शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

विकास हा पर्यावरणाचा ‘मित्र’ व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 01:16 IST

अलीकडे विकास आणि पर्यावरण हा विरुद्ध अर्थी शब्द वाटायला लागला आहे. वास्तविक या दोन्हीबाबत संयमाने विचार करण्याची अपेक्षा असताना यामध्ये घाई होताना दिसते. विकास करणे म्हणजे सर्वच ओरबाडणे असे नव्हे तर निसर्गाने जे दिले ते जपले देखील आहे. त्यामुळे विकास हा पर्यावरणाचा मित्र व्हावा या दृष्टीने नियोजन झाले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे : ‘मित्रा’ संस्थेच्या ई-उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

नाशिक: अलीकडे विकास आणि पर्यावरण हा विरुद्ध अर्थी शब्द वाटायला लागला आहे. वास्तविक या दोन्हीबाबत संयमाने विचार करण्याची अपेक्षा असताना यामध्ये घाई होताना दिसते. विकास करणे म्हणजे सर्वच ओरबाडणे असे नव्हे तर निसर्गाने जे दिले ते जपले देखील आहे. त्यामुळे विकास हा पर्यावरणाचा मित्र व्हावा या दृष्टीने नियोजन झाले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात मित्रा या संस्थेच्या नाशिकरोड येथील नवीन इमारत व मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार होते. कार्यक्रमस्थळी पालकमंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, आमदार सरोज अहिरे, नरेंद्र दराडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पाणी आणि स्वच्छतासंबंधी संशोधन करणाऱ्या या संस्थेमुळे घराघरात शुद्ध पाणी पोहचविण्याच्या राज्याच्या योजनेला बळकटी मिळण्यास मदतच होणार आहे. पाणी आणि स्वच्छता या दोन्ही महत्त्वाच्या गरजा असल्याने नागरिकांच्या हितासाठीचे संशोधन या ठिकाणी होणार असल्याने केवळ राज्यातीलच नव्हे तर परराज्यातील, परदेशातील तज्ज्ञांना येथे प्रशिक्षण देता येऊ शकेल. सध्या पुराचे पाणी घरात आणि घरातील नळाला पाणीच नाही अशी परिस्थिती होतांना दिसते. आपणाला हे चित्र बदलावे लागेल. प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहचेल आणि पुराचे पाणी घरापर्यंत येणार नाही अशी विकासाची संकल्पना राबवावी लागणार आहे. प्रदूषण टाळून विकास करता आला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नागरिकांना गुणवत्तापूर्ण पाणी देण्याची शासनाची जबाबदारी आहेच, परंतु नागरिकांनीदेखील पाणी जपून वापरण्याचे आणि जलस्त्रोत जपण्याचे भान राखले पाहिजे. यासाठी अजूनही जलसाक्षरता राबविण्याची आवश्यकता आहे. पाण्याची गुणवत्ता आणि पाण्यातील पोषक घटक कसे जपले जातील याबाबतचेही संशोधन गरजेचे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे यांनीही मनोगत व्यक्त केले.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव डॉ. संजय चहांदे यांनी प्रास्ताविक केले.

--इन्फो--

मित्रो आणि मित्रा

महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात ‘मित्रा’ हे नाव आपल्याला आवडल्याचे भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले. मित्रा या नावामुळे आपणाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मित्रो’ या शब्दाची आठवण झाल्याचे सांगितले.

--इन्फो--

भुजबळ साहेब, जरा थांबावे लागेल

नाशिक हा शेतीप्रधान जिल्हा आहे त्यामुळे मित्रा या संस्थेप्रमाणेच नाशिकला अत्याधुनिक कृषी भवन निर्माण व्हावे, अशी अपेक्षा भुजबळ यांनी भाषणात व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात भुजबळ यांच्या मागणीचा धागा पकडत नुकतेच पुणे येथे २२२ कोटींचे अत्याधुनिक कृषी भवन तयार करण्यात आल्याचे सांगत भुजबळ यांना आणखी काही काळ थांबावे लागेल, असे म्हटले.

टॅग्स :NashikनाशिकUddhav Thackerayउद्धव ठाकरेGovernmentसरकार