेल्या बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी येत्या दि.२८ पासून जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांनी दिली.

नाशिक : राष्टय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असलेल्या बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी येत्या दि.२८ पासून जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांनी दिली.बालमृत्यूला अतिसार हे एक प्रमुख कारण मानले जाते. सरासरी १० टक्के बालके ही अतिसारामुळे दगावतात. हे बालमृत्यू प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. सन २०१५-१६ मध्ये घेण्यात आलेल्या अतिसार नियंत्रण पंधरवड्याच्या आयोजनानंतर आता नाशिक जिल्ह्णात २८ मे ते ९ जून या कालावधीत पंधरवडा साजरा केला जाणार आहे. अतिसराचे प्रमाण शून्य टक्क्यावर आणणे हा प्रमुख उद्देश असल्याचेदेखील वाघचौरे यांनी सांगितले. या मोहिमेत अतिसार आजाराची माहिती, त्याची कारणे, लक्षणे, उपचार, जबाबदारी, घ्यावयाची काळजी, ओआरएस आणि झिंक गोळीचे महत्त्व, वापर याची माहिती सर्वसामान्यांना देण्यात येणार आहे.  सदर उपक्रम हा आरोग्य उपकेंद्रे, अंगणवाडी, प्रशाळा, ग्रामपंचायत या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत आयोजित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, नगरपालिका, महानगरपालिका, आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी या ठिकाणी ओआरएम आणि झिंक कॉर्नर स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे तातडीचे उपचार करणे सोपे होरार आहे. याबरोबरच आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दुर्गम व अतिसंवेदनशील भागात घरोघरी जाऊन ओआरएम आणि झिंक गोळ्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे. यावेळी अतिसार झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचारदेखील केले जाणार आहे. सदर उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन मुख्य कार्येकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी केले आहे.  हा कार्यक्रम यशस्वी आणि प्रभावी करण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली असून, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. तालुकास्तरावर वैद्यकीय अधीक्षक अध्यक्ष आहेत. अति संवेदनशील व दुर्गम आदिवासी पाडे, मच्छीमारवस्ती, पूरग्रस्त वस्ती, भटक्या जमाती, विटभट्टी, बांधकाम, अनाथ आश्रम या ठिकाणी या तीन महिन्यांत रिक्त असलेल्या गावांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद