शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 18:47 IST

देवनदीसह म्हाळूंगीचा उगम असणाऱ्या औंढापट्टा परिसरातील तसेच आढळाचे पाणी वळवून भोजापूर धरणात आणले तर सिन्नरसह संगमनेर तालुक्याचे भविष्य काळातील पाण्याचे संकट दुर होईल. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र यावे अशी मागणी नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष बंडूनाना भाबड यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे केली आहे.

दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी व अनियमित होत असल्याने शेतीला पुरक पाण्याची सोय राहीली नाही. पावसाळ्यात जुलै, आॅगस्ट महिन्यात आपल्या भागात पाऊस नसतो व भोजापूर धरणात पाण्याची आवक सुरू होते. याचे कारण तिरडे पट्टाकिल्ला येथे पावसाचे प्रमाण अधिक आहे. पश्चिमेकडे साधारण १३०० मिलीमीटर ते २१०० मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. व ते पाणी सर्व पश्चिमेकडे वाहून जाते. भोजापूर, देवनदीचा उगम औंढापट्याच्या भागात असून तेथून तिरडी परिसरातील डोंगराचे पाणी म्हाळूंगीत येते. ५० वर्षांपूर्वी कै. वसंतराव नाईक यांच्या पुढाकारातून भोजापूर धरण बांधले गेले. त्यातून सिन्नर-संगमनेर तालुक्यातील ४० गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, आता म्हाळूंगी नदीवर २५ सिमेंट बंधारे बांधले गेले आहेत. तसेच पाणीपुरवठा योजनेसह अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी या धरणातले पाणी आरक्षित झाले आहे. या धरणाची उंची वाढवून अथवा त्यातला गाळ काढून काहीच उपयोग नसल्याचे भाबड यांनी प्रसिध्दिप्रत्रकात म्हटले आहे. भोजापूर धरणात पाणीच नसेल तर त्याचा उपयोग काय म्हाळूंगी, आढळा, औंढापट्टा परिसरातील १२९१ हेक्टर वनविभागाचे व ३०० हेक्टर खासगी क्षेत्रावरील पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळणबंधारे यांच्या माध्यमातून कमी खर्चात ते पूर्वेकडे वळविता येईल. व त्यातून एक ते दिड टीएमसी पाणी भोजापूरकडे वळवल्यास धरणाची साठवण क्षमता दुप्पट होईल. तांत्रिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी व कमी खर्चात सिन्नर तालुक्याचा दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येईल. त्यातून रब्बी हंगाम घेणे शेतकºयांना शक्य होईल. जनावरांसह शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, याकडे लक्ष वेधत यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पुढे ही चळवळ व्हावी, असा मतप्रवाह भाबड यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDamधरण