शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नैराश्य, विवंचना अन् ताणतणाव आत्महत्यांचे मुख्य कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:52 IST

चिंता, ताणतणाव, नैराश्य, मानसिक आजार, उद्याची विवंचना, कौटुंबिक समस्या, तत्कालीन कारणे अशा अनेक बाबी आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणास कारणीभूत ठरत आहेत. मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या या गोष्टी आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्यानेच जगभरात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

आत्महत्या प्रतिबंध दिननाशिक : चिंता, ताणतणाव, नैराश्य, मानसिक आजार, उद्याची विवंचना, कौटुंबिक समस्या, तत्कालीन कारणे अशा अनेक बाबी आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणास कारणीभूत ठरत आहेत. मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या या गोष्टी आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्यानेच जगभरात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी समाजाला सकारात्मक बनवण्यासह आत्महत्येसंदर्भात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत नाशिकच्या मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.जगभरात १० आॅगस्ट हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडूनदेखील सर्व देशांमध्ये विशेष उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, आत्महत्या कमी करण्यासाठी एकूणच समाजात सकारात्मकतेत वृध्दी, एकमेकांबाबत स्नेहभावना आणि दुसऱ्या व्यक्तीचा सहृदयतेने विचार करण्याची मानसिकता वाढविण्याची आवश्यकता असल्याचा तज्ज्ञांचा सूर आहे. आत्महत्यांचे प्रमाण कमी करणे आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक आत्महत्येला कारणीभूत असलेल्या गोष्टींचा अभ्यास होणे आवश्यक आहे. योग्य उपचार मिळाल्यास आत्महत्येच्या मानसिकतेतून संबंधिताला बाहेर काढता येते, असा सूरदेखील या क्षेत्राशी निगडित मान्यवरांनी व्यक्त केला.नैराश्य, स्क्रीझोफ्रेनिया, ताणतणाव आणि मानसिक आजार हीच आत्महत्यांची प्रमुख कारणे असतात. तसेच समाजातील मानसिक सहनशीलतेचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. नकार सहन करणे, पचवण्याची क्षमताच लुप्त होत आहे. तसेच कोणत्याही व्यसनांच्या आहारी गेलेला व्यक्तींच्या आत्महत्येचे प्रमाणदेखील मोठे आहे.- डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञतरुणांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढले असून नैराश्य, मानसिक आजार अशी कारणेच त्याला अधिक प्रमाणात कारणीभूत आहेत. कौटुंबिक संबंध, नातेसंबंध, प्रेमप्रकरणे, करिअर यामधील ताणतणाव आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणास कारणीभूत आहेत. नाशिकमध्ये हे प्रमाण गत दीड-दोन दशकात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.- डॉ. जयंत ढाके, मानसोपचार तज्ज्ञआत्महत्या रोखण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी देश, समाज आणि व्यक्तिगत पातळीवर कृती करणे आवश्यक आहे. आत्महत्या ही एक सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. कुटुंब आणि समाजावर ती एक भावनिक आघात करते. मानसिक आजार, नैराश्य आणि तत्कालीक कारणे आत्महत्येला सर्वाधिक कारणीभूत ठरतात.- डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचार तज्ज्ञआत्महत्यांचे धक्कादायक वास्तव आकड्यातजगात दर ४० सेकंदाला एक आत्महत्या.मृत्यूच्या २० अव्वल कारणांमध्ये आत्महत्या प्रकाराचा समावेश.दरवर्षी जगात ८ लाख लोक आत्महत्या करून जीव गमावतात.१५ ते २९ या वयोगटातील मृत्यूमध्ये दुसºया क्रमांकाचे कारण आत्महत्या असते.एकूण आत्महत्यांपैकी ७९ टक्के प्रगतिशील देशांमध्येच होतात.भारतात दर एक लाख व्यक्तींच्या मृत्यूपैकी २३ मृत्यू आत्महत्येमुळे होतात.

टॅग्स :Nashikनाशिक