शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

मुहूर्त सापडला! नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेबाबत सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार बैठक

By संजय पाठक | Updated: July 6, 2024 10:02 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मुंबईत बैठक आयोजित केली आहे.

संजय पाठक, नाशिक- संथगती रुंदीकरण आणि पुलांची कामे त्यातच पावसामुळे पडलेले खड्डे यामुळे नाशिक ते मुंबई हा प्रवास शहापूर पासून ठाण्यापर्यँत अत्यंत   खडतर झाला आहे. दहा- दहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत असल्याने विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत आल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मुंबईत बैठक आयोजित केली आहे.

नाशिक मुंबई प्रवास हा साडे तीन  तासाचा प्रवास असला तरी आता सहा ते सात तास लागत आहेत. तसेच शनिवार आणि रविवार सारख्या सुटीच्या दिवशी तर दहा दहा किलोमीटर लांब रांगा लागतात. भिवंडी, शहापूर येथे मोठ्या प्रमाणात गोदाम असून त्या मुळे ट्रक, कंटेनर अशी अवजड वाहतूक या मार्गावरून असते. मात्र खड्ड्यामुळे ही अवजड वाहने हळू जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.राज्याचे माजी मुख्य सचिव नितीन करीर यांना निवृत्तीच्या एक दिवस अगोदर कसारा येथून लोकलने प्रवास करावा लागला होता. तर काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात नाशिकहून- मुंबईला जाताना वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांनी विधी मंडळात संताप व्यक्त केला होता.  नाशिकचे अनेक आमदार हे आता  रेल्वेने प्रवास नाशिक- मुंबई करतात.

या सर्व पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत बैठक बोलावली आहे, अशी माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNashikनाशिक