शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

भावली विस्थापितांची मागणी झुगारून धरणाचे गेट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 20:09 IST

इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या भावली गावचे योग्य पुनर्वसन न करता, शासनाने यावर्षी धरण साठा पूर्णपणे करण्यासाठी गेट बंद केले आहे. यामुळे येत्या दोन दिवसात भावली गाव पाण्याखाली जाऊन ग्रामस्थांवर ऐन पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ येणार असल्याने बंद केलेले गेट तत्काळ उघडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली .

इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाचे काम पंतप्रधान सिंचन योजनेतून दोन वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले. या धरणासाठी भावली गाव बुडीत क्षेत्रात गेले. या गावाच्या पुनर्वसनाचे काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांनी नियोजित ठिकाणी घरे बांधलेली नाहीत. यामुळे या धरणात पूर्ण पाणीसाठा करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी मे महिन्यातच शासनाकडे केली होती. मात्र शासनाने या मागणीची दखल न घेता पुनर्वसनाचे प्रलंबित कामे पूर्ण न करता सोमवारी या धरणाचे गेट बंद केले. दरम्यान, या बाबीची माहिती ग्रामस्थांना समजताच त्यांनी संताप व्यक्त केला आहे. या धरणाचे गेट तत्काळ उघडावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अनिल पुरे व घोटी पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. या शिष्टमंडळात श्रमजीवीचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे, भास्कर पाचरणे, भगवान पाचरणे, सीताराम गावंडा, संपत काळचिडे, गणपत काळचिडे, त्र्यंबक खाडे,कचरू पाचरणे, दशरथ आघान, दत्तू खाडे, वाळू सराई आदींचा समावेश होता.

टॅग्स :Damधरण