शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

पुनंदमधून सुळे कालव्याला पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:26 IST

कळवण तालुक्यातील पिळकोस, विसापूर, बिजोरे, चाचेर, धनगरपाडा, भादवण, खामखेडा या गावांतील कालवा क्षेत्रातील विहिरींनी तळ गाठण्यास केली असून, सिंचन होत नसल्याने परिसरातील शेती शेती धोक्यात आली आहे. सुळे डाव्या कालव्याला पुनंदमधून आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कालव्याला पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस, विसापूर, बिजोरे, चाचेर, धनगरपाडा, भादवण, खामखेडा या गावांतील कालवा क्षेत्रातील विहिरींनी तळ गाठण्यास केली असून, सिंचन होत नसल्याने परिसरातील शेती शेती धोक्यात आली आहे. सुळे डाव्या कालव्याला पुनंदमधून आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कालव्याला पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकºयांना आजही कालव्यापासून फारसा लाभ झालेला नसल्याचे बोलले जात आहे. कालव्याला रब्बी हंगामासाठी वेळेवर दोन आवर्तन मिळावे या आशेवर परिसरातील शेतकरी आजही तग धरून असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे. आवर्तन निश्चित करताना शेतकºयांना विश्वासात घेतले जात नसून, फक्त पाणीपट्टी भरून घेतली जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले. उशाशी धरणे असतानाही तालुक्यातील शेतकरी हक्काच्या पाण्याला मुकत आहे. पाण्याअभावी येथील शेती धोक्यात आली आहे. कालवा प्रशासनावर व लोकप्रतिनिधींवर शेतकºयांनाचा रोष वाढलेला असून, कालवा परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. संबंधित विभागाने सुळे डाव्या कालव्याचे दुसरे आवर्तन तत्काळ सोडावे अशी मागणी निवृत्ती जाधव, सुरेश जाधव, धनाजी जाधव, मार्कंड जाधव, सचिन वाघ, संदीप जाधव, राहुल आहेर, केवळ वाघ, कौतिक मोरे, प्रवीण जाधव, दादाजी जाधव, बाजीराव जाधव, बुधा  जाधव, राहुल जाधव यांसह शेतकरी वर्गाने केली आहे. सुळे डावा कालव्याच्या पाणी वितरणाबाबत पाच ते सहा वर्षांपासून दुजाभाव होत आहे. शेतकºयांनी कालव्याला जमिनी देऊनही रब्बी हंगामासाठी दोन आवर्तन वेळेवर दिले जात नसल्याने शेतकरी निराश झाला आहे. ज्या ज्या वेळेस कालव्याला पाणी सोडले गेले, त्या त्या वेळेस पिळकोस-पर्यंत पाण्याचा फ्लो अत्यंत कमी होतो. आजपर्यंत जे आवर्तन दिले गेले ते कमी दिवसांचे दिले जात असल्याने शेतकºयांना या पाण्याचा सिंचनासाठी फारसा उपयोग झालेला नाही.

टॅग्स :WaterपाणीDamधरण