शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

नैराश्य, विवंचना अन् ताणतणाव आत्महत्यांचे मुख्य कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:52 IST

चिंता, ताणतणाव, नैराश्य, मानसिक आजार, उद्याची विवंचना, कौटुंबिक समस्या, तत्कालीन कारणे अशा अनेक बाबी आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणास कारणीभूत ठरत आहेत. मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या या गोष्टी आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्यानेच जगभरात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

आत्महत्या प्रतिबंध दिननाशिक : चिंता, ताणतणाव, नैराश्य, मानसिक आजार, उद्याची विवंचना, कौटुंबिक समस्या, तत्कालीन कारणे अशा अनेक बाबी आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणास कारणीभूत ठरत आहेत. मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या या गोष्टी आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्यानेच जगभरात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी समाजाला सकारात्मक बनवण्यासह आत्महत्येसंदर्भात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत नाशिकच्या मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.जगभरात १० आॅगस्ट हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडूनदेखील सर्व देशांमध्ये विशेष उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, आत्महत्या कमी करण्यासाठी एकूणच समाजात सकारात्मकतेत वृध्दी, एकमेकांबाबत स्नेहभावना आणि दुसऱ्या व्यक्तीचा सहृदयतेने विचार करण्याची मानसिकता वाढविण्याची आवश्यकता असल्याचा तज्ज्ञांचा सूर आहे. आत्महत्यांचे प्रमाण कमी करणे आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक आत्महत्येला कारणीभूत असलेल्या गोष्टींचा अभ्यास होणे आवश्यक आहे. योग्य उपचार मिळाल्यास आत्महत्येच्या मानसिकतेतून संबंधिताला बाहेर काढता येते, असा सूरदेखील या क्षेत्राशी निगडित मान्यवरांनी व्यक्त केला.नैराश्य, स्क्रीझोफ्रेनिया, ताणतणाव आणि मानसिक आजार हीच आत्महत्यांची प्रमुख कारणे असतात. तसेच समाजातील मानसिक सहनशीलतेचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. नकार सहन करणे, पचवण्याची क्षमताच लुप्त होत आहे. तसेच कोणत्याही व्यसनांच्या आहारी गेलेला व्यक्तींच्या आत्महत्येचे प्रमाणदेखील मोठे आहे.- डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञतरुणांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढले असून नैराश्य, मानसिक आजार अशी कारणेच त्याला अधिक प्रमाणात कारणीभूत आहेत. कौटुंबिक संबंध, नातेसंबंध, प्रेमप्रकरणे, करिअर यामधील ताणतणाव आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणास कारणीभूत आहेत. नाशिकमध्ये हे प्रमाण गत दीड-दोन दशकात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.- डॉ. जयंत ढाके, मानसोपचार तज्ज्ञआत्महत्या रोखण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी देश, समाज आणि व्यक्तिगत पातळीवर कृती करणे आवश्यक आहे. आत्महत्या ही एक सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. कुटुंब आणि समाजावर ती एक भावनिक आघात करते. मानसिक आजार, नैराश्य आणि तत्कालीक कारणे आत्महत्येला सर्वाधिक कारणीभूत ठरतात.- डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचार तज्ज्ञआत्महत्यांचे धक्कादायक वास्तव आकड्यातजगात दर ४० सेकंदाला एक आत्महत्या.मृत्यूच्या २० अव्वल कारणांमध्ये आत्महत्या प्रकाराचा समावेश.दरवर्षी जगात ८ लाख लोक आत्महत्या करून जीव गमावतात.१५ ते २९ या वयोगटातील मृत्यूमध्ये दुसºया क्रमांकाचे कारण आत्महत्या असते.एकूण आत्महत्यांपैकी ७९ टक्के प्रगतिशील देशांमध्येच होतात.भारतात दर एक लाख व्यक्तींच्या मृत्यूपैकी २३ मृत्यू आत्महत्येमुळे होतात.

टॅग्स :Nashikनाशिक