शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
3
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
4
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
5
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
6
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
7
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
8
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
9
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
10
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
11
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
12
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
13
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
14
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
15
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
16
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
17
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
18
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
19
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
20
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क

पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 18:47 IST

देवनदीसह म्हाळूंगीचा उगम असणाऱ्या औंढापट्टा परिसरातील तसेच आढळाचे पाणी वळवून भोजापूर धरणात आणले तर सिन्नरसह संगमनेर तालुक्याचे भविष्य काळातील पाण्याचे संकट दुर होईल. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र यावे अशी मागणी नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष बंडूनाना भाबड यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे केली आहे.

दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी व अनियमित होत असल्याने शेतीला पुरक पाण्याची सोय राहीली नाही. पावसाळ्यात जुलै, आॅगस्ट महिन्यात आपल्या भागात पाऊस नसतो व भोजापूर धरणात पाण्याची आवक सुरू होते. याचे कारण तिरडे पट्टाकिल्ला येथे पावसाचे प्रमाण अधिक आहे. पश्चिमेकडे साधारण १३०० मिलीमीटर ते २१०० मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. व ते पाणी सर्व पश्चिमेकडे वाहून जाते. भोजापूर, देवनदीचा उगम औंढापट्याच्या भागात असून तेथून तिरडी परिसरातील डोंगराचे पाणी म्हाळूंगीत येते. ५० वर्षांपूर्वी कै. वसंतराव नाईक यांच्या पुढाकारातून भोजापूर धरण बांधले गेले. त्यातून सिन्नर-संगमनेर तालुक्यातील ४० गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, आता म्हाळूंगी नदीवर २५ सिमेंट बंधारे बांधले गेले आहेत. तसेच पाणीपुरवठा योजनेसह अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी या धरणातले पाणी आरक्षित झाले आहे. या धरणाची उंची वाढवून अथवा त्यातला गाळ काढून काहीच उपयोग नसल्याचे भाबड यांनी प्रसिध्दिप्रत्रकात म्हटले आहे. भोजापूर धरणात पाणीच नसेल तर त्याचा उपयोग काय म्हाळूंगी, आढळा, औंढापट्टा परिसरातील १२९१ हेक्टर वनविभागाचे व ३०० हेक्टर खासगी क्षेत्रावरील पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळणबंधारे यांच्या माध्यमातून कमी खर्चात ते पूर्वेकडे वळविता येईल. व त्यातून एक ते दिड टीएमसी पाणी भोजापूरकडे वळवल्यास धरणाची साठवण क्षमता दुप्पट होईल. तांत्रिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी व कमी खर्चात सिन्नर तालुक्याचा दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येईल. त्यातून रब्बी हंगाम घेणे शेतकºयांना शक्य होईल. जनावरांसह शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, याकडे लक्ष वेधत यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पुढे ही चळवळ व्हावी, असा मतप्रवाह भाबड यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDamधरण