शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

कडवा कालव्याला आवर्तन सोडण्याची ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 17:39 IST

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने कडवा कालव्याचे आवर्तन सोडण्याची मागणी ब्राम्हणवाडे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने कडवा कालव्याचे आवर्तन सोडण्याची मागणी ब्राम्हणवाडे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.नायगाव खोऱ्याता गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिसरातील सर्वच पाण्याचे स्त्रोत गेल्या काही दिवसांपासून कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे नायगाव खोºयातील ब्राम्हणवाडे, सोनगिरी, नायगावसह निफाड तालुक्यातील सावळी व पिंपळगाव आदी गावात गेल्या महिनाभरापासुन शेती पाठोपाठ पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.ब्राम्हणवाडेसह कडवा कालव्या लगतच्या गावात निर्माण झालेली व पुढील दोन महिन्याची पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी कडवा कालव्याचे आधिकारी व लोकप्रतीनिधीनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन कडवा कालव्याला आठवडाभरात कमीतकमी दहा दिवसांचे आवर्तन सोडण्याची मागणी सरपंच मंगला घुगे, उपसरपंच सुनिल गिते, देवराम गिते, कैलास गिते, कचेश्वर गिते, विलास गिते, खंडु गिते, भास्कर गिते, छबू गिते, दिलीप नागरे, पोपट माळी आदी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणी