शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 00:29 IST

वारकरी प्रतिक्रिया.... नाशिक : गेली २२ वर्षे सलग पांडुरंगाच्या भेटीला वारीच्या माध्यमातून जात आहे. अपवाद मागील वर्षीचा. ती भर यंदा ...

ठळक मुद्दे विठूरायाच्या चरणी लीन होण्याची संधी मिळणार

वारकरी प्रतिक्रिया....नाशिक : गेली २२ वर्षे सलग पांडुरंगाच्या भेटीला वारीच्या माध्यमातून जात आहे. अपवाद मागील वर्षीचा. ती भर यंदा पांडुरंगानेच भरून काढली, कारण शासनाने दिलेल्या परवानगीतील ४० लोकांमध्ये माझा नंबर लागला. मी भाग्यवान समजतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेला निर्णय योग्य असला तरी त्यांना देवाने बुध्दी दिली की, किमान ४० लोकांसाठी वारीला परवानगी दिली.- वसंत गटकळ, शिवनई, दिंडोरी कोरोनापासून संरक्षणाकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीला मान्यता दिल्याने वर्षभराच्या विश्रांतीनंतर माझ्यासारख्याला विठूरायाच्या चरणी लीन होण्याची संधी मिळणार आहे. मला खूप आनंद झाला आहे, पण सर्वांनाच जाता आले असते तर अधिक समाधान वाटले असते. त्यामुळे भावना व्यक्त करता येत नाहीत.- उत्तम आडके, नाणेगाव, इगतपुरी. गेली १५ वर्षे पांडुरंगाच्या भेटीला जात आहे. मागील वर्षी शासनानेच परवानगी न दिल्याने वारीत सहभाग घेता आला नाही. ती संधी यंदा मिळाली. पांडुरंगाने भेटीला बोलावल्याने कोणताही अडथळा आला नाही. त्यामुळे कंठ दाटून येतोय. देवाला सर्वच सारखे, तरीपण मला वारीला जाता येणार आहे. अन्य भाग्यवंतांना सोडून जाताना खूपच वाईट वाटत आहे.- भगीरथ काळे, खशरणगाव, सिन्नर विठूरायाच्या भेटीला आतुर झालो होतो. कारण मागील वर्षी वारीला जाता आले नाही. गेली तीस वर्षे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीत मी सहभागी असतो. राज्य सरकारने ४२ दिंड्यांमधून २५ दिंड्यांमधील प्रतिनिधी निवडले गेले त्यात मी आहे. विठूरायाच्या आणि माझ्या भेटीचे एक प्रकारे गणित ठरले आहे. मागील वर्षी हे गणित बिघडले होते. आता ते जुळून आले आहे.- गंगाधर काकड, मखमलाबाद, नाशिक मी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीत २० वर्षांपासून जात असतो. मागील वर्षी वारीच नव्हती. आता एकविसावी वारी करीत आहे. पखवाज वाजवीत असतो. त्यामुळे मी माझे नशीब समजतो. माझे संपूर्ण कुटुंब पिढीजात वारीत सहभाग घेत आहे. आता गेली ३ वर्षे मी आळंदीतच राहात आहे. वारीच्या निमित्ताने माझे नाव आल्यामुळे मी नाशिकहूनच वारीत सहभागी होत आहे.- खुशाल चवडगीर, नांदगाव, येवलाआजोबा-आजी, आई-वडील यांच्यामुळे तीन वर्षांचा असल्यापासून दिंडीद्वारे वारीत सहभागी असतो. २०२० वर्ष सोडले तर कधीच खंड पडलेला नाही. आता ४० भक्तांमध्ये मला संधी मिळाली, पण मी कमनशिबी ठरलो. कारण प्रकृती बरी नसल्याने मला जाता येत नाही. त्यामुळे शरीराबरोबरच मनानेदेखील खचलो आहे. मात्र ही भर पुढील वर्षी भरून काढेन.- कृष्णा कमानकर, भेडाळी, निफाड

टॅग्स :Pandharpurपंढरपूरvarkariवारकरी