घोटी/इगतपुरी/लासलगाव : जिल्ह्यात डेंग्यु, गॅस्ट्रोची साथ पसरल्याने तळेगाव आणि शिरसगाव येथे महिलांसह एक अशा तीन जणांचा मृत्यू झाला आहे. साथीच्या आजारांनी थैमान घातले असतांना आरोग्य यंत्रणांनी गांभीर्याने पावले उचलण्याची मागणी होत आहे.तळेगावला गॅस्ट्रोची साथइगतपुरी नगरपालिका हद्दीतील तळेगाव येथे दुषित पाणी प्यायल्याने गॅस्ट्रो सदृश्य साथीने थैमान घातले असून त्यात एका महिलेचा बळी गेला आहे. या महिलेच्या कुटुंबातील आठ जणांना गॅस्ट्रोची बाधा झाली असून त्यांना ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, महिलेचा बळी गेला असतानाही गावात साथ नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.दोन हजार वस्तीच्या तळेगाव येथील जमना गोपाळ रण (वय ४५) या महिलेला ताप, जुलाब व वांत्याचा त्रास होत असल्याने त्यांचा मृत्यू झाला. या वस्तीतील पिंटू संतोष रण, संतोष नथू रण, रु पाली दिलीप चवर, साहिल सुनील वाघ, विनता दिलीप चवर, सावित्री रण, ज्योती रामदास रण व राजू रावजी मुकणे यांनाही साथीची लागण झाल्याने त्यांच्यावर इगतपुरी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत....तर महिला वाचली असतीइगतपुरी तालुक्यात आठ प्राथमिक आरोग्य केंद्र असून या मार्फत कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांनी पाण्याचे नमुने तपासणी व दुषित असल्याची प्रशासनाला देणे आवश्यक असते. मात्र तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कर्मचारी गावात प्रत्यक्ष जात नसल्याची तक्रार आहे. कर्मचाऱ्यांनी वेळीच गावात जावून नमुने तपासले असते तर या महिलेचा बळी गेला नसता असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.पाणी दुषीतच, पण साथ नाही : तालुका वैद्यकीय अधिकारीया गावात नळाचे पाणी न आल्याने गावातील दोन कुटुंबांनी गावाजवळच्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरले होते. गावात साथ असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाला समजताच गावातील पाणी नमुने तपासले होते. पाणी दुषित असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र महिलेच्या मृत्युनंतर गावात साथ नसल्याचा दावा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पवार यांनी केला आहे.