शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

पुनंदमधून सुळे कालव्याला पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:26 IST

कळवण तालुक्यातील पिळकोस, विसापूर, बिजोरे, चाचेर, धनगरपाडा, भादवण, खामखेडा या गावांतील कालवा क्षेत्रातील विहिरींनी तळ गाठण्यास केली असून, सिंचन होत नसल्याने परिसरातील शेती शेती धोक्यात आली आहे. सुळे डाव्या कालव्याला पुनंदमधून आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कालव्याला पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस, विसापूर, बिजोरे, चाचेर, धनगरपाडा, भादवण, खामखेडा या गावांतील कालवा क्षेत्रातील विहिरींनी तळ गाठण्यास केली असून, सिंचन होत नसल्याने परिसरातील शेती शेती धोक्यात आली आहे. सुळे डाव्या कालव्याला पुनंदमधून आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कालव्याला पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकºयांना आजही कालव्यापासून फारसा लाभ झालेला नसल्याचे बोलले जात आहे. कालव्याला रब्बी हंगामासाठी वेळेवर दोन आवर्तन मिळावे या आशेवर परिसरातील शेतकरी आजही तग धरून असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे. आवर्तन निश्चित करताना शेतकºयांना विश्वासात घेतले जात नसून, फक्त पाणीपट्टी भरून घेतली जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले. उशाशी धरणे असतानाही तालुक्यातील शेतकरी हक्काच्या पाण्याला मुकत आहे. पाण्याअभावी येथील शेती धोक्यात आली आहे. कालवा प्रशासनावर व लोकप्रतिनिधींवर शेतकºयांनाचा रोष वाढलेला असून, कालवा परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. संबंधित विभागाने सुळे डाव्या कालव्याचे दुसरे आवर्तन तत्काळ सोडावे अशी मागणी निवृत्ती जाधव, सुरेश जाधव, धनाजी जाधव, मार्कंड जाधव, सचिन वाघ, संदीप जाधव, राहुल आहेर, केवळ वाघ, कौतिक मोरे, प्रवीण जाधव, दादाजी जाधव, बाजीराव जाधव, बुधा  जाधव, राहुल जाधव यांसह शेतकरी वर्गाने केली आहे. सुळे डावा कालव्याच्या पाणी वितरणाबाबत पाच ते सहा वर्षांपासून दुजाभाव होत आहे. शेतकºयांनी कालव्याला जमिनी देऊनही रब्बी हंगामासाठी दोन आवर्तन वेळेवर दिले जात नसल्याने शेतकरी निराश झाला आहे. ज्या ज्या वेळेस कालव्याला पाणी सोडले गेले, त्या त्या वेळेस पिळकोस-पर्यंत पाण्याचा फ्लो अत्यंत कमी होतो. आजपर्यंत जे आवर्तन दिले गेले ते कमी दिवसांचे दिले जात असल्याने शेतकºयांना या पाण्याचा सिंचनासाठी फारसा उपयोग झालेला नाही.

टॅग्स :WaterपाणीDamधरण