शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

पुनंदचे आरक्षित पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:07 IST

मालेगाव तालुक्यातील व परिसरातील ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने पुनंदचे पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

दाभाडी : मालेगाव तालुक्यातील व परिसरातील ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने पुनंदचे पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.मालेगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याची सोय गिरणा नदी काठावरील विहिरींद्वारे केली जाते. मात्र सध्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला असल्याने ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे. अनेक गावांतील शेतकरी कुटुंब हे कोरोनाच्या प्रादुर्भावाने संरक्षणासाठी स्वत:च्या शेतात राहण्यासाठी गेले आहेत. तसेच सदर शेतकऱ्यांना जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. विहिरींनी तळ गाठला असल्याने टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील मौजे टेहरे, चंदनपुरी, कौळाणे, मुंगसे दाभाडी, आघार बु, आघार खु, चिंचावड, वाके, नांदगाव बु येथील पिण्याच्या पाण्यासाठी, गुरांसाठी व सिंचनासाठी गिरणा नदी काठालगत विहिरी आहेत मात्र सदर विहिरींनी तळ गाठल्याने अडचण निर्माण झाली आहे. संबंधित ग्रामपंचायत पाणीपट्टी भरण्यास तयार आहेत म्हणून पालकमंत्री यांनी आपल्या अधिकाराचे आरक्षित असलेले पुनंद बंधाºयातील पाणी मालेगावपर्यंत त्वरित सोडल्यास सदर प्रश्न निकाली लागेल व परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर होईल, अशी मागणी करण्यात आली आहे. यास्तव जिल्हाधिकारी नाशिक यांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातChagan Bhujbalछगन भुजबळ