शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

विकास हा पर्यावरणाचा ‘मित्र’ व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 01:16 IST

अलीकडे विकास आणि पर्यावरण हा विरुद्ध अर्थी शब्द वाटायला लागला आहे. वास्तविक या दोन्हीबाबत संयमाने विचार करण्याची अपेक्षा असताना यामध्ये घाई होताना दिसते. विकास करणे म्हणजे सर्वच ओरबाडणे असे नव्हे तर निसर्गाने जे दिले ते जपले देखील आहे. त्यामुळे विकास हा पर्यावरणाचा मित्र व्हावा या दृष्टीने नियोजन झाले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे : ‘मित्रा’ संस्थेच्या ई-उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

नाशिक: अलीकडे विकास आणि पर्यावरण हा विरुद्ध अर्थी शब्द वाटायला लागला आहे. वास्तविक या दोन्हीबाबत संयमाने विचार करण्याची अपेक्षा असताना यामध्ये घाई होताना दिसते. विकास करणे म्हणजे सर्वच ओरबाडणे असे नव्हे तर निसर्गाने जे दिले ते जपले देखील आहे. त्यामुळे विकास हा पर्यावरणाचा मित्र व्हावा या दृष्टीने नियोजन झाले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात मित्रा या संस्थेच्या नाशिकरोड येथील नवीन इमारत व मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार होते. कार्यक्रमस्थळी पालकमंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, आमदार सरोज अहिरे, नरेंद्र दराडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पाणी आणि स्वच्छतासंबंधी संशोधन करणाऱ्या या संस्थेमुळे घराघरात शुद्ध पाणी पोहचविण्याच्या राज्याच्या योजनेला बळकटी मिळण्यास मदतच होणार आहे. पाणी आणि स्वच्छता या दोन्ही महत्त्वाच्या गरजा असल्याने नागरिकांच्या हितासाठीचे संशोधन या ठिकाणी होणार असल्याने केवळ राज्यातीलच नव्हे तर परराज्यातील, परदेशातील तज्ज्ञांना येथे प्रशिक्षण देता येऊ शकेल. सध्या पुराचे पाणी घरात आणि घरातील नळाला पाणीच नाही अशी परिस्थिती होतांना दिसते. आपणाला हे चित्र बदलावे लागेल. प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहचेल आणि पुराचे पाणी घरापर्यंत येणार नाही अशी विकासाची संकल्पना राबवावी लागणार आहे. प्रदूषण टाळून विकास करता आला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नागरिकांना गुणवत्तापूर्ण पाणी देण्याची शासनाची जबाबदारी आहेच, परंतु नागरिकांनीदेखील पाणी जपून वापरण्याचे आणि जलस्त्रोत जपण्याचे भान राखले पाहिजे. यासाठी अजूनही जलसाक्षरता राबविण्याची आवश्यकता आहे. पाण्याची गुणवत्ता आणि पाण्यातील पोषक घटक कसे जपले जातील याबाबतचेही संशोधन गरजेचे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे यांनीही मनोगत व्यक्त केले.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव डॉ. संजय चहांदे यांनी प्रास्ताविक केले.

--इन्फो--

मित्रो आणि मित्रा

महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात ‘मित्रा’ हे नाव आपल्याला आवडल्याचे भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले. मित्रा या नावामुळे आपणाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मित्रो’ या शब्दाची आठवण झाल्याचे सांगितले.

--इन्फो--

भुजबळ साहेब, जरा थांबावे लागेल

नाशिक हा शेतीप्रधान जिल्हा आहे त्यामुळे मित्रा या संस्थेप्रमाणेच नाशिकला अत्याधुनिक कृषी भवन निर्माण व्हावे, अशी अपेक्षा भुजबळ यांनी भाषणात व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात भुजबळ यांच्या मागणीचा धागा पकडत नुकतेच पुणे येथे २२२ कोटींचे अत्याधुनिक कृषी भवन तयार करण्यात आल्याचे सांगत भुजबळ यांना आणखी काही काळ थांबावे लागेल, असे म्हटले.

टॅग्स :NashikनाशिकUddhav Thackerayउद्धव ठाकरेGovernmentसरकार