शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणारे देशप्रेमीच! तुषार गांधी : मार्क्स, गांधी, आंबेडकर संमेलनात पुरोगामी वैचारिक मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:29 IST

नाशिक : राष्टÑ उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विचारांचा संगम आज पूर्णत: भ्रष्ट झालेला दिसून येतो. असे होणे अत्यंत गंभीर व राष्टÑहिताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.

ठळक मुद्देमहात्मा गांधी यांच्याविषयी गैरसमज पसरविणाºयांचा समाचार आंबेडकर व गांधी यांनी एकमेकांना कधीही आपले शत्रू मानले नाही

नाशिक : राष्टÑ उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विचारांचा संगम आज पूर्णत: भ्रष्ट झालेला दिसून येतो. असे होणे अत्यंत गंभीर व राष्टÑहिताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना देशाची काळजी असते, त्यामुळे ते देशप्रेमीच आहेत; मात्र त्यांच्या प्रश्नांची उत्तरे न देणारे लोक देशद्रोही वाटतात, असे परखड मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.विचार जागर मंच व कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने तिसरे मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संमेलनाचे उद्घाटक म्हणून गांधी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक उत्तम कांबळे, रावसाहेब कसबे, श्रीपाद जोशी, डॉ. गोपाळ गुरु, रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते. यावेळी गांधी यांनी मूलतत्त्ववादी विचारधारेवर जोरदार टीका करीत आंबेडकर-महात्मा गांधी यांच्याविषयी गैरसमज पसरविणाºयांचा समाचार घेतला. ते म्हणाले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्येही वैचारिक मतभेद असतील, मात्र त्यांनी कधीही एकमेकांचा द्वेष केला नाही, असे सांगितले. गांधीजींच्या खुनाच्या खटल्याप्रसंगी डॉ. आंबेडकर कायदा मंत्रिपदावर असतानाही ते सुनावणीच्या वेळी जातीने उपस्थित राहत होते. त्यामुळे आंबेडकर व गांधी यांनी एकमेकांना कधीही आपले शत्रू मानले नाही. या दोघांना मानणाºया वर्गापैकी काही भक्तांनी आपली तर्कबुद्धी गहाण ठेवून गांधी-आंबेडकरांमध्ये शत्रुत्व निर्माण करून त्यांच्यावर अन्याय केला.‘चंपारण्य-खेडा’नंतरही शेतकºयांच्या समस्या ज्वलंतचंपारण्य व खेडा सत्याग्रह १९१८साली बापूंनी केला; मात्र त्यानंतरही शेतकºयांचे प्रश्न आजही तितकेच ज्वलंत वाटत आहेत. न्याय मागण्यासाठी शेतकरी नाशिक-मुंबई अशी पायपीट करत सत्ताधाºयांच्या द्वारावर मोर्चाने धडकला, हा पुरावा पुरेसा आहे शेतकºयांच्या व्यथा सांगण्यासाठी. आजही या सरकारच्या काळात मजूर, कष्टकरी कामगार, शेतकरी, दलित असे सर्वच घटक असुरक्षित झाले आहेत. मार्क्स, गांधी, आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावर व्याख्याने देऊन आता काही साध्य होणार नाही, तर सरकारला आव्हान देण्यासाठी लढा उभारावा लागेल, असे तुषार गांधी म्हणाले. पुणे करारावर बाबासाहेबांनी गांधीजींच्या हट्टापोटी स्वाक्षरी केली असे म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी स्वाक्षरी राष्टÑप्रेम व देशभक्ती मधून केली होती. त्यावेळी इंग्रज राजकीय विभागणी करण्याचा डाव आखत होते, याची जाणीव बाबासाहेबांना होती, असे गांधी यांनी सांगितले.