शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 18:47 IST

देवनदीसह म्हाळूंगीचा उगम असणाऱ्या औंढापट्टा परिसरातील तसेच आढळाचे पाणी वळवून भोजापूर धरणात आणले तर सिन्नरसह संगमनेर तालुक्याचे भविष्य काळातील पाण्याचे संकट दुर होईल. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र यावे अशी मागणी नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष बंडूनाना भाबड यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे केली आहे.

दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी व अनियमित होत असल्याने शेतीला पुरक पाण्याची सोय राहीली नाही. पावसाळ्यात जुलै, आॅगस्ट महिन्यात आपल्या भागात पाऊस नसतो व भोजापूर धरणात पाण्याची आवक सुरू होते. याचे कारण तिरडे पट्टाकिल्ला येथे पावसाचे प्रमाण अधिक आहे. पश्चिमेकडे साधारण १३०० मिलीमीटर ते २१०० मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. व ते पाणी सर्व पश्चिमेकडे वाहून जाते. भोजापूर, देवनदीचा उगम औंढापट्याच्या भागात असून तेथून तिरडी परिसरातील डोंगराचे पाणी म्हाळूंगीत येते. ५० वर्षांपूर्वी कै. वसंतराव नाईक यांच्या पुढाकारातून भोजापूर धरण बांधले गेले. त्यातून सिन्नर-संगमनेर तालुक्यातील ४० गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, आता म्हाळूंगी नदीवर २५ सिमेंट बंधारे बांधले गेले आहेत. तसेच पाणीपुरवठा योजनेसह अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी या धरणातले पाणी आरक्षित झाले आहे. या धरणाची उंची वाढवून अथवा त्यातला गाळ काढून काहीच उपयोग नसल्याचे भाबड यांनी प्रसिध्दिप्रत्रकात म्हटले आहे. भोजापूर धरणात पाणीच नसेल तर त्याचा उपयोग काय म्हाळूंगी, आढळा, औंढापट्टा परिसरातील १२९१ हेक्टर वनविभागाचे व ३०० हेक्टर खासगी क्षेत्रावरील पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळणबंधारे यांच्या माध्यमातून कमी खर्चात ते पूर्वेकडे वळविता येईल. व त्यातून एक ते दिड टीएमसी पाणी भोजापूरकडे वळवल्यास धरणाची साठवण क्षमता दुप्पट होईल. तांत्रिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी व कमी खर्चात सिन्नर तालुक्याचा दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येईल. त्यातून रब्बी हंगाम घेणे शेतकºयांना शक्य होईल. जनावरांसह शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, याकडे लक्ष वेधत यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पुढे ही चळवळ व्हावी, असा मतप्रवाह भाबड यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDamधरण