शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्य, विवंचना अन् ताणतणाव आत्महत्यांचे मुख्य कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:52 IST

चिंता, ताणतणाव, नैराश्य, मानसिक आजार, उद्याची विवंचना, कौटुंबिक समस्या, तत्कालीन कारणे अशा अनेक बाबी आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणास कारणीभूत ठरत आहेत. मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या या गोष्टी आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्यानेच जगभरात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

आत्महत्या प्रतिबंध दिननाशिक : चिंता, ताणतणाव, नैराश्य, मानसिक आजार, उद्याची विवंचना, कौटुंबिक समस्या, तत्कालीन कारणे अशा अनेक बाबी आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणास कारणीभूत ठरत आहेत. मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या या गोष्टी आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्यानेच जगभरात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी समाजाला सकारात्मक बनवण्यासह आत्महत्येसंदर्भात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत नाशिकच्या मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.जगभरात १० आॅगस्ट हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडूनदेखील सर्व देशांमध्ये विशेष उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, आत्महत्या कमी करण्यासाठी एकूणच समाजात सकारात्मकतेत वृध्दी, एकमेकांबाबत स्नेहभावना आणि दुसऱ्या व्यक्तीचा सहृदयतेने विचार करण्याची मानसिकता वाढविण्याची आवश्यकता असल्याचा तज्ज्ञांचा सूर आहे. आत्महत्यांचे प्रमाण कमी करणे आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक आत्महत्येला कारणीभूत असलेल्या गोष्टींचा अभ्यास होणे आवश्यक आहे. योग्य उपचार मिळाल्यास आत्महत्येच्या मानसिकतेतून संबंधिताला बाहेर काढता येते, असा सूरदेखील या क्षेत्राशी निगडित मान्यवरांनी व्यक्त केला.नैराश्य, स्क्रीझोफ्रेनिया, ताणतणाव आणि मानसिक आजार हीच आत्महत्यांची प्रमुख कारणे असतात. तसेच समाजातील मानसिक सहनशीलतेचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. नकार सहन करणे, पचवण्याची क्षमताच लुप्त होत आहे. तसेच कोणत्याही व्यसनांच्या आहारी गेलेला व्यक्तींच्या आत्महत्येचे प्रमाणदेखील मोठे आहे.- डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञतरुणांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढले असून नैराश्य, मानसिक आजार अशी कारणेच त्याला अधिक प्रमाणात कारणीभूत आहेत. कौटुंबिक संबंध, नातेसंबंध, प्रेमप्रकरणे, करिअर यामधील ताणतणाव आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणास कारणीभूत आहेत. नाशिकमध्ये हे प्रमाण गत दीड-दोन दशकात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.- डॉ. जयंत ढाके, मानसोपचार तज्ज्ञआत्महत्या रोखण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी देश, समाज आणि व्यक्तिगत पातळीवर कृती करणे आवश्यक आहे. आत्महत्या ही एक सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. कुटुंब आणि समाजावर ती एक भावनिक आघात करते. मानसिक आजार, नैराश्य आणि तत्कालीक कारणे आत्महत्येला सर्वाधिक कारणीभूत ठरतात.- डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचार तज्ज्ञआत्महत्यांचे धक्कादायक वास्तव आकड्यातजगात दर ४० सेकंदाला एक आत्महत्या.मृत्यूच्या २० अव्वल कारणांमध्ये आत्महत्या प्रकाराचा समावेश.दरवर्षी जगात ८ लाख लोक आत्महत्या करून जीव गमावतात.१५ ते २९ या वयोगटातील मृत्यूमध्ये दुसºया क्रमांकाचे कारण आत्महत्या असते.एकूण आत्महत्यांपैकी ७९ टक्के प्रगतिशील देशांमध्येच होतात.भारतात दर एक लाख व्यक्तींच्या मृत्यूपैकी २३ मृत्यू आत्महत्येमुळे होतात.

टॅग्स :Nashikनाशिक