शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

पुनंदचे आरक्षित पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:07 IST

मालेगाव तालुक्यातील व परिसरातील ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने पुनंदचे पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

दाभाडी : मालेगाव तालुक्यातील व परिसरातील ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने पुनंदचे पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.मालेगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याची सोय गिरणा नदी काठावरील विहिरींद्वारे केली जाते. मात्र सध्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला असल्याने ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे. अनेक गावांतील शेतकरी कुटुंब हे कोरोनाच्या प्रादुर्भावाने संरक्षणासाठी स्वत:च्या शेतात राहण्यासाठी गेले आहेत. तसेच सदर शेतकऱ्यांना जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. विहिरींनी तळ गाठला असल्याने टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील मौजे टेहरे, चंदनपुरी, कौळाणे, मुंगसे दाभाडी, आघार बु, आघार खु, चिंचावड, वाके, नांदगाव बु येथील पिण्याच्या पाण्यासाठी, गुरांसाठी व सिंचनासाठी गिरणा नदी काठालगत विहिरी आहेत मात्र सदर विहिरींनी तळ गाठल्याने अडचण निर्माण झाली आहे. संबंधित ग्रामपंचायत पाणीपट्टी भरण्यास तयार आहेत म्हणून पालकमंत्री यांनी आपल्या अधिकाराचे आरक्षित असलेले पुनंद बंधाºयातील पाणी मालेगावपर्यंत त्वरित सोडल्यास सदर प्रश्न निकाली लागेल व परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर होईल, अशी मागणी करण्यात आली आहे. यास्तव जिल्हाधिकारी नाशिक यांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातChagan Bhujbalछगन भुजबळ