शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Narayan Rane Arrest: 'फडणवीसांना कायद्याचं चांगलं ज्ञान, पण मी माझ्या आदेशावर ठाम'; नाशिक पोलीस आयुक्त स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 11:29 IST

Narayan Rane: राणेंनी घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असं लिहून दिल्यानं आता त्यांना पुन्हा अटक करण्याची गरज नाही, असं नाशिक पोलीस आयुक्त म्हणाले.

Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर महाड कोर्टानं काल रात्री त्यांना जामीन दिला. पण आता नाशिक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे राणेंना पुन्हा अटक केली जाणार असल्याची चर्चा होती. पण याबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन राणेंना आता पुन्हा अटक करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

"केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात दाखल गुन्ह्यासंदर्भात त्यांना अटक करण्यासाठी आमची टीम रत्नागिरीत दाखल झाली होती. पण महाडमध्येही त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद असल्यानं महाड पोलिसांनी त्यांना अटक केली होती. रात्री उशिरा त्यांना महाड कोर्टानं जामीन मंजुर केला आहे. यात मंत्री महोदयांनी घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असं लेखी दिलं आहे. त्यामुळे त्यांना आता पुन्हा अटक करण्याची गरज नाही. आम्ही अटकेच्या आदेशात बदल करुन त्यांना फक्त जबाब नोंदविण्यासाठी २ सप्टेंबरपर्यंत नाशिक पोलीस ठाण्यात हजर राहावं लागणार आहे. यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं आणि राणेंनीही सहकार्य करण्यास तयारी दाखवली आहे. मंत्री महोदयांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचं आम्ही स्वागत करतो", असं नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणाले. 

फडणवीसांच्या आरोपावर दिली प्रतिक्रियाराज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत नाशिकचे पोलीस आयुक्त काय छत्रपती आहेत का? असा सवाल उपस्थित करत दीपक पांडे यांनी जारी केलेल्या अटकेच्या आदेशावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं होतं. याबाबत दीपक पांडे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी अटकेचे आदेश कायद्यानुसारच देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.

"राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना समाजकारणाचा चांगला अनुभव आहे. ते खूप जाणकार नेते आहेत. त्यांना कायद्याचंही चांगलं ज्ञान आहे. त्यांना आव्हान देण्याची वगैरे भूमिका नाही. पण आम्ही जारी केलेले आदेश त्यांना घटनाबाह्य वाटत असतील तर ते त्याविरोधात भारतीय घटनेच्या तरतुदीनुसार यावर माहिती जाणून घेऊ शकतात. तो त्यांचा अधिकार आहे. पण माझ्या मतानुसार मी जारी केलेल्या आदेशावर ठाम असून अटकेचे आदेश कायद्यानुसार आणि पूर्णपणे योग्य होते. त्यात राणेंनी आता घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असं लेखी दिल्यानं अटक करण्याची गरज राहत नाही. त्यामुळे आम्ही अटकेच्या आदेशात बदल केले आहेत", असं दीपक पांडे म्हणाले. 

कायदा व सुव्यवस्था हाच कारवाईचा हेतूकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानामुळे विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये हाच कारवाईचा हेतू होता. राणे यांनीही स्वत: तपासात सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. पोलिसांना संपूर्णपणे सहकार्य करण्याची हमी त्यांनी दिली आहे, असंही दीपक पांडे म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNashikनाशिकNarayan Raneनारायण राणे