शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

पुनंदमधून सुळे कालव्याला पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:26 IST

कळवण तालुक्यातील पिळकोस, विसापूर, बिजोरे, चाचेर, धनगरपाडा, भादवण, खामखेडा या गावांतील कालवा क्षेत्रातील विहिरींनी तळ गाठण्यास केली असून, सिंचन होत नसल्याने परिसरातील शेती शेती धोक्यात आली आहे. सुळे डाव्या कालव्याला पुनंदमधून आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कालव्याला पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस, विसापूर, बिजोरे, चाचेर, धनगरपाडा, भादवण, खामखेडा या गावांतील कालवा क्षेत्रातील विहिरींनी तळ गाठण्यास केली असून, सिंचन होत नसल्याने परिसरातील शेती शेती धोक्यात आली आहे. सुळे डाव्या कालव्याला पुनंदमधून आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कालव्याला पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकºयांना आजही कालव्यापासून फारसा लाभ झालेला नसल्याचे बोलले जात आहे. कालव्याला रब्बी हंगामासाठी वेळेवर दोन आवर्तन मिळावे या आशेवर परिसरातील शेतकरी आजही तग धरून असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे. आवर्तन निश्चित करताना शेतकºयांना विश्वासात घेतले जात नसून, फक्त पाणीपट्टी भरून घेतली जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले. उशाशी धरणे असतानाही तालुक्यातील शेतकरी हक्काच्या पाण्याला मुकत आहे. पाण्याअभावी येथील शेती धोक्यात आली आहे. कालवा प्रशासनावर व लोकप्रतिनिधींवर शेतकºयांनाचा रोष वाढलेला असून, कालवा परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. संबंधित विभागाने सुळे डाव्या कालव्याचे दुसरे आवर्तन तत्काळ सोडावे अशी मागणी निवृत्ती जाधव, सुरेश जाधव, धनाजी जाधव, मार्कंड जाधव, सचिन वाघ, संदीप जाधव, राहुल आहेर, केवळ वाघ, कौतिक मोरे, प्रवीण जाधव, दादाजी जाधव, बाजीराव जाधव, बुधा  जाधव, राहुल जाधव यांसह शेतकरी वर्गाने केली आहे. सुळे डावा कालव्याच्या पाणी वितरणाबाबत पाच ते सहा वर्षांपासून दुजाभाव होत आहे. शेतकºयांनी कालव्याला जमिनी देऊनही रब्बी हंगामासाठी दोन आवर्तन वेळेवर दिले जात नसल्याने शेतकरी निराश झाला आहे. ज्या ज्या वेळेस कालव्याला पाणी सोडले गेले, त्या त्या वेळेस पिळकोस-पर्यंत पाण्याचा फ्लो अत्यंत कमी होतो. आजपर्यंत जे आवर्तन दिले गेले ते कमी दिवसांचे दिले जात असल्याने शेतकºयांना या पाण्याचा सिंचनासाठी फारसा उपयोग झालेला नाही.

टॅग्स :WaterपाणीDamधरण